नागपूर : काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यामुळे देशभरातील संतापाची तीव्र लाट उसळली असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शनिवारचा पांढरकवडा येथील दौरा अनिश्चित झाला आहे. गुरुवारी झालेल्या हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तातडीने संबंधित यंत्रणांशी चर्चा केली. सायंकाळी दिल्लीतील घडामोडींमुळे पंतप्रधानांच्या दौऱ्यावर अनिश्चिततेचे सावट आले आहे. दहशतवाद्यांच्या हल्ल्याचा देशभरात निषेध करण्यात येत असून सर्व पातळ्यांवरून ठोस प्रत्युत्तर देण्याची मागणी करण्यात येत आहे. पंतप्रधानांचा यवतमाळ जिल्ह्यातील बचत गटाच्या महिला सदस्यांशी पांढरकवडा येथे शनिवारी सकाळी १०.३० वाजता वाजता संवादाचा पूर्वनियोजित कार्यक्रम आहे. मात्र, काश्मीरमधील हल्ल्यामुळे यात बदल होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली.
पंतप्रधानांच्या दौऱ्यावर अनिश्चिततेचे सावट
काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यामुळे देशभरातील संतापाची तीव्र लाट उसळली असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शनिवारचा पांढरकवडा येथील दौरा अनिश्चित ...
30 15 Feb 2019, 4:00 am