भाजपचे मीडिया प्रभारी विश्वास पाठक यांचा दावा
म.टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर
राज्यातील तीन पक्षांनी स्थापन केलेली महाविकास आघाडी अनैसर्गिक आहे. त्यामुळे सरकार पाडण्यासाठी आम्हाला प्रयत्न करण्याची गरज नाही. आपल्या कर्मानेच हे सरकार पडेल, असा दावा भाजपचे मीडिया प्रभारी विश्वास पाठक यांनी केला.
भाजपच्या मीडिया प्रभारीपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर विश्वास पाठक यांनी 'मटा' कार्यालयाला अलीकडेच सदिच्छा भेट दिली. यावेळी बोलताना त्यांनी राज्य सरकाराच्या कारभारावर तोफ डागत भाजपच्या कार्यक्रमांची सविस्तर माहिती सांगितली.
राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाडण्यात भाजपला अजिबात रस नाही. त्याची गरजही नाही. महाआघाडी अधिक काळ टिकेल, असा जनतेलाच विश्वास नाही. तथापि, याबाबत भाजपवर करण्यात येणारे आरोप पूर्णत: दिशाभूल करणारे आहेत. योग्यवेळी संधी मिळाल्यास भाजप निश्चित सरकार बनवेल. कुणाला सोबत घ्यायचे, हा निर्णय परिस्थितीनुसार घेतला जाईल, असेही ते म्हणाले. तिन्ही पक्ष एकत्र आले असले तरी, त्यांचा आपसात समन्वय नाही. ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी शंभर युनिटपर्यंत वीज मोफत देण्याचे जाहीर केले. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी इन्कार केला. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलेल्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रद्द केल्या. यावरून राज्याचा कारभार कसा चालला याची कल्पना करता येईल. राज्यकर्त्यांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे, असा आरोप करून पाठक म्हणाले, 'केंद्राने आत्मनिर्भर पॅकेजमध्ये नऊ हजार कोटी रुपये ऊर्जा विभागाला मिळणार आहेत. यातील अडीच हजार कोटी रुपयांचा वाटा राज्याला मिळाला. राऊत यांना काहीच करता येत नसल्याने ते केंद्राकडे बोट दाखवत आहे. प्रत्यक्षात त्यांनी केंद्राकडे काही मागणी करण्यापूर्वी अभ्यास करावा.'
दिशाहीन नेतृत्वामुळे राज्य भरकटले असून भीषण स्थिती उद्भवली आहे. करोनाने चिंतेत भर घातली आहे. अशा संकट समयी मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे कुठेही फिरताना दिसले नाहीत. ते पूर्णत: प्रशासनावर अवलंबून असल्याचे दिसते. याउलट देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण राज्य पिंजून काढले. त्यांच्या कार्यकाळात राज्याला दिशा लाभली होती. आज तशी स्थिती नाही, असा दावाही पाठक यांनी केला.
मुंढेंना 'त्यांचा' आशीर्वाद!
महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास पाठक यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. मनमानी कारभार, लोकप्रतिनिधींचा अवमान, अवैधरीत्या पद मिळवणे, निधीचे वाटप केले असतानाही आयुक्तांच्या कुठल्याच बेकादेशीर कामांची सरकारकडून साधी दखल घेतली जात नाही, याचाच अर्थ राज्यकर्त्यांच्या आशीर्वादाने हे सुरू असल्याचे अधोरेखित होते. स्मार्ट सिटीवर नियुक्तीबाबत घेतलेल्या निर्णयांचा आता न्यायालयातून फैसला होईल, असेही विश्वास पाठक म्हणाले.
म.टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर
राज्यातील तीन पक्षांनी स्थापन केलेली महाविकास आघाडी अनैसर्गिक आहे. त्यामुळे सरकार पाडण्यासाठी आम्हाला प्रयत्न करण्याची गरज नाही. आपल्या कर्मानेच हे सरकार पडेल, असा दावा भाजपचे मीडिया प्रभारी विश्वास पाठक यांनी केला.
भाजपच्या मीडिया प्रभारीपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर विश्वास पाठक यांनी 'मटा' कार्यालयाला अलीकडेच सदिच्छा भेट दिली. यावेळी बोलताना त्यांनी राज्य सरकाराच्या कारभारावर तोफ डागत भाजपच्या कार्यक्रमांची सविस्तर माहिती सांगितली.
राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाडण्यात भाजपला अजिबात रस नाही. त्याची गरजही नाही. महाआघाडी अधिक काळ टिकेल, असा जनतेलाच विश्वास नाही. तथापि, याबाबत भाजपवर करण्यात येणारे आरोप पूर्णत: दिशाभूल करणारे आहेत. योग्यवेळी संधी मिळाल्यास भाजप निश्चित सरकार बनवेल. कुणाला सोबत घ्यायचे, हा निर्णय परिस्थितीनुसार घेतला जाईल, असेही ते म्हणाले. तिन्ही पक्ष एकत्र आले असले तरी, त्यांचा आपसात समन्वय नाही. ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी शंभर युनिटपर्यंत वीज मोफत देण्याचे जाहीर केले. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी इन्कार केला. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलेल्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रद्द केल्या. यावरून राज्याचा कारभार कसा चालला याची कल्पना करता येईल. राज्यकर्त्यांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे, असा आरोप करून पाठक म्हणाले, 'केंद्राने आत्मनिर्भर पॅकेजमध्ये नऊ हजार कोटी रुपये ऊर्जा विभागाला मिळणार आहेत. यातील अडीच हजार कोटी रुपयांचा वाटा राज्याला मिळाला. राऊत यांना काहीच करता येत नसल्याने ते केंद्राकडे बोट दाखवत आहे. प्रत्यक्षात त्यांनी केंद्राकडे काही मागणी करण्यापूर्वी अभ्यास करावा.'
दिशाहीन नेतृत्वामुळे राज्य भरकटले असून भीषण स्थिती उद्भवली आहे. करोनाने चिंतेत भर घातली आहे. अशा संकट समयी मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे कुठेही फिरताना दिसले नाहीत. ते पूर्णत: प्रशासनावर अवलंबून असल्याचे दिसते. याउलट देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण राज्य पिंजून काढले. त्यांच्या कार्यकाळात राज्याला दिशा लाभली होती. आज तशी स्थिती नाही, असा दावाही पाठक यांनी केला.
मुंढेंना 'त्यांचा' आशीर्वाद!
महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास पाठक यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. मनमानी कारभार, लोकप्रतिनिधींचा अवमान, अवैधरीत्या पद मिळवणे, निधीचे वाटप केले असतानाही आयुक्तांच्या कुठल्याच बेकादेशीर कामांची सरकारकडून साधी दखल घेतली जात नाही, याचाच अर्थ राज्यकर्त्यांच्या आशीर्वादाने हे सुरू असल्याचे अधोरेखित होते. स्मार्ट सिटीवर नियुक्तीबाबत घेतलेल्या निर्णयांचा आता न्यायालयातून फैसला होईल, असेही विश्वास पाठक म्हणाले.