नागपूर:
कटंगी वनक्षेत्रातील एका वाघाने मध्य प्रदेशसह महाराष्ट्रातही दहशत माजवली आहे. तो मध्य प्रदेशातील एका गावात लग्नमंडपात घुसला. वाघाला बघून वऱ्हाडी मंडळींमध्ये घबराट पसरली. आरडाओरड आणि पळापळीमुळे गोंधळ उडाला.
मध्य प्रदेशात लग्नमंडपात धुमाकूळ घातल्यानंतर बुधवारी वाघाने राज्याची वेस ओलांडून महाराष्ट्राच्या हद्दीत प्रवेश केला. नागपूरमधील नाकाडोंगरी परिसरात त्याने एका महिलेवर हल्ला केला. शांताबाई असे या महिलेचे नाव असून त्या गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांना तुमसर येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिक दहशतीखाली आहेत. दुसरीकडे वनविभागाचे अधिकारी या वाघाच्या हालचालींवर नजर ठेवून आहेत. या वाघाने गावात घुसून महिलेवर हल्ला केल्याची माहिती मिळाली आहे. वाघाच्या हालचालींवर नजर ठेवून आहोत, असे बालाघाटच्या वनाधिकाऱ्यांनी सांगितले. तर वाघाला पकडण्यासाठी तीन पथके स्थापन करण्यात आली आहेत, असे भंडाऱ्याच्या वनाधिकाऱ्यांनी सांगितले.
कटंगी वनक्षेत्रातील एका वाघाने मध्य प्रदेशसह महाराष्ट्रातही दहशत माजवली आहे. तो मध्य प्रदेशातील एका गावात लग्नमंडपात घुसला. वाघाला बघून वऱ्हाडी मंडळींमध्ये घबराट पसरली. आरडाओरड आणि पळापळीमुळे गोंधळ उडाला.
मध्य प्रदेशात लग्नमंडपात धुमाकूळ घातल्यानंतर बुधवारी वाघाने राज्याची वेस ओलांडून महाराष्ट्राच्या हद्दीत प्रवेश केला. नागपूरमधील नाकाडोंगरी परिसरात त्याने एका महिलेवर हल्ला केला. शांताबाई असे या महिलेचे नाव असून त्या गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांना तुमसर येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिक दहशतीखाली आहेत. दुसरीकडे वनविभागाचे अधिकारी या वाघाच्या हालचालींवर नजर ठेवून आहेत. या वाघाने गावात घुसून महिलेवर हल्ला केल्याची माहिती मिळाली आहे. वाघाच्या हालचालींवर नजर ठेवून आहोत, असे बालाघाटच्या वनाधिकाऱ्यांनी सांगितले. तर वाघाला पकडण्यासाठी तीन पथके स्थापन करण्यात आली आहेत, असे भंडाऱ्याच्या वनाधिकाऱ्यांनी सांगितले.