nitin.totewar@timesgroup.com
tweet – nitintotewarMT
म. टा.विशेष प्रतिनिधी, नागपूर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी ‘व्हिजिट महाराष्ट्र २०१७’ची घोषणा केल्यानंतर वर्षाचे नऊ महिने झाले तरी, पर्यटकांच्याबाबतीत सपाट स्थिती दिसून येते.
संयुक्त राष्ट्रसंघाने पर्यटनाचे महत्त्व लक्षात घेऊन ‘विकासासाठी सतत पर्यटन’ म्हणून हे वर्ष जाहीर केले. यातून दारिद्र्य निर्मूलन, पर्यावरण संरक्षण व राहणीमान उंचावण्याच्या दिशेने सकारात्मक पाऊल उचलण्याचे संकेत दिले. याच धर्तीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी ‘व्हिजिट महाराष्ट्र’ची संकल्पना मांडली. यानंतर पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी विविध उपक्रम जाहीर केले. वारसा स्थळे, ऐतिहासिक स्थळ, सांस्कृतिक कार्यक्रम, थीम बेस्ड, वाइल्डलाइफ टूरिझम, बीच टूरिझम, मेडिकल टूरिझम, हेली टूरिझम, रूरल टूरिझमसारखे उपक्रम राबवण्याचा निर्णय झाला. परंतु, या सर्व उपक्रमाबाबत उदासिनताच दिसून आली. यात राज्याने पाहिजे तशी चमक दाखवलेली नाही.
गुजरात, राजस्थान, केरळ, मध्यप्रदेशसारखे राज्यांप्रमाणे मार्केटिंगचे प्रयत्न राज्यातून झालेले नाहीत. देशाची आर्थिक राजधानी मुंबई असल्याने त्याचा लाभ प्रवासी येण्यासाठी होतो. त्यातील फारच कमी राज्याच्या अन्य भागात जातात. विदर्भात जाणाऱ्यांचे प्रमाण अत्यल्प आहे. या दिशेने मुंबईतून प्रयत्न होणे आवश्यक असल्याचे मत एका पर्यटनतज्ज्ञाने व्यक्त केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासारख्या भाजपच्या बहुतांश प्रमुख नेत्यांसाठी पर्यटन उद्योग आणि त्यापासून रोजगाराच्या संधी हा नेहमीच जिव्हाळ्याचा विषय राहिला. सत्तेत येऊन केंद्राला साडेतीन वर्षे व राज्याची तीन वर्षांकडे वाटचाल सुरू आहे. पर्यटन स्थळांचा अपेक्षित विकास आणि रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या नाही. किती पर्यटक आकर्षित झाले, महसूल आणि रोजगाराबाबत संबंधित यंत्रणांनादेखील काहीच घेणेदेणे नसल्यासारखी स्थिती आहे. विविध सर्किटची योजना वेळोवेळी जाहीर करण्यात आली. तसे आराखडे तयार केले. परंतु, त्यांचा अद्याप विकास झालेला नाही. ईको टूरिझम असो नाही तर, बुद्धिस्ट सर्किट, धार्मिक सर्किट, व्याघ्रसर्किट कागदावरच आहे. विदर्भासह राज्यातील पर्यटन स्थळांबाबत देशाच्या अन्य प्रमुख शहरात ना रोड शो झाला ना महोत्सव झाले. त्यामुळे अन्य राज्यातील पर्यटकांना ‘व्हिजिट’साठी आकर्षित करता आलेले नाही. विदेशी पर्यटक तर दूर, साधे विदर्भातील पर्यटकांचे प्रमाण जेमतेम वाढले.
विदर्भाच्या १५०-२०० किलोमीटर परिघात पाच व्याघ्र प्रकल्प, अभयारण्य, सेवाग्राम, पवनार, शेगावसारखे धार्मिक स्थळ, उल्कापातापासून तयार झालेले लोणार सरोवर अशी अनेक स्थळे आहेत. परंतु, या स्थळांकडे पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी पाहिजे तसा पुढाकार घेण्यात आलेला नाही. अनेक वर्षांपासून विदर्भातील थंड हवेचे ठिकाण चिखलदरा, ताडोबा, मेळघाट, पेंच व्याघ्र प्रकल्प, नवेगावसह अन्य अभयारण्य, सेवाग्राम, पवनारसारखे ऐतिहासिक वारसा लाभलेली स्थळे आजही पर्यटकांच्या ‘व्हिजिट’च्या प्रतीक्षेत आहेत.
पर्यटक आलेत पण…
जून महिन्यात देशात आलेल्या विदेशी पर्यटकांपैकी १४.९८ टक्के मुंबईत आले. गेल्यावर्षी जून महिन्यात ६.८ टक्के पर्यटकांच्या तुलनेत यंदा तब्बल २२.५ टक्के पर्यटक आले. मुंबईचा परिसर वगळता राज्याच्या अन्य भागात विशेषतः विदर्भात याचा लाभ झाला नाही. जून महिन्यात देशातील पहिल्या २० विमानतळांमध्ये दिल्लीनंतर मुंबईचा दुसरा क्रमांक होता. ई-टूरिस्ट व्हिसावर सुमारे २०.६ टक्के पर्यटक मुंबईच्या विमानतळावर उतरले. देशाच्या मध्यभागी असलेले नागपूरचे विमानतळ नावापुरते आंतरराष्ट्रीय ठरले आहे.
tweet – nitintotewarMT
म. टा.विशेष प्रतिनिधी, नागपूर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी ‘व्हिजिट महाराष्ट्र २०१७’ची घोषणा केल्यानंतर वर्षाचे नऊ महिने झाले तरी, पर्यटकांच्याबाबतीत सपाट स्थिती दिसून येते.
संयुक्त राष्ट्रसंघाने पर्यटनाचे महत्त्व लक्षात घेऊन ‘विकासासाठी सतत पर्यटन’ म्हणून हे वर्ष जाहीर केले. यातून दारिद्र्य निर्मूलन, पर्यावरण संरक्षण व राहणीमान उंचावण्याच्या दिशेने सकारात्मक पाऊल उचलण्याचे संकेत दिले. याच धर्तीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी ‘व्हिजिट महाराष्ट्र’ची संकल्पना मांडली. यानंतर पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी विविध उपक्रम जाहीर केले. वारसा स्थळे, ऐतिहासिक स्थळ, सांस्कृतिक कार्यक्रम, थीम बेस्ड, वाइल्डलाइफ टूरिझम, बीच टूरिझम, मेडिकल टूरिझम, हेली टूरिझम, रूरल टूरिझमसारखे उपक्रम राबवण्याचा निर्णय झाला. परंतु, या सर्व उपक्रमाबाबत उदासिनताच दिसून आली. यात राज्याने पाहिजे तशी चमक दाखवलेली नाही.
गुजरात, राजस्थान, केरळ, मध्यप्रदेशसारखे राज्यांप्रमाणे मार्केटिंगचे प्रयत्न राज्यातून झालेले नाहीत. देशाची आर्थिक राजधानी मुंबई असल्याने त्याचा लाभ प्रवासी येण्यासाठी होतो. त्यातील फारच कमी राज्याच्या अन्य भागात जातात. विदर्भात जाणाऱ्यांचे प्रमाण अत्यल्प आहे. या दिशेने मुंबईतून प्रयत्न होणे आवश्यक असल्याचे मत एका पर्यटनतज्ज्ञाने व्यक्त केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासारख्या भाजपच्या बहुतांश प्रमुख नेत्यांसाठी पर्यटन उद्योग आणि त्यापासून रोजगाराच्या संधी हा नेहमीच जिव्हाळ्याचा विषय राहिला. सत्तेत येऊन केंद्राला साडेतीन वर्षे व राज्याची तीन वर्षांकडे वाटचाल सुरू आहे. पर्यटन स्थळांचा अपेक्षित विकास आणि रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या नाही. किती पर्यटक आकर्षित झाले, महसूल आणि रोजगाराबाबत संबंधित यंत्रणांनादेखील काहीच घेणेदेणे नसल्यासारखी स्थिती आहे. विविध सर्किटची योजना वेळोवेळी जाहीर करण्यात आली. तसे आराखडे तयार केले. परंतु, त्यांचा अद्याप विकास झालेला नाही. ईको टूरिझम असो नाही तर, बुद्धिस्ट सर्किट, धार्मिक सर्किट, व्याघ्रसर्किट कागदावरच आहे. विदर्भासह राज्यातील पर्यटन स्थळांबाबत देशाच्या अन्य प्रमुख शहरात ना रोड शो झाला ना महोत्सव झाले. त्यामुळे अन्य राज्यातील पर्यटकांना ‘व्हिजिट’साठी आकर्षित करता आलेले नाही. विदेशी पर्यटक तर दूर, साधे विदर्भातील पर्यटकांचे प्रमाण जेमतेम वाढले.
विदर्भाच्या १५०-२०० किलोमीटर परिघात पाच व्याघ्र प्रकल्प, अभयारण्य, सेवाग्राम, पवनार, शेगावसारखे धार्मिक स्थळ, उल्कापातापासून तयार झालेले लोणार सरोवर अशी अनेक स्थळे आहेत. परंतु, या स्थळांकडे पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी पाहिजे तसा पुढाकार घेण्यात आलेला नाही. अनेक वर्षांपासून विदर्भातील थंड हवेचे ठिकाण चिखलदरा, ताडोबा, मेळघाट, पेंच व्याघ्र प्रकल्प, नवेगावसह अन्य अभयारण्य, सेवाग्राम, पवनारसारखे ऐतिहासिक वारसा लाभलेली स्थळे आजही पर्यटकांच्या ‘व्हिजिट’च्या प्रतीक्षेत आहेत.
पर्यटक आलेत पण…
जून महिन्यात देशात आलेल्या विदेशी पर्यटकांपैकी १४.९८ टक्के मुंबईत आले. गेल्यावर्षी जून महिन्यात ६.८ टक्के पर्यटकांच्या तुलनेत यंदा तब्बल २२.५ टक्के पर्यटक आले. मुंबईचा परिसर वगळता राज्याच्या अन्य भागात विशेषतः विदर्भात याचा लाभ झाला नाही. जून महिन्यात देशातील पहिल्या २० विमानतळांमध्ये दिल्लीनंतर मुंबईचा दुसरा क्रमांक होता. ई-टूरिस्ट व्हिसावर सुमारे २०.६ टक्के पर्यटक मुंबईच्या विमानतळावर उतरले. देशाच्या मध्यभागी असलेले नागपूरचे विमानतळ नावापुरते आंतरराष्ट्रीय ठरले आहे.