पंकज मोहरीर, चंद्रपूर
व्याघ्र पर्यटन क्षेत्रात निवासस्थाने उभारण्यात येणाऱ्या मर्यादांवर सरकारने स्थानिकांच्या मदतीने तोडगा शोधला आहे. पर्यटन क्षेत्र परिसरातील घरे, वाडे व अतिरिक्त कक्ष पर्यटकांसाठी उपलब्ध करून दिले जाणार आहेत. यातून स्थानिकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. विदर्भातील हा पहिलाच प्रयोग असून यासंदर्भातील पहिली कार्यशाळा ताडोबा येथे सोमवारी झाली.
राज्यातील व्याघ्रवैभव जगाच्या पाठीवर ठळकपणे अधोरेखीत करत वन पर्यटनाला चालना मिळावी या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. राज्यात एकूण सहा व्याघ्रप्रकल्प असून त्यातील पाच प्रकल्प एकट्या विदर्भात आहेत. त्यामुळेच नागपूर हे या भूमीचे प्रवेशद्वार मानले जाते. प्रत्येक पर्यटनस्थळी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे निवासस्थान उभे करण्यास मर्यादा असल्याने पर्यटन क्षेत्राच्या परिसरात ज्यांची घरे, वाडा, अतिरिक्त कक्ष आहे, अशा ठिकाणी पर्यटकांना राहण्याची व्यवस्था करता येऊ शकेल. तसेच स्थानिक संस्कृतीचा पर्यटकांना अनुभव घेता येईल. या योजनेचा प्रचार व प्रसार करण्याच्या उद्धेशाने मंडळाने एआयआरबीएनबीशी सामंजस्य करार केला आहे. एआयआरबीएनबी ही एक आंतरराष्ट्रीयस्तरावरील कंपनी असून त्यांचे १९१ देशात कार्यक्षेत्र असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्याच्या संकेतस्थळावर ऑनलाइन नोंदणी केल्यास निवास व न्याहारीधारकाच्या निवासाची माहिती पर्यटकांना ऑनलाइन उपलब्ध होऊन पर्यटकांना निवासाचे बुकिंग करता येणार आहे. त्यामुळे घरमालकाला यातून उत्पन्न मिळू शकणार आहे. त्याचाच भाग म्हणून महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ सध्या कार्यशाळा घेत आहे.
नागपूर, बोदलकसा येथे होणार कार्यशाळा
नागपूर येथे पेंच व उमरेड-कऱ्हाडला व्याघ्र प्रकल्पाच्या परिसरातील बोदलकसा येथे नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या परिसरातील स्थानिकांसाठी कार्यशाळा ठेवण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
ताडोब्यात रंगली चर्चा
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने सोमवारी ताडोब्यात कार्यशाळा घेतली. यात मोहर्ली (ताडोबा) आगरझरी,सीतारामपेठ,ठाणेगाव रिठ,भामडेली,जुनोना,व नागभीड येथील स्थानिकांनी सहभाग घेतला. या कार्यशाळेत एआयआरबीएनबीचे प्रतिनिधी ऋतुराज यांनी संस्थेबाबत, सामंजस्य कराराचा उद्देश, त्याअंतर्गत राबविण्यात येणारे उपक्रम, निवास व न्याहारी योजनाधारक व पर्यटक यांच्यातील नात्यांचे महत्त्व, जगभरातील संवाद, स्वच्छता आदरातिथ्य याबाबतची माहिती दिली. यावेळी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे वरिष्ठ प्रादेशिक व्यवस्थापक हनुमंत हेडे यांनी महामंडळाच्या निवास व न्याहारी योजनेत पर्यटनस्थळाच्या ठिकाणी अतिरिक्त असलेले घर, वाडे यातील कमाल ५ कक्ष (१० बिछाने) नोंदणी निवास व न्याहारी योजनेंतर्गत करता येईल, असे स्पष्ट केले.
व्याघ्र पर्यटन क्षेत्रात निवासस्थाने उभारण्यात येणाऱ्या मर्यादांवर सरकारने स्थानिकांच्या मदतीने तोडगा शोधला आहे. पर्यटन क्षेत्र परिसरातील घरे, वाडे व अतिरिक्त कक्ष पर्यटकांसाठी उपलब्ध करून दिले जाणार आहेत. यातून स्थानिकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. विदर्भातील हा पहिलाच प्रयोग असून यासंदर्भातील पहिली कार्यशाळा ताडोबा येथे सोमवारी झाली.
राज्यातील व्याघ्रवैभव जगाच्या पाठीवर ठळकपणे अधोरेखीत करत वन पर्यटनाला चालना मिळावी या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. राज्यात एकूण सहा व्याघ्रप्रकल्प असून त्यातील पाच प्रकल्प एकट्या विदर्भात आहेत. त्यामुळेच नागपूर हे या भूमीचे प्रवेशद्वार मानले जाते. प्रत्येक पर्यटनस्थळी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे निवासस्थान उभे करण्यास मर्यादा असल्याने पर्यटन क्षेत्राच्या परिसरात ज्यांची घरे, वाडा, अतिरिक्त कक्ष आहे, अशा ठिकाणी पर्यटकांना राहण्याची व्यवस्था करता येऊ शकेल. तसेच स्थानिक संस्कृतीचा पर्यटकांना अनुभव घेता येईल. या योजनेचा प्रचार व प्रसार करण्याच्या उद्धेशाने मंडळाने एआयआरबीएनबीशी सामंजस्य करार केला आहे. एआयआरबीएनबी ही एक आंतरराष्ट्रीयस्तरावरील कंपनी असून त्यांचे १९१ देशात कार्यक्षेत्र असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्याच्या संकेतस्थळावर ऑनलाइन नोंदणी केल्यास निवास व न्याहारीधारकाच्या निवासाची माहिती पर्यटकांना ऑनलाइन उपलब्ध होऊन पर्यटकांना निवासाचे बुकिंग करता येणार आहे. त्यामुळे घरमालकाला यातून उत्पन्न मिळू शकणार आहे. त्याचाच भाग म्हणून महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ सध्या कार्यशाळा घेत आहे.
नागपूर, बोदलकसा येथे होणार कार्यशाळा
नागपूर येथे पेंच व उमरेड-कऱ्हाडला व्याघ्र प्रकल्पाच्या परिसरातील बोदलकसा येथे नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या परिसरातील स्थानिकांसाठी कार्यशाळा ठेवण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
ताडोब्यात रंगली चर्चा
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने सोमवारी ताडोब्यात कार्यशाळा घेतली. यात मोहर्ली (ताडोबा) आगरझरी,सीतारामपेठ,ठाणेगाव रिठ,भामडेली,जुनोना,व नागभीड येथील स्थानिकांनी सहभाग घेतला. या कार्यशाळेत एआयआरबीएनबीचे प्रतिनिधी ऋतुराज यांनी संस्थेबाबत, सामंजस्य कराराचा उद्देश, त्याअंतर्गत राबविण्यात येणारे उपक्रम, निवास व न्याहारी योजनाधारक व पर्यटक यांच्यातील नात्यांचे महत्त्व, जगभरातील संवाद, स्वच्छता आदरातिथ्य याबाबतची माहिती दिली. यावेळी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे वरिष्ठ प्रादेशिक व्यवस्थापक हनुमंत हेडे यांनी महामंडळाच्या निवास व न्याहारी योजनेत पर्यटनस्थळाच्या ठिकाणी अतिरिक्त असलेले घर, वाडे यातील कमाल ५ कक्ष (१० बिछाने) नोंदणी निवास व न्याहारी योजनेंतर्गत करता येईल, असे स्पष्ट केले.