पंकज मोहरीर, चंद्रपूर
मागील २५ वर्षांपासून देशात चिमण्यांची संख्या स्थिर असल्याची माहिती 'स्टेट ऑफ इंडियाज बर्डस २०२०'च्या अहवालातून पुढे आली आहे. शहरी भागात किरकोळ घट झाली असली तरी ग्रामीण भागात काहीही फरक पडलेला नाही.
भारतीय वन्यजीव संस्थान, बीएनएचएस, नेचर कन्झर्वेशन फाउंडेशन, राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरण, एनसीबीएस, एसएसीओएन, वेटलॅन्डज इंटरनॅशनल, डब्लूडब्लूएफ यांच्या सहयोगातून सर्वेक्षण करण्यात आले. या अहवालात मोबाइल फोन टॉवरच्या रेडीएशनचा चिमण्यांवर काही परिणाम होतो, याबाबतचे पुरावे मिळाले नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. नेहमी दृष्टीस पडणाऱ्या चिमण्यांची संख्या कमालीची घटल्याची ओरड होत असताना सदर अहवाल दिलासा देणारा आहे.
देशातील बंगळुरु, चेन्नई, दिल्ली, हैदराबाद, कोलकाता व मुंबई या सहा महत्त्वाच्या मोठ्या शहरांत व लगत केलेल्या सर्वेक्षणात किंचित घट दिसून आली. मात्र ग्रामीण भागात आजही चिमण्या सहज दृष्टीस पडतात. चिमण्यांच्या संख्येत शहरी भागातील काही अपवाद वगळता स्थिरता दिसून आली आहे.
समाजाचे स्वरुप दिवसेंदिवस बदलू लागले आहे. कौलारू घरे, वाडे, अंगणातील झाडे राहिली नाहीत. या जागांवर आता बंगले आणि अपार्टमेंट उभारले गेले. त्यामुळे जुन्या घरांमध्ये चिमण्यांचे दिसणारे घरटेही गायब होऊ लागले आहेत. सिमेंटच्या या जंगलाने शहरात चिमणीचे दर्शन कमी होत आहे. त्यामुळे नव्या घराचे बांधकाम करताना बाहेरच्या भिंतींमध्ये छिद्र असलेले डिझायनिगं करण्याचे आवाहन संशोधकांनी केले आहे.
छोटे पक्षी घटले
देशात ॲशिप्रीनिया, इंडियन रॉबिन यासह काही छोट्या पक्ष्यांची संख्या कमालीची घटली असल्याचे समोर आले आहे. ही बाब चिंता वाढविणारी ठरली आहे. कीटकांची संख्या कमी झाल्याने या पक्ष्यांची संख्या कमालीची घटल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे.
मागील २५ वर्षांपासून देशात चिमण्यांची संख्या स्थिर असल्याची माहिती 'स्टेट ऑफ इंडियाज बर्डस २०२०'च्या अहवालातून पुढे आली आहे. शहरी भागात किरकोळ घट झाली असली तरी ग्रामीण भागात काहीही फरक पडलेला नाही.
भारतीय वन्यजीव संस्थान, बीएनएचएस, नेचर कन्झर्वेशन फाउंडेशन, राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरण, एनसीबीएस, एसएसीओएन, वेटलॅन्डज इंटरनॅशनल, डब्लूडब्लूएफ यांच्या सहयोगातून सर्वेक्षण करण्यात आले. या अहवालात मोबाइल फोन टॉवरच्या रेडीएशनचा चिमण्यांवर काही परिणाम होतो, याबाबतचे पुरावे मिळाले नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. नेहमी दृष्टीस पडणाऱ्या चिमण्यांची संख्या कमालीची घटल्याची ओरड होत असताना सदर अहवाल दिलासा देणारा आहे.
देशातील बंगळुरु, चेन्नई, दिल्ली, हैदराबाद, कोलकाता व मुंबई या सहा महत्त्वाच्या मोठ्या शहरांत व लगत केलेल्या सर्वेक्षणात किंचित घट दिसून आली. मात्र ग्रामीण भागात आजही चिमण्या सहज दृष्टीस पडतात. चिमण्यांच्या संख्येत शहरी भागातील काही अपवाद वगळता स्थिरता दिसून आली आहे.
समाजाचे स्वरुप दिवसेंदिवस बदलू लागले आहे. कौलारू घरे, वाडे, अंगणातील झाडे राहिली नाहीत. या जागांवर आता बंगले आणि अपार्टमेंट उभारले गेले. त्यामुळे जुन्या घरांमध्ये चिमण्यांचे दिसणारे घरटेही गायब होऊ लागले आहेत. सिमेंटच्या या जंगलाने शहरात चिमणीचे दर्शन कमी होत आहे. त्यामुळे नव्या घराचे बांधकाम करताना बाहेरच्या भिंतींमध्ये छिद्र असलेले डिझायनिगं करण्याचे आवाहन संशोधकांनी केले आहे.
छोटे पक्षी घटले
देशात ॲशिप्रीनिया, इंडियन रॉबिन यासह काही छोट्या पक्ष्यांची संख्या कमालीची घटली असल्याचे समोर आले आहे. ही बाब चिंता वाढविणारी ठरली आहे. कीटकांची संख्या कमी झाल्याने या पक्ष्यांची संख्या कमालीची घटल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे.