अ‍ॅपशहर

​ भाजपचा एकहाती विजय

नगर परिषदेनंतर पुन्हा एकदा वर्धा जिल्ह्याने भाजपला कौल दिला आहे. ५१पैकी भाजपला ३२ जागांवर विजय मिळाला आहे. त्याखालोखाल काँग्रेस १३, शिवसेना दोन, राष्ट्रवादी दोन, बसप दोन आणि एका जागेवर अपक्ष निवडून आले आहेत. सुरुवातीला काँग्रेस आणि भाजप यांच्यात थेट सामना होणार असल्याचे चित्र होते. बंडखोरांचा फटकाही भाजपला बसणार असे भाकित वर्तविले जात होते. पण, भाजपने या सर्व चर्चांना विराम देत विजयावर नाव कोरले आहे.

Maharashtra Times 25 Feb 2017, 4:00 am
एकनाथ चौधरी, वर्धा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम wardha zp win by bjp
​ भाजपचा एकहाती विजय


नगर परिषदेनंतर पुन्हा एकदा वर्धा जिल्ह्याने भाजपला कौल दिला आहे. ५१पैकी भाजपला ३२ जागांवर विजय मिळाला आहे. त्याखालोखाल काँग्रेस १३, शिवसेना दोन, राष्ट्रवादी दोन, बसप दोन आणि एका जागेवर अपक्ष निवडून आले आहेत. सुरुवातीला काँग्रेस आणि भाजप यांच्यात थेट सामना होणार असल्याचे चित्र होते. बंडखोरांचा फटकाही भाजपला बसणार असे भाकित वर्तविले जात होते. पण, भाजपने या सर्व चर्चांना विराम देत विजयावर नाव कोरले आहे.

जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या हिंगणी गटात जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष चित्रा रणनवरे यांचे पती राणा रणनवरे यांनी विजय मिळविला आहे. येथे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष काँग्रेसचे विजय जयस्वाल यांना पराभव स्वीकारावा लागला. काँग्रेसचे देवळी-पुलगावचे आमदार रणजित कांबळे आणि आर्वीचे आमदार अमर काळे यांना गड राखता आला नाही. आर्वी तालुक्यात काँग्रेसला सहापैकी दोन जागांवर विजय मिळाला आहे. देवळी तालुक्यात काँग्रेसचा सहापैकी केवळ एक उमेदवार निवडून आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ दोन जागांवर समाधान मानावे लागले आहे. माजी आमदार सुरेश देशमुख यांच्यासाठी ही धोक्याची घंटा मानली जात आहे. तर शिवसेनेचे उपनेते अशोक शिंदे यांना समुद्रपूरमध्ये दोन जागा जिंकून खाते उघडता आले आहे.

■ प्रतिष्ठेच्या पाच जागा भाजपने गमावल्या

खासदार आदर्श गाव असलेल्या व मा. गो. वैद्य यांच्या तरोडा या जिल्हा परिषद गटात भाजपच्या सविता तिमांडे यांचा पराभव झाला. उज्ज्वला देशमुख यांना ५१५८ सावंगी मेघे येथे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष राहिलेले विलास कांबळे पराभूत झाले आहेत. बहुजन समाजवादी पक्षाचे उमेश जिंदे यांनी काँग्रेसच्या विलास दौड यांचा पराभव करून विजय मिळविला आहे. वायगाव येथे जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती भाजपचे मिलिंद भेंडे यांचा पराभव झाला. वसंतराव आंबटकर यांचाही शेकापूर बाई गटातून पराभव झाला आहे. भाजपमधील किसान आघाडीचे महाराष्ट्र सरचिटणीस प्रशांत इंगळे-तिगावकर यांचा पिपरी मेघे गटात पराभव झाला आहे. अशा पाच प्रतिष्ठेच्या जागांवर भाजप पराभूत झाली आहे.

शिक्षण सभापती पराभूत, शिक्षणाधिकारी विजयी

माजी शिक्षण सभापती मिलिंद भेंडे आणि वसंतराव आंबटकर हे भाजपकडून निवडणूक रिंगणात होते. या दोघांचाही पराभव झाला आहे. तर नुकतेच जिल्हा परिषदेमधून सेवानिवृत्त झालेले शिक्षणाधिकारी धनराज तेलंग राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक जिंकले आहेत. त्यामुळे भाजपची जरी सत्ता असली तरी शिक्षण खात्यावर तेलंग यांच्या चष्म्यातून राष्ट्रवादीची नजर राहणार आहे.

पंचायत समितीवर भाजपचेच वर्चस्व

जिल्हा परिषद सोबतच पंचायत समितीवर भाजपचे वर्चस्व राहिले आहे. येथे एकूण आठ पंचायत समितींपैकी सहा पंचायत समितीवर भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. तर वर्धा आणि सेलू येथे अद्याप कुणालाही स्पष्ट बहुमत मिळाले नाही. त्यामुळे कोण कुणासोबत सत्तेत बसणार हे अद्याप स्पष्ट नाही. सेलू येथे भाजपला सहा आणि काँग्रेसला सह जागा मिळाल्याने येथे ईश्वरचिट्ठीने सत्ता अस्मीकरण ठरेल अशी शक्यता आहे.

पक्षीय संख्या
भाजप : ३२
शिवसेना : ०२
काँग्रेस : १३
राष्ट्रवादी : ०२
बसप : ०२
अपक्ष : ०१
एकूण : ५२

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज