अ‍ॅपशहर

ग्रामविकास आराखड्यात गणेशवाडी अव्वल

ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानांतर्गत उत्कृष्ट ग्रामविकास आराखड्यासाठी जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील गणेशवाडी ग्रामपंचायतीला प्रथम पारितोषिक मिळाले आहे. सोमवारी मुंबई येथे महाराष्ट्र ग्रामीण सामाजिक परिवर्तन फाउंडेशनच्या गव्हर्निंग कौन्सिलची तिसरी बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी झालेल्या सादरीकरणात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पाच लाख रुपयांचा धनादेश यवतमाळ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार सिंगला आणि गणेशवाडी येथील मुख्यमंत्री ग्रामपरिवर्तक मयुरी महातळे यांना सुपूर्द करण्यात आला.

Maharashtra Times 29 Aug 2017, 4:00 am
म. टा. वृत्तसेवा, यवतमाळ
महाराष्ट्र टाइम्स.कॉम village development plane ganeshwadi first
ग्रामविकास आराखड्यात गणेशवाडी अव्वल


ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानांतर्गत उत्कृष्ट ग्रामविकास आराखड्यासाठी जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील गणेशवाडी ग्रामपंचायतीला प्रथम पारितोषिक मिळाले आहे. सोमवारी मुंबई येथे महाराष्ट्र ग्रामीण सामाजिक परिवर्तन फाउंडेशनच्या गव्हर्निंग कौन्सिलची तिसरी बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी झालेल्या सादरीकरणात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पाच लाख रुपयांचा धनादेश यवतमाळ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार सिंगला आणि गणेशवाडी येथील मुख्यमंत्री ग्रामपरिवर्तक मयुरी महातळे यांना सुपूर्द करण्यात आला.

ग्राम सामाजिक अभियानांतर्गत राज्यात पहिल्या टप्प्यात शंभर ग्रामपंचायती निवडण्यात आल्या होत्या. यापैकी २३ ग्रामपंचायती यवतमाळ जिल्ह्यातील आहेत. यात कळंब तालुक्यात दहा ग्रामपंचायती, उमरखेड चार, नेर आणि पुसद प्रत्येकी तीन, यवतमाळ दोन आणि घाटंजी येथील एका ग्रामपंचायतीचा समावेश होता. या २३पैकी २० ग्रामपंचायतींचा विकास आराखडा तयार करण्यात आल्यावर १० ऑगस्ट रोजी विशेष ग्रामसभा घेऊन मान्यता घेण्यात आली होती. तसेच जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली तीन ग्रामपंचायतींचे विकास आराखडे अंतिम झाल्यावर त्याचे सादरीकरण मुख्यमंत्र्यांसमोर करण्यात आले. यात कळंब तालुक्यातील गणेशवाडी ग्रामपंचायतीला उत्कृष्ट ग्रामपंचायत विकास आराखड्यासाठी गौरविण्यात आले. तर जिल्ह्याला मिळालेले प्रथम बक्षीस हे सामूहिक यश आहे. उत्कृष्ट टीमवर्क मुळे हे शक्य झाले, असे जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह म्हणाले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज