नागपूर
'आपल्या शहराचा विकास सर्वांनाच हवा असतो. त्यासाठी थोडाफार त्रास सोसण्याची तयारीही शहरवासीयांची असते. मात्र, हा त्रास किती असावा, याला काही मर्यादा असाव्यात. शहरात सगळीच विकासकामे सोबत सुरू आहेत. त्यात मेट्रो रेल्वे, रस्त्यांचे सिमेंटीकरण या कामांचा समावेश आहे. मात्र, रस्त्यांच्या कामात कमालीची अनियमितता असल्याने त्याचा कमालीचा त्रास नागपूरकरांना सोसावा लागतो. धूळ, खड्डे, विस्कळीत वाहतूक यांमुळे जीव मेटाकुटीस येतो. कितीतरी जीवही गेले. या कामांत नियोजन नाही, ही वस्तुस्थिती आहे. विकास हवा पण गैरसोय नको', असा सूर नागपूरकरांतून गुरुवारी निघाला. 'मटा व्हॉइस'च्या दोनशेव्या भागानिमित्त शंकरनगरातील शेवाळकर सभागृहात आयोजित 'लोकसंवाद' कार्यक्रमात नागपूरकरांनी आपल्या अपेक्षा, गाऱ्हाणी मांडली. कार्यक्रमात सहभागी नागपूरकरांच्या प्रतिक्रिया त्यांच्याच शब्दांत...
बगिचा सुरक्षित राहायला हवा
गांधीबाग बगीचा पावणेपाच एकर परिसरात आहे. शहरात आनंदाने आयुष्य जगण्यासाठी, नागरिकांना श्वास घेता यावा यासाठी बगिचे हवेत, पायी चालण्याची जागा हवी. असे असताना बगिच्याच्या पावणेदोन एकर जागेचा व्यावसायिक वापर करण्याला परवानगी देण्यात आली. मध्य नागपुरातील हा बगिचा सुरक्षित राहायला हवा.
-रमण पैगवार, माजी नगरसेवक
'मटा व्हॉइस'मुळे समस्या सुटली
महालक्ष्मीनगर मानेवाडा परिसरात सांडपाण्याचा मोठा प्रश्न होता. अस्वच्छतेमुळे आरोग्याचे प्रश्नही निर्माण झाले होते. 'मटा व्हॉइस'च्या माध्यमातून यावर प्रकाश टाकण्यात आला. आता नाल्याचे बांधकाम करण्यात आले असून या भागातील नागरिकांसाठी मोठी सुविधा निर्माण झाली आहे. स्मार्ट शहरात स्मार्ट सुविधा निर्माण करण्याची गरज आहे.
-प्रवीण राऊत
अतिक्रमण काढून डांबरीकरण करा
काटोल रिंगरोडला जोडणाऱ्या झिंगाबाई टाकळी रिंगरोडवर बांधण्यात येत असलेल्या पुलाचे काम अर्धवट पडले आहे. विकासकामाचे दावे करणाऱ्यांनी अशी अर्धवट कामे करून नागरिकांची गैरसोय करू नये. फरस ते गोधनी या मार्गावरील अतिक्रमण काढून रस्त्याचे डांबरीकरण करावे.
-संजय भिलकर, झिंगाबाई टाकळी
मेट्रो सिटी करा, पण आम्हाला घराबाहेर काढू नका.
नागपूर मेट्रो सिटी बनत आहे. स्मार्ट बनणाऱ्या नागपुरात विविध पायाभूत सुविधा निर्माण करण्यात येत आहेत. देशाच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या नागपूरचा विकास व्हावा, ही आमची इच्छा आहे. मात्र, हा विकास सर्वांना सोबत घेऊन जाणारा असावा. श्रीमंतांपासून ते गरिबांनाही या विकासात स्थान असावे. मेट्रो सिटी करा, पण आम्हाला घराबाहेर काढू नका.
-विजय खर्डेनवीस
विजेच्या खांबांचा अडथळा
लालगंज भागात ठिकठिकाणी रस्त्याच्या मधोमध विजेचे खांब आहेत. यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून अपघातही घडले. महापालिका आणि महावितरण एकमेकांकडे बोट दाखवितात. स्मार्ट सिटीला न शोभणारे चित्र बदलण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेण्याची गरज आहे.
-गुणवंत झाडे
'आपल्या शहराचा विकास सर्वांनाच हवा असतो. त्यासाठी थोडाफार त्रास सोसण्याची तयारीही शहरवासीयांची असते. मात्र, हा त्रास किती असावा, याला काही मर्यादा असाव्यात. शहरात सगळीच विकासकामे सोबत सुरू आहेत. त्यात मेट्रो रेल्वे, रस्त्यांचे सिमेंटीकरण या कामांचा समावेश आहे. मात्र, रस्त्यांच्या कामात कमालीची अनियमितता असल्याने त्याचा कमालीचा त्रास नागपूरकरांना सोसावा लागतो. धूळ, खड्डे, विस्कळीत वाहतूक यांमुळे जीव मेटाकुटीस येतो. कितीतरी जीवही गेले. या कामांत नियोजन नाही, ही वस्तुस्थिती आहे. विकास हवा पण गैरसोय नको', असा सूर नागपूरकरांतून गुरुवारी निघाला. 'मटा व्हॉइस'च्या दोनशेव्या भागानिमित्त शंकरनगरातील शेवाळकर सभागृहात आयोजित 'लोकसंवाद' कार्यक्रमात नागपूरकरांनी आपल्या अपेक्षा, गाऱ्हाणी मांडली. कार्यक्रमात सहभागी नागपूरकरांच्या प्रतिक्रिया त्यांच्याच शब्दांत...
बगिचा सुरक्षित राहायला हवा
गांधीबाग बगीचा पावणेपाच एकर परिसरात आहे. शहरात आनंदाने आयुष्य जगण्यासाठी, नागरिकांना श्वास घेता यावा यासाठी बगिचे हवेत, पायी चालण्याची जागा हवी. असे असताना बगिच्याच्या पावणेदोन एकर जागेचा व्यावसायिक वापर करण्याला परवानगी देण्यात आली. मध्य नागपुरातील हा बगिचा सुरक्षित राहायला हवा.
-रमण पैगवार, माजी नगरसेवक
'मटा व्हॉइस'मुळे समस्या सुटली
महालक्ष्मीनगर मानेवाडा परिसरात सांडपाण्याचा मोठा प्रश्न होता. अस्वच्छतेमुळे आरोग्याचे प्रश्नही निर्माण झाले होते. 'मटा व्हॉइस'च्या माध्यमातून यावर प्रकाश टाकण्यात आला. आता नाल्याचे बांधकाम करण्यात आले असून या भागातील नागरिकांसाठी मोठी सुविधा निर्माण झाली आहे. स्मार्ट शहरात स्मार्ट सुविधा निर्माण करण्याची गरज आहे.
-प्रवीण राऊत
अतिक्रमण काढून डांबरीकरण करा
काटोल रिंगरोडला जोडणाऱ्या झिंगाबाई टाकळी रिंगरोडवर बांधण्यात येत असलेल्या पुलाचे काम अर्धवट पडले आहे. विकासकामाचे दावे करणाऱ्यांनी अशी अर्धवट कामे करून नागरिकांची गैरसोय करू नये. फरस ते गोधनी या मार्गावरील अतिक्रमण काढून रस्त्याचे डांबरीकरण करावे.
-संजय भिलकर, झिंगाबाई टाकळी
मेट्रो सिटी करा, पण आम्हाला घराबाहेर काढू नका.
नागपूर मेट्रो सिटी बनत आहे. स्मार्ट बनणाऱ्या नागपुरात विविध पायाभूत सुविधा निर्माण करण्यात येत आहेत. देशाच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या नागपूरचा विकास व्हावा, ही आमची इच्छा आहे. मात्र, हा विकास सर्वांना सोबत घेऊन जाणारा असावा. श्रीमंतांपासून ते गरिबांनाही या विकासात स्थान असावे. मेट्रो सिटी करा, पण आम्हाला घराबाहेर काढू नका.
-विजय खर्डेनवीस
विजेच्या खांबांचा अडथळा
लालगंज भागात ठिकठिकाणी रस्त्याच्या मधोमध विजेचे खांब आहेत. यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून अपघातही घडले. महापालिका आणि महावितरण एकमेकांकडे बोट दाखवितात. स्मार्ट सिटीला न शोभणारे चित्र बदलण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेण्याची गरज आहे.
-गुणवंत झाडे