म.टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर
राजधानी मुंबईत भाजप आणि शिवसेनेतील मनोगतावरून ‘शोले’ भडकले असताना विदर्भात मात्र उभय पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांनी या वादापासून स्वतःला अलिप्त ठेवत ‘साथ-साथ’चे चित्र निर्माण केले आहे. या घडामोडीत दुसऱ्या फळीतील वैदर्भीय भाजपवाले खूश आहेत. तर, थोडे अस्वस्थ असलेले शिवसैनिकही निर्धास्त आहेत.
भाजप आणि शिवसेनेतील कलगीतुरा नवीन नाही. त्यामुळे आधीसारखे त्याचे अप्रूप उरलेले नाही. विधानसभा निवडणुकीत युती तुटल्यापासून उभय पक्षातील परस्परांविषयी असलेला राजकीय भाव कमी झाला आहे. महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकीचे नेते आणि इच्छुकांना वेध लागले आहेत. ‘विधानसभेप्रमाणेच स्वबळावर निवडणुका होण्याची दाट शक्यता लक्षात घेऊन कार्यकर्ते कामाला लागले आहेत. हा वाद वरिष्ठ पातळीवर सुरू असल्याने त्यात आम्हाला विनाकारण पडायचे नाही. सेनेच्या टीकेला उत्तर देण्यात मुंबईतील नेते समर्थ आहेत. त्यामुळे येथून काही बोलणे पक्षशिस्तीला धरून चालणार नाही. शिवसेनेचे विदर्भातील बळ लक्षात घेता या वादाचा काही परिणाम होऊन आम्हाला फटका बसेल असे वाटत नाही. आम्हाला युतीची काहीच फरक पडणार नाही. विधानसभा निवडणुकीत आम्ही दाखवून दिले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही आम्ही नंबर एक वर राहू’, असा दावा भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने केला. शिवसेनेच्या नेत्यानेही या वादात पडण्यापासून सावध पवित्रा घेतला. निवडणुकीमुळे कामे काढणे महत्त्वाचे आहे. मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री नागपूरचे असल्याने वक्तव्य करून त्यांची नाराजी ओढवणे परवडणारे नाही, असे सेनेच्या एका ज्येष्ठ नेत्याने कबूल केले.
युती नसली तर आमच्याच फायद्याचे अधिक आहे. अधिकाधिक शिवसैनिकांना निवडणुकीत भाग्य आजमावण्याची संधी मिळेल. भाजप-शिवसेनेत निवडणुकीपर्यंत असेच वाद चालत राहतील. हिवाळी अधिवेशनानंतर निवडणुकीच्या रणधुमाळीला प्रत्यक्षात सुरुवात होणार असल्याने तोपर्यंत कुरघोडीचे राजकारण चालेल. स्थानिक पातळीवर युती ठेवावी की स्वबळावर लढावे, याचा निर्णय झाल्यानंतरच खरा संग्राम सुरू होईल, अशी भूमिका सेनेच्या अन्य नेत्याने मांडली.
राजधानी मुंबईत भाजप आणि शिवसेनेतील मनोगतावरून ‘शोले’ भडकले असताना विदर्भात मात्र उभय पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांनी या वादापासून स्वतःला अलिप्त ठेवत ‘साथ-साथ’चे चित्र निर्माण केले आहे. या घडामोडीत दुसऱ्या फळीतील वैदर्भीय भाजपवाले खूश आहेत. तर, थोडे अस्वस्थ असलेले शिवसैनिकही निर्धास्त आहेत.
भाजप आणि शिवसेनेतील कलगीतुरा नवीन नाही. त्यामुळे आधीसारखे त्याचे अप्रूप उरलेले नाही. विधानसभा निवडणुकीत युती तुटल्यापासून उभय पक्षातील परस्परांविषयी असलेला राजकीय भाव कमी झाला आहे. महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकीचे नेते आणि इच्छुकांना वेध लागले आहेत. ‘विधानसभेप्रमाणेच स्वबळावर निवडणुका होण्याची दाट शक्यता लक्षात घेऊन कार्यकर्ते कामाला लागले आहेत. हा वाद वरिष्ठ पातळीवर सुरू असल्याने त्यात आम्हाला विनाकारण पडायचे नाही. सेनेच्या टीकेला उत्तर देण्यात मुंबईतील नेते समर्थ आहेत. त्यामुळे येथून काही बोलणे पक्षशिस्तीला धरून चालणार नाही. शिवसेनेचे विदर्भातील बळ लक्षात घेता या वादाचा काही परिणाम होऊन आम्हाला फटका बसेल असे वाटत नाही. आम्हाला युतीची काहीच फरक पडणार नाही. विधानसभा निवडणुकीत आम्ही दाखवून दिले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही आम्ही नंबर एक वर राहू’, असा दावा भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने केला. शिवसेनेच्या नेत्यानेही या वादात पडण्यापासून सावध पवित्रा घेतला. निवडणुकीमुळे कामे काढणे महत्त्वाचे आहे. मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री नागपूरचे असल्याने वक्तव्य करून त्यांची नाराजी ओढवणे परवडणारे नाही, असे सेनेच्या एका ज्येष्ठ नेत्याने कबूल केले.
युती नसली तर आमच्याच फायद्याचे अधिक आहे. अधिकाधिक शिवसैनिकांना निवडणुकीत भाग्य आजमावण्याची संधी मिळेल. भाजप-शिवसेनेत निवडणुकीपर्यंत असेच वाद चालत राहतील. हिवाळी अधिवेशनानंतर निवडणुकीच्या रणधुमाळीला प्रत्यक्षात सुरुवात होणार असल्याने तोपर्यंत कुरघोडीचे राजकारण चालेल. स्थानिक पातळीवर युती ठेवावी की स्वबळावर लढावे, याचा निर्णय झाल्यानंतरच खरा संग्राम सुरू होईल, अशी भूमिका सेनेच्या अन्य नेत्याने मांडली.