अ‍ॅपशहर

प्रेमभंग झाल्याने तरुणीचा चिरला गळा, ब्रेकअपनंतर नात्यात दुरावा आला अन्....

काही दिवसापासून वैष्णवी आणि सुरेशमध्ये दुरावा निर्माण झाला होता. यापुढे प्रेमसंबध ठेवण्यास तिने नकार दिला. पण प्रेमभंग झाल्याने सुरेश रागात होता. यामुळे वैष्णवी घरी एकटी असल्याचं पाहून तो तिच्या घरी गेला आणि भयंकर कृत्य केलं.

Maharashtra Times 25 Oct 2021, 11:51 am
नांदेड : प्रेमात मनासारखं न झाल्यामुळे गुन्ह्यांच्या धक्कादायक घटना घडल्याच्या अनेक बातम्या आपण पाहिल्या आहेत. असाच एक भयंकर प्रकार नांदेडमध्ये समोर आला आहे. प्रेमभंग झाल्याने प्रियकराने तरुणीचा चाकूने गळा चिरून खून केला. नांदेड शहरातील शारदानगर भागात ही घटना घडली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू असल्याची माहिती आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम crime
प्रेमभंग झाल्याने तरुणीचा चिरळा गळा, ब्रेकअपनंतर नात्यात दुरावा आला अन्....


मिळालेल्या माहितीनुसार, २२ वर्षीय वैष्णवी गौर असं मयत तरुणीचं नाव आहे. शारदा नगर येथील झेंडा चौक पतिसरात भाड्याच्या खोलीत तरुणी आपल्या आई-वडिलांसोबात राहत होती. काही दिवसापासून वैष्णवी आणि सुरेशमध्ये दुरावा निर्माण झाला होता. यापुढे प्रेमसंबध ठेवण्यास तिने नकार दिला. पण प्रेमभंग झाल्याने सुरेश रागात होता. यामुळे वैष्णवी घरी एकटी असल्याचं पाहून तो तिच्या घरी गेला आणि भयंकर कृत्य केलं.
ऐन दिवाळीत एसटी कामगार संपाच्या तयारीत, केली 'ही' मोठी मागणी
अधिक माहितीनुसार, तिचे वडील एका खाजगी शाळेत सुरक्षा रक्षक आहेत. दुपारी घरी आल्यावर सुरेशने तिला जाब विचारला. यावेळी दोघांमध्ये भांडण झाले. यात सुरेशने चक्क चाकू काढून तिचा गळा चिरला. यात तरुणीचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून आरोपीला याच परिसरातून पोलिसांनी ताब्यात घेतलं. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया विमानतळ पोलीस ठाण्यात सुरू आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज