अ‍ॅपशहर

‘त्या’ कृषिकेंद्र चालकांवर गुन्हे दाखल करा

जिल्ह्यामध्ये परवाना नसलेले बियाणे, कीटकनाशके विकताना कोणी आढळल्यास त्या कृषिकेंद्र चालकावर एफआयआर दाखल करा, असे आदेश कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी बुधवारी दिले.

Maharashtra Times 5 Oct 2017, 4:00 am
म. टा. वृत्तसेवा, यवतमाळ
महाराष्ट्र टाइम्स.कॉम yeotmal khot orderd to file fir against owners of agroshop
‘त्या’ कृषिकेंद्र चालकांवर गुन्हे दाखल करा


जिल्ह्यामध्ये परवाना नसलेले बियाणे, कीटकनाशके विकताना कोणी आढळल्यास त्या कृषिकेंद्र चालकावर एफआयआर दाखल करा, असे आदेश कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी बुधवारी दिले.

कीटकनाशक फवारणीमुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात विषबाधा होत असल्याचे उघड झाल्यानंतर खोत यांनी यवतमाळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीला जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार सिंगला, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अशोक राठोड आदी उपस्थित होते.

या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सदाभाऊ म्हणाले, फवारणीमुळे विषबाधा होत असल्याचा प्रकार जुलै महिन्यात पहिल्यांदा उघडकीस आला. जिल्हाधिकाऱ्यांनी या विषयावर पहिली बैठक मात्र २५ सप्टेंबर रोजी घेतली. तोपर्यंत कृषी विभाग व आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी जिल्हा प्रशासनाला ही माहितीच दिली नाही. हा अत्यंत गंभीर प्रकार आहे, असे खोत म्हणाले. प्रत्येक गावात यापुढे कृषी ग्राम समिती स्थापन केली जाईल. या समितीमध्ये ग्रामसेवक, प्रगतिशील शेतकरी, कृषी सहायक यांचा समावेश असेल. गावात समस्या निर्माण झाल्यास ही समिती त्यंचा निपटारा करेल, अशी माहितीही खोत यांनी दिली.

शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळावा यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे. राज्यात आज, गुरुवारपासून नाफेड व विपणन मंडळाकडून सोयाबीनची खरेदी आधारभूत किंमत तीन हजार पन्नास रुपयांप्रमाणे सुरू होणार आहे. शेतकऱ्यांना आपला माल घेऊन केंद्रावर जाण्याची गरज नाही. सात बारा, आधार कार्ड घेऊन केंद्रावर नोंदणी केल्यावर त्याला टोकन नंबर मिळेल. खरेदीच्या दिवशी शेतकऱ्याला एसएमएसने कळवण्यात येईल, असेही खोत यांनी सांगितले.

‘कीटकनाशक नव्हे फक्त पाणी’

‘या गंभीर विषयाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मी हा प्रयत्न केला. मात्र, त्या पंपामध्ये कीटकनाशक नव्हे तर साधे पाणी होते,’ असे स्पष्टीकरण शहा यांनी ‘मटा’शी बोलताना दिले. दरम्यान, सिकंदर शहा यांच्यासह नऊ जणांवर १४४, १३५ कलमा अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले. फवारणी यंत्रात कीटकनाशक होते की पाणी याची खात्री पटविण्याचा पोलिसांचा प्रयत्न सुरू असताना शहा यांनी फवारणी यंत्रातील पाणी पिऊन दाखविले. चौकशीअंती त्यांना सोडून देण्यात आले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज