म. टा. प्रतिनिधी, नागपूर
'राज्यातील मंत्र्यांत खाते वाटपाबद्दल कुठलेच मतभेद नाहीत. खातेवाटपाचे अधिकार मुख्यमंत्र्यांना आहेत. त्याप्रमाणेच खातेवाटप करण्यात आले आहे. यात काही बदल करायचे असल्यास चर्चा करूनच काही निर्णय घेण्यात येतील,' असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी नागपुरात स्पष्ट केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील कार्यक्रमाच्या उद्घाटनानंतर फडणवीस प्रसारमाध्यमांशी बोलत होते. खातेवाटपाबद्दल विचारले असता ते म्हणाले, 'सर्वच मंत्र्यांना जी काही खाती मिळाली आहेत, त्या खात्यांना सर्वच मंत्री न्याय देण्याचा प्रयत्न करतील. सध्या अर्ध्यापेक्षा कमीच मंत्रीमंडळ आहे. त्यामुळे सर्वांवर जास्त भार आहे. मात्र, पुढील विस्तारात आम्ही त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहोत. जी खाती आमच्याकडे आहेत आणि जी खाती शिंदे गटाकडे अतिरिक्त आहेत, ती त्या त्या पक्षातील भविष्यात येणाऱ्या मंत्र्यांना मिळतील. खात्यात अदलाबदल करायचे असल्यास आम्ही चर्चा करून ते करू. विस्तार कधी करायची, हा सर्वस्वी मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे आणि योग्य वेळ पाहून ते ठरवतील.' 'अडीच वर्षांचा फॉर्म्युला ठरलाच नव्हता' 'अडीच वर्षांचा फार्म्युला कधी ठरलाच नव्हता, या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या म्हणण्यामध्ये पूर्ण तथ्य आहे. मी पहिल्या दिवसापासूनचा साक्षीदार आहे. सर्व वाटाघाटी मीच केल्या आहेत. कधीही अडीच वर्षांचा फॉर्म्युला नव्हता. आता ती वेळ निघून गेली आहे. आमच्यावर तर बेइमानीचा आरोप केला जातो. मात्र, सर्वांत मोठी बेइमानी तर आमच्यासोबत झाली आहे. आमच्यासोबत जे निवडून आले, ते आम्हाला सोडून विरोधकांशी हात मिळवणी करीत असतील, तर यापेक्षा जास्त मोठा विश्वासघात काय असू शकतो,' अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी या वेळी केली.
'राज्यातील मंत्र्यांत खाते वाटपाबद्दल कुठलेच मतभेद नाहीत. खातेवाटपाचे अधिकार मुख्यमंत्र्यांना आहेत. त्याप्रमाणेच खातेवाटप करण्यात आले आहे. यात काही बदल करायचे असल्यास चर्चा करूनच काही निर्णय घेण्यात येतील,' असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी नागपुरात स्पष्ट केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील कार्यक्रमाच्या उद्घाटनानंतर फडणवीस प्रसारमाध्यमांशी बोलत होते. खातेवाटपाबद्दल विचारले असता ते म्हणाले, 'सर्वच मंत्र्यांना जी काही खाती मिळाली आहेत, त्या खात्यांना सर्वच मंत्री न्याय देण्याचा प्रयत्न करतील. सध्या अर्ध्यापेक्षा कमीच मंत्रीमंडळ आहे. त्यामुळे सर्वांवर जास्त भार आहे. मात्र, पुढील विस्तारात आम्ही त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहोत. जी खाती आमच्याकडे आहेत आणि जी खाती शिंदे गटाकडे अतिरिक्त आहेत, ती त्या त्या पक्षातील भविष्यात येणाऱ्या मंत्र्यांना मिळतील. खात्यात अदलाबदल करायचे असल्यास आम्ही चर्चा करून ते करू. विस्तार कधी करायची, हा सर्वस्वी मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे आणि योग्य वेळ पाहून ते ठरवतील.' 'अडीच वर्षांचा फॉर्म्युला ठरलाच नव्हता' 'अडीच वर्षांचा फार्म्युला कधी ठरलाच नव्हता, या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या म्हणण्यामध्ये पूर्ण तथ्य आहे. मी पहिल्या दिवसापासूनचा साक्षीदार आहे. सर्व वाटाघाटी मीच केल्या आहेत. कधीही अडीच वर्षांचा फॉर्म्युला नव्हता. आता ती वेळ निघून गेली आहे. आमच्यावर तर बेइमानीचा आरोप केला जातो. मात्र, सर्वांत मोठी बेइमानी तर आमच्यासोबत झाली आहे. आमच्यासोबत जे निवडून आले, ते आम्हाला सोडून विरोधकांशी हात मिळवणी करीत असतील, तर यापेक्षा जास्त मोठा विश्वासघात काय असू शकतो,' अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी या वेळी केली.