नागपूर : विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या घटलेल्या मताधाक्यासाठी पक्षकार्यकर्ते की परिवारातील स्वयंसेवक जबाबदार आहे, याबाबत राजकीय वर्तुळात संशय कल्लोळ उडाला आहे. निवडणुकीत भाजपच्या जागा वाढतील मताधिक्य वाढेल, असे दावे पक्षाच्या सर्व नेत्यांकडून करण्यात येत होते. मात्र दुपारनंतर निकाल बाहेर येत गेले, तसा कार्यकर्त्यांचा उत्साह कमी होत गेला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मताधिक्य जवळपास १ लाखाने वाढेल, असे दावे करण्यात येत होते. नागपूर शहरातल्या दोन आणि जिल्ह्यातल्या तीन अशा पाच जागा संघ मुख्यालय असलेल्या नागपूर जिल्ह्यात कमी झाल्या. याचा मोठा धक्का पक्षनेत्यांना बसला आहे. स्वयंसेवकांनी भाजपच्या विजयात किती सहाय्य केले हादेखील औत्सुक्याचा विषय ठरला आहे. पश्चिम नागपूरमध्ये झालेला पराभव आणि मध्य व दक्षिणमध्ये कमी झालेले मताधिक्य. रामटेकची गेलेली जागा… हे कशामुळे घडून आले यावर पक्षपातळीवर मंथन सुरू झाले आहे.
मतांमधील घटीला जबाबदार कोण?
विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या घटलेल्या मताधाक्यासाठी पक्षकार्यकर्ते की परिवारातील स्वयंसेवक जबाबदार आहे, याबाबत राजकीय वर्तुळात संशय ...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 25 Oct 2019, 4:00 am