म. टा. वृत्तसेवा, वाशीम
कर्जबाजारीपणा व सततच्या नापिकीला कंटाळून कारंजा तालुक्यातील पोहा येथील शेतकऱ्याने गळफास लावून आत्महत्या केली़ रामेश्वर भगवान सुफलकर (४७), असे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे नाव आहे़ ही घटना शुक्रवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आली.
पोहा येथील शेतकरी रामेश्वर भगवान सुफलकर यांच्याकडे पाच एकर शेती आहे. त्यावर काही बँकांचे कर्ज आहे़ सततच्या नापिकीमुळे बँकांचे कर्ज फेडणे व प्रपंच चालविणे कठीण होऊन बसले होते़ या वैफल्यातून त्यांनी गावातील गुणवंत शिंदे यांच्या शेतातील निंबाच्या झाडाला गळफास लावून आपली जीवनयात्रा संपविली. विदर्भात चार वर्षांपासून सातत्याने नापिकी होत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. सोयाबीननंतर कपाशीवर आशा असताना तिला बोंडअळीने फस्त केले. त्यातून उरलेल्या कापसाला बाजारात भाव मिळाला नाही. रोजच्या जगण्याचाच प्रश्न निर्माण झाल्याने मागील काही महिन्यात विदर्भातील शेतकरी आत्महत्यांमध्ये वाढ झाली आहे. पश्चिम विदर्भच नव्हे तर धानपट्ट्यातही आत्महत्यांचा ग्राफ वाढू लागला आहे.
कर्जबाजारीपणा व सततच्या नापिकीला कंटाळून कारंजा तालुक्यातील पोहा येथील शेतकऱ्याने गळफास लावून आत्महत्या केली़ रामेश्वर भगवान सुफलकर (४७), असे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे नाव आहे़ ही घटना शुक्रवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आली.
पोहा येथील शेतकरी रामेश्वर भगवान सुफलकर यांच्याकडे पाच एकर शेती आहे. त्यावर काही बँकांचे कर्ज आहे़ सततच्या नापिकीमुळे बँकांचे कर्ज फेडणे व प्रपंच चालविणे कठीण होऊन बसले होते़ या वैफल्यातून त्यांनी गावातील गुणवंत शिंदे यांच्या शेतातील निंबाच्या झाडाला गळफास लावून आपली जीवनयात्रा संपविली. विदर्भात चार वर्षांपासून सातत्याने नापिकी होत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. सोयाबीननंतर कपाशीवर आशा असताना तिला बोंडअळीने फस्त केले. त्यातून उरलेल्या कापसाला बाजारात भाव मिळाला नाही. रोजच्या जगण्याचाच प्रश्न निर्माण झाल्याने मागील काही महिन्यात विदर्भातील शेतकरी आत्महत्यांमध्ये वाढ झाली आहे. पश्चिम विदर्भच नव्हे तर धानपट्ट्यातही आत्महत्यांचा ग्राफ वाढू लागला आहे.