म. टा. वृत्तसेवा, चंद्रपूर
विदर्भ क्षेत्र सर्वच बाबतीत संपन्न असताना ५७ वर्षे महाराष्ट्रात राहुन राज्यकर्त्यांच्या नाकर्तेपणामुळे शेती, उद्योग, व्यापार, वीज, सिंचन, रोजगार, कल्याणकारी व लाभाच्या योजना या सर्वच क्षेत्रात मोठे शोषण झाले आहे. आता आपल्यावरील अन्यायाविरुद्ध वैदर्भीय जनतेने आणि आपल्या न्याय हक्कासाठी तरुणांनी पुढे येऊन संघर्षाचे बिगुल फुंकावे, असे आवाहन विदर्भ राज्य आंदोलन समितीचे ज्येष्ठ नेते माजी आमदार अॅड.वामनराव चटप यांनी केले.
बुधवारी सकाळी राजुरा, कोरपना, वरोरा, गोंडपिंपरी, भद्रावती, वणी, गडचांदूर, जिवती, घुग्गुस येथून मोटरसायकल रॅलीद्वारे शेकडो कार्यकर्ते पठाणपुरा, चंद्रपूर येथे आले. तेथून जेटपुरा गेट, जनता चौक, तुकूम मार्गे सीटीपीएस चंद्रपूर येथे गेले. तेथे पोलिसांनी अडविल्यानंतर प्रवेशद्वारावरच ठिय्या आंदोलन करण्यात आले. विदर्भ राज्य आंदोलन समितीच्यावतीने हे आंदोलन करण्यात आले. त्यानंतर झालेल्या सभेला संबोधित करताना अॅड. चटप बोलत होते. यावेळी विधानसभेचे माजी उपसभापती अॅड. मोरेश्वर टेमुर्डे, अर्थतज्ज्ञ डॉ. श्रीनिवास खांदेवाले, संयोजक राम नेवले, माजी मंत्री डॉ. रमेश गजबे, किशोर पोतनवार, हिराचंद बोरकुटे, अॅड. गोविंद भेंडारकर, अरुण केदार, पुरुषोत्तम पाटील यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. या आंदोलनाच्या माध्यमातून स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण करावे, शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती मिळावी, शेतमालाला उत्पादनखर्च अधिक पन्नास टक्के नफा अशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या घोषणेची पूर्तता करावी, विजेचा दर निम्मा करावा, लोडशेडींग संपवावे, विदर्भातील कोळशावर आधारित नवीन १३२ वीज प्रकल्पाची मान्यता रद्द करावी, महिलांवरील माइक्रोफायनान्सचे कर्ज संपवावे आदी मागण्या करण्यात आल्या.
स्वतंत्र विदर्भ झाल्यास सक्षम आणि स्वयंपूर्ण स्वतंत्र राज्य होणार असल्याचे अर्थतज्ज्ञ डॉ. श्रीनिवास खांदेवाले यांनी सांगितले. तर राम नेवले यांनी गेली ५७ वर्षे विदर्भ महाराष्ट्रात राहून आणि सोन्याची कोंबडी समजली जाणारी मुंबईसोबत असूनही विदर्भाचा विकास का झाला नाही, असा प्रश्न उपस्थित केला.
विदर्भ क्षेत्र सर्वच बाबतीत संपन्न असताना ५७ वर्षे महाराष्ट्रात राहुन राज्यकर्त्यांच्या नाकर्तेपणामुळे शेती, उद्योग, व्यापार, वीज, सिंचन, रोजगार, कल्याणकारी व लाभाच्या योजना या सर्वच क्षेत्रात मोठे शोषण झाले आहे. आता आपल्यावरील अन्यायाविरुद्ध वैदर्भीय जनतेने आणि आपल्या न्याय हक्कासाठी तरुणांनी पुढे येऊन संघर्षाचे बिगुल फुंकावे, असे आवाहन विदर्भ राज्य आंदोलन समितीचे ज्येष्ठ नेते माजी आमदार अॅड.वामनराव चटप यांनी केले.
बुधवारी सकाळी राजुरा, कोरपना, वरोरा, गोंडपिंपरी, भद्रावती, वणी, गडचांदूर, जिवती, घुग्गुस येथून मोटरसायकल रॅलीद्वारे शेकडो कार्यकर्ते पठाणपुरा, चंद्रपूर येथे आले. तेथून जेटपुरा गेट, जनता चौक, तुकूम मार्गे सीटीपीएस चंद्रपूर येथे गेले. तेथे पोलिसांनी अडविल्यानंतर प्रवेशद्वारावरच ठिय्या आंदोलन करण्यात आले. विदर्भ राज्य आंदोलन समितीच्यावतीने हे आंदोलन करण्यात आले. त्यानंतर झालेल्या सभेला संबोधित करताना अॅड. चटप बोलत होते. यावेळी विधानसभेचे माजी उपसभापती अॅड. मोरेश्वर टेमुर्डे, अर्थतज्ज्ञ डॉ. श्रीनिवास खांदेवाले, संयोजक राम नेवले, माजी मंत्री डॉ. रमेश गजबे, किशोर पोतनवार, हिराचंद बोरकुटे, अॅड. गोविंद भेंडारकर, अरुण केदार, पुरुषोत्तम पाटील यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. या आंदोलनाच्या माध्यमातून स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण करावे, शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती मिळावी, शेतमालाला उत्पादनखर्च अधिक पन्नास टक्के नफा अशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या घोषणेची पूर्तता करावी, विजेचा दर निम्मा करावा, लोडशेडींग संपवावे, विदर्भातील कोळशावर आधारित नवीन १३२ वीज प्रकल्पाची मान्यता रद्द करावी, महिलांवरील माइक्रोफायनान्सचे कर्ज संपवावे आदी मागण्या करण्यात आल्या.
स्वतंत्र विदर्भ झाल्यास सक्षम आणि स्वयंपूर्ण स्वतंत्र राज्य होणार असल्याचे अर्थतज्ज्ञ डॉ. श्रीनिवास खांदेवाले यांनी सांगितले. तर राम नेवले यांनी गेली ५७ वर्षे विदर्भ महाराष्ट्रात राहून आणि सोन्याची कोंबडी समजली जाणारी मुंबईसोबत असूनही विदर्भाचा विकास का झाला नाही, असा प्रश्न उपस्थित केला.