म.टा. प्रतिनिधी, नागपूर
मागील काही महिन्यांपासून सुरू झालेल्या चीनविरोधी अभियानाचे चांगले परिणाम दिसू लागले आहेत. चिनी उत्पादनांविरुद्धचा लढा अधिक प्रखर झाला असून एप्रिल ते ऑगस्टदरम्यान चीनमधून होणारी आयात घटल्याचे केंद्र सरकारनेही संसदेत मान्य केले आहे. संसदेच्या अधिवेशनात सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार चीन येथून होणारी आयात २७.६३ टक्क्यांनी घटली आहे.
अखिल भारतीय किरकोळ व्यापारी महासंघासह देशभरातील विविध स्वदेशी उत्पादनांचे समर्थ करणाऱ्या संघटनांनी चिनी उत्पादनांविरुद्ध अभियान राबविले आहे. नागपुरातही त्याचे प्रतिबिंब उमटले. जनसामान्यांमध्ये याबाबत सातत्याने जागृती करण्यात येत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ग्राहकांना चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याचे आवाहन सुरू आहे. त्याचा चांगला परिणाम रक्षाबंधन उत्सवात दिसून आला. चीनहून येणाऱ्या राखी आणि राखीसाठी लागणारा कच्चा माल याची आयात झाली नाही. नागरिकांनी स्वदेशी राख्यांना पसंती दिली. जन्माष्टमी आणि गणेशोत्सवदरम्यानही स्वदेशी उत्पादनांचा बोलबाला दिसून आला. परिणामत: मागील वर्षाच्या तुलनेत यंदा एप्रिल ते ऑगस्टदरम्यान २७.६३ टक्के आयात कमी झाली असून २१.५८ बिलियन डॉलरचा आर्थिक झटका चीनला बसला आहे.
दिवाळीदरम्यान अधिक फटका
नवरात्री, दिवाळी ते ख्रिसमसपर्यंत भारतीय बाजारपेठ चिनी उत्पादनांनी सजलेली असते. दिवाळीसह येणाऱ्या अन्य सण-उत्सवादरम्यान सुमारे चाळीस हजार कोटी रुपयांची आयात दरवर्षी होते. परंतु, चिनी उत्पादनांवरील बहिष्कार पाहता यावर्षी ही आयात कमी होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. नेहमीच्या तुलनेत आयात कमी झाल्यास त्याचा फटका चीनला बसणार आहे.
मागील काही महिन्यांपासून सुरू झालेल्या चीनविरोधी अभियानाचे चांगले परिणाम दिसू लागले आहेत. चिनी उत्पादनांविरुद्धचा लढा अधिक प्रखर झाला असून एप्रिल ते ऑगस्टदरम्यान चीनमधून होणारी आयात घटल्याचे केंद्र सरकारनेही संसदेत मान्य केले आहे. संसदेच्या अधिवेशनात सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार चीन येथून होणारी आयात २७.६३ टक्क्यांनी घटली आहे.
अखिल भारतीय किरकोळ व्यापारी महासंघासह देशभरातील विविध स्वदेशी उत्पादनांचे समर्थ करणाऱ्या संघटनांनी चिनी उत्पादनांविरुद्ध अभियान राबविले आहे. नागपुरातही त्याचे प्रतिबिंब उमटले. जनसामान्यांमध्ये याबाबत सातत्याने जागृती करण्यात येत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ग्राहकांना चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याचे आवाहन सुरू आहे. त्याचा चांगला परिणाम रक्षाबंधन उत्सवात दिसून आला. चीनहून येणाऱ्या राखी आणि राखीसाठी लागणारा कच्चा माल याची आयात झाली नाही. नागरिकांनी स्वदेशी राख्यांना पसंती दिली. जन्माष्टमी आणि गणेशोत्सवदरम्यानही स्वदेशी उत्पादनांचा बोलबाला दिसून आला. परिणामत: मागील वर्षाच्या तुलनेत यंदा एप्रिल ते ऑगस्टदरम्यान २७.६३ टक्के आयात कमी झाली असून २१.५८ बिलियन डॉलरचा आर्थिक झटका चीनला बसला आहे.
दिवाळीदरम्यान अधिक फटका
नवरात्री, दिवाळी ते ख्रिसमसपर्यंत भारतीय बाजारपेठ चिनी उत्पादनांनी सजलेली असते. दिवाळीसह येणाऱ्या अन्य सण-उत्सवादरम्यान सुमारे चाळीस हजार कोटी रुपयांची आयात दरवर्षी होते. परंतु, चिनी उत्पादनांवरील बहिष्कार पाहता यावर्षी ही आयात कमी होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. नेहमीच्या तुलनेत आयात कमी झाल्यास त्याचा फटका चीनला बसणार आहे.