अ‍ॅपशहर

विदर्भात तीन शेतकऱ्यांच्या आत्महत्या

सततची नापिकी, कर्जाचा डोंगर यामुळे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत यवतमाळ जिल्ह्यातील दोन, तर भंडारा जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे.

Maharashtra Times 15 Sep 2017, 4:00 am
म.टा. वृत्तसेवा, यवतमाळ/ भंडारा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम  bhandara three farmers suicide in vidarbbha
विदर्भात तीन शेतकऱ्यांच्या आत्महत्या


सततची नापिकी, कर्जाचा डोंगर यामुळे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत यवतमाळ जिल्ह्यातील दोन, तर भंडारा जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे.

यवतमाळ जिल्ह्याच्या हिवरी येथील संजय भास्कर मालेकर (वय ४०) याने शेतातच आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. घरी न आल्याने त्याच्या कुटुंबियांनी शेतात जाऊन शोध घेतला असता मालेकर शेतात पडून असल्याचे त्यांना ‌आढळले. नातेवाईकांनी त्यांना उपचारासाठी यवतमाळ रुग्णालयात हलविले असता डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. दुसऱ्या घटनेत घोडखिंडी येथील शेतकरी राम काशिनाथ भोटे याने शेतात गळफास लावून आत्महत्या केली. कर्जबाजारीपणाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचे त्याच्या कुटुंबीयांनी सांगितले.

दरम्यान, भंडारा जिल्ह्यातही कर्जबाजारी शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना लाखनी तालुक्यातील पालांदूर येथे गुरुवारी घडली. विजय पतीराम नागलवाडे (वय ४५) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. विजय हे माजी पंचायत समिती सदस्य असून मागील तीन वर्षांपासून शेतातून अपेक्षित उत्पन्न येत नव्हते.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज