म. टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर
एका अल्पवयीन बालकाचे अपहरण करून खंडणी मागण्याचा दाखल करण्यात आलेला खटला फिर्यादी व आरोपी यांच्या परस्पर तडजोडीने संपुष्टात आल्याची बाब मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या निदर्शनास आली. तेव्हा न्यायालयीन प्रक्रियेचा गैरवापर केल्याप्रकरणी आरोपी व फिर्यादी यांना प्रत्येकी २५ हजारांचा दंड ठोठावण्यात आला. सदर रक्कम गरजवंत वकिलांच्या आर्थिक मदतीसाठी जिल्हा वकील संघटनेला देण्याचा आदेश न्यायालयाने दिला.
यवतमाळ येथील निवासी ईश्वर चोलाराम नाचवाणी यांच्या १७ वर्षीय मुलाचे खंडणीसाठी आरोपी शुभम शंकरलाल तोलवाणी याने अपहरण केले होते. याप्रकरणी नाचवाणी यांच्या तक्रारीवरून आरोपी शुभमच्या विरोधात अवधूतवाडी पोलिस ठाण्यात भादंविच्या कलम ३६४ अ, ३४२, ३४७, २१२, २०१ आणि १२० ब व ३४ अन्वये व पोस्को व माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले. याप्रकरणी पोलिसांनी तपास पूर्ण करून आरोपीच्या विरोधात आरोपपत्र दाखल केले होते.
दरम्यान, आरोपी शुभम व फिर्यादी ईश्वर या दोघांमध्ये तडजोड झाली. त्यामुळे आरोपीने सदर खटला रद्द करण्यात यावा, अशी विनंती करणारी याचिका उच न्यायालयात दाखल केली. त्यावर न्या. झेड. ए. हक आणि न्या. श्रीराम मोडक यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. तेव्हा सदर खटला रद्द करण्यात येऊ नये, असा युक्तिवाद सरकारी वकील संजय डाईफोडे यांनी केला. आरोपी व फिर्यादी यांनी परस्पर तडजोड केली असली तरीही त्यांनी न्यायालयीन प्रक्रियेचा गैरवापर केला, असा दावा करण्यात आला.
याप्रकरणात दोन्ही पक्षांनी परस्पर समन्वयाने तडजोड केली असल्याने खटला सुरू झाल्यानंतरही त्यातून काही निष्पन्न होणार नाही, असे नमूद करीत उच्च न्यायालयाने याचिका मंजूर केली. परंतु, न्यायालयीन प्रक्रियेचा गैरवापर केल्याप्रकरणी दोघांनाही प्रत्येकी २५ हजार रुपये वकील कल्याण निधीत जमा करण्याचा आदेश दिला. याचिकाकर्त्यांतर्फे अॅड. परवेज मिर्झा यांनी बाजू मांडली.
एका अल्पवयीन बालकाचे अपहरण करून खंडणी मागण्याचा दाखल करण्यात आलेला खटला फिर्यादी व आरोपी यांच्या परस्पर तडजोडीने संपुष्टात आल्याची बाब मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या निदर्शनास आली. तेव्हा न्यायालयीन प्रक्रियेचा गैरवापर केल्याप्रकरणी आरोपी व फिर्यादी यांना प्रत्येकी २५ हजारांचा दंड ठोठावण्यात आला. सदर रक्कम गरजवंत वकिलांच्या आर्थिक मदतीसाठी जिल्हा वकील संघटनेला देण्याचा आदेश न्यायालयाने दिला.
यवतमाळ येथील निवासी ईश्वर चोलाराम नाचवाणी यांच्या १७ वर्षीय मुलाचे खंडणीसाठी आरोपी शुभम शंकरलाल तोलवाणी याने अपहरण केले होते. याप्रकरणी नाचवाणी यांच्या तक्रारीवरून आरोपी शुभमच्या विरोधात अवधूतवाडी पोलिस ठाण्यात भादंविच्या कलम ३६४ अ, ३४२, ३४७, २१२, २०१ आणि १२० ब व ३४ अन्वये व पोस्को व माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले. याप्रकरणी पोलिसांनी तपास पूर्ण करून आरोपीच्या विरोधात आरोपपत्र दाखल केले होते.
दरम्यान, आरोपी शुभम व फिर्यादी ईश्वर या दोघांमध्ये तडजोड झाली. त्यामुळे आरोपीने सदर खटला रद्द करण्यात यावा, अशी विनंती करणारी याचिका उच न्यायालयात दाखल केली. त्यावर न्या. झेड. ए. हक आणि न्या. श्रीराम मोडक यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. तेव्हा सदर खटला रद्द करण्यात येऊ नये, असा युक्तिवाद सरकारी वकील संजय डाईफोडे यांनी केला. आरोपी व फिर्यादी यांनी परस्पर तडजोड केली असली तरीही त्यांनी न्यायालयीन प्रक्रियेचा गैरवापर केला, असा दावा करण्यात आला.
याप्रकरणात दोन्ही पक्षांनी परस्पर समन्वयाने तडजोड केली असल्याने खटला सुरू झाल्यानंतरही त्यातून काही निष्पन्न होणार नाही, असे नमूद करीत उच्च न्यायालयाने याचिका मंजूर केली. परंतु, न्यायालयीन प्रक्रियेचा गैरवापर केल्याप्रकरणी दोघांनाही प्रत्येकी २५ हजार रुपये वकील कल्याण निधीत जमा करण्याचा आदेश दिला. याचिकाकर्त्यांतर्फे अॅड. परवेज मिर्झा यांनी बाजू मांडली.