नागपूर: उपराजधानीतील बहुचर्चित आठ वर्षीय बालक युग चांडक अपहरण-हत्याप्रकरणी दोन आरोपींना सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी मरेपर्यंत जन्मठेप ठोठावली. दोन्ही आरोपी पंचवीस वर्षे तुरुंगवास भोगल्याशिवाय माफीचे हक्कदार होऊ शकणार नाही, असे न्यायालयाने आपल्या आदेशात स्पष्ट केले. तसेच हे प्रकरण अतिदुर्मिळ (रेअरेस्ट ऑफ रेअर) घटनांच्या व्याख्येत बसत नसल्याचे निरीक्षण नोंदवित नागपूर सत्र न्यायालयाने ठोठावलेली आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कायम ठेवलेली दुहेरी फाशीची शिक्षा रद्द केली.
राजेश धन्नालाल दवारे व अरविंद अभिलाष सिंग या दोन आरोपींना युग चांडक या बालकाची हत्या, अपहरण व पुरावे नष्ट करण्याच्या आरोपाखाली सत्र न्यायालयाने ४ फेब्रुवारी २०१६ रोजी दोन्ही आरोपींना भादंविच्या कलम ३६४-अ, कलम ३०२ व कलम २०१ अंतर्गत फाशी आणि सात वर्षे सश्रम कारावास आणि पाच हजार रुपये दंड, अशी शिक्षा सुनावली होती. त्यानंतर उच्च न्यायालयाने ५ मे २०१६ रोजी दुहेरी फाशीची शिक्षा कायम ठेवली होती. त्यामुळे आरोपींनी त्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केल्या. त्यावर न्या. उदय ललित, न्या. इंदू मल्होत्रा व न्या. हेमंत गुप्ता यांच्या पूर्णपीठासमोर अंतिम सुनावणी झाली. या प्रकरणी शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशामध्ये दुहेरी फाशी रद्द करून मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. न्यायालयात सरकारतर्फे ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी, आरोपीतर्फे अॅड. युग चौधरी आणि अॅड. अजितसिंग पुंदीर, फिर्यादी डॉ. चांडक यांच्यातर्फे अॅड. राजेंद्र डागा आणि अॅड. राहिल मिर्झा यांनी सरकारी पक्षाला मदत केली.
पत्नीची हत्या; पतीचाही आत्महत्येचा प्रयत्न
असे आहे प्रकरण
आरोपी राजेश हा युगचे वडील डॉ. मुकेश चांडक यांच्या रुग्णालयात कर्मचारी होता. आक्षेपार्ह वर्तणुकीमुळे डॉ. चांडक यांनी त्याला कामावरून काढले होते. त्या रागातून त्याने आरोपी अरविंदसोबत मिळून खंडणीसाठी युगचे अपहरण व हत्या करण्याचा कट रचला. १ सप्टेंबर २०१४ रोजी आरोपींनी युगला दुचाकीवर बसवून कोराडी मार्गाने निर्जन ठिकाणी नेले व तेथे त्याची हत्या केली.
अत्याचारानंतर भावी वधूकडे तीन लाखांची मागणी!
राजेश धन्नालाल दवारे व अरविंद अभिलाष सिंग या दोन आरोपींना युग चांडक या बालकाची हत्या, अपहरण व पुरावे नष्ट करण्याच्या आरोपाखाली सत्र न्यायालयाने ४ फेब्रुवारी २०१६ रोजी दोन्ही आरोपींना भादंविच्या कलम ३६४-अ, कलम ३०२ व कलम २०१ अंतर्गत फाशी आणि सात वर्षे सश्रम कारावास आणि पाच हजार रुपये दंड, अशी शिक्षा सुनावली होती. त्यानंतर उच्च न्यायालयाने ५ मे २०१६ रोजी दुहेरी फाशीची शिक्षा कायम ठेवली होती. त्यामुळे आरोपींनी त्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केल्या. त्यावर न्या. उदय ललित, न्या. इंदू मल्होत्रा व न्या. हेमंत गुप्ता यांच्या पूर्णपीठासमोर अंतिम सुनावणी झाली. या प्रकरणी शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशामध्ये दुहेरी फाशी रद्द करून मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. न्यायालयात सरकारतर्फे ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी, आरोपीतर्फे अॅड. युग चौधरी आणि अॅड. अजितसिंग पुंदीर, फिर्यादी डॉ. चांडक यांच्यातर्फे अॅड. राजेंद्र डागा आणि अॅड. राहिल मिर्झा यांनी सरकारी पक्षाला मदत केली.
पत्नीची हत्या; पतीचाही आत्महत्येचा प्रयत्न
असे आहे प्रकरण
आरोपी राजेश हा युगचे वडील डॉ. मुकेश चांडक यांच्या रुग्णालयात कर्मचारी होता. आक्षेपार्ह वर्तणुकीमुळे डॉ. चांडक यांनी त्याला कामावरून काढले होते. त्या रागातून त्याने आरोपी अरविंदसोबत मिळून खंडणीसाठी युगचे अपहरण व हत्या करण्याचा कट रचला. १ सप्टेंबर २०१४ रोजी आरोपींनी युगला दुचाकीवर बसवून कोराडी मार्गाने निर्जन ठिकाणी नेले व तेथे त्याची हत्या केली.
अत्याचारानंतर भावी वधूकडे तीन लाखांची मागणी!