म.टा. प्रतिनिधी, नागपूर
गेल्या काही दिवसांपासून जिल्हा परिषदेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. दोघांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. दलित विकास निधी अध्यक्ष आणि सभापतींनी लाटल्याचा आरोप अलीकडेच भाजपचे गट नेते अनिल निधान यांनी केला. मात्र भाजपला सत्तापरिवर्तनाचे शल्य बोचत असल्याचेन भाजप सातत्याने या प्रकारची बिनबुडाची टीका करीत असल्याचा पलटवार अध्यक्ष रश्मी बर्वे यांनी केली आहे. जिल्हा परिषदेतील सत्तापरिवर्तनाच्या मानसिक धक्क्यातून विरोधक अद्याप सावरले नसल्याचा टोलाही त्यांनी लावला आहे.
प्रसार माध्यमांशी बोलताना बर्वे म्हणाल्या, 'काही दिवसांपूर्वी त्यांनी शिक्षण विभागात साहित्य खरेदीत घोटाळा झाल्याचा आरोप केला. तो निराधार होता. ही सर्व प्रक्रिया भाजप सत्तेत असतानाची आहे. गेल्या वर्षी खरेदी केलेल्या दरांपेक्षा यंदा आम्ही कमी दरात खरेदी केली. याशिवाय केंद्र शासनाने निश्चित केलेल्या जेम पोर्टलवरूनच खरेदी केली. केंद्राच्या सगळ्या सूचनांचे पालन केले. केवळ विरोधाला विरोध करणे आणि द्वेष भावनेतून आरोप करणे याचा काहीच अर्थ नाही.' निधान यांनी दलित निधीबाबत केलेल्या आरोपाबाबत त्या म्हणाल्या, 'आता त्यांनी दलित निधीचा मुद्दा काढला आहे. मात्र हा निधी आराखड्यानुसार वितरित होतो. त्यात बदल करण्याचा अधिकारच नसतो. आराखड्यानूसारच त्याचे वाटप होते ही बाब गट नेत्यांना ठावूक असणे अपेक्षित आहे. ते सहा महिन्यांपूर्वीच्या यादीच्या आधारावर आरोप करीत आहेत. नवी यादी केव्हा प्रकाशित झाली हे त्यांनीच सांगावे. सध्या २०१९-२० या आर्थिक वर्षाच्याच निधीचे वाटप निकषांनुसार सुरू आहे. त्यात कामठी तालुक्याला सर्वाधिक निधी प्राप्त झाला आहे. केवळ प्रसिद्धीसाठी हा सर्व खटाटोप सुरू आहे.'
गेल्या काही दिवसांपासून जिल्हा परिषदेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. दोघांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. दलित विकास निधी अध्यक्ष आणि सभापतींनी लाटल्याचा आरोप अलीकडेच भाजपचे गट नेते अनिल निधान यांनी केला. मात्र भाजपला सत्तापरिवर्तनाचे शल्य बोचत असल्याचेन भाजप सातत्याने या प्रकारची बिनबुडाची टीका करीत असल्याचा पलटवार अध्यक्ष रश्मी बर्वे यांनी केली आहे. जिल्हा परिषदेतील सत्तापरिवर्तनाच्या मानसिक धक्क्यातून विरोधक अद्याप सावरले नसल्याचा टोलाही त्यांनी लावला आहे.
प्रसार माध्यमांशी बोलताना बर्वे म्हणाल्या, 'काही दिवसांपूर्वी त्यांनी शिक्षण विभागात साहित्य खरेदीत घोटाळा झाल्याचा आरोप केला. तो निराधार होता. ही सर्व प्रक्रिया भाजप सत्तेत असतानाची आहे. गेल्या वर्षी खरेदी केलेल्या दरांपेक्षा यंदा आम्ही कमी दरात खरेदी केली. याशिवाय केंद्र शासनाने निश्चित केलेल्या जेम पोर्टलवरूनच खरेदी केली. केंद्राच्या सगळ्या सूचनांचे पालन केले. केवळ विरोधाला विरोध करणे आणि द्वेष भावनेतून आरोप करणे याचा काहीच अर्थ नाही.' निधान यांनी दलित निधीबाबत केलेल्या आरोपाबाबत त्या म्हणाल्या, 'आता त्यांनी दलित निधीचा मुद्दा काढला आहे. मात्र हा निधी आराखड्यानुसार वितरित होतो. त्यात बदल करण्याचा अधिकारच नसतो. आराखड्यानूसारच त्याचे वाटप होते ही बाब गट नेत्यांना ठावूक असणे अपेक्षित आहे. ते सहा महिन्यांपूर्वीच्या यादीच्या आधारावर आरोप करीत आहेत. नवी यादी केव्हा प्रकाशित झाली हे त्यांनीच सांगावे. सध्या २०१९-२० या आर्थिक वर्षाच्याच निधीचे वाटप निकषांनुसार सुरू आहे. त्यात कामठी तालुक्याला सर्वाधिक निधी प्राप्त झाला आहे. केवळ प्रसिद्धीसाठी हा सर्व खटाटोप सुरू आहे.'