अ‍ॅपशहर

'...तर अशोकराव तुम्ही दहा वर्षे मुख्यमंत्री राहिले असते'

स्वर्गीय विलासराव देशमुख यांची नाराजी ओढवली नसती तर अशोकराव तुम्ही दहा वर्षे मुख्यमंत्री राहिले असते, असं वक्तव्य माजी खासदार भास्करराव पाटील यांनी केलंय. भास्करराव पाटील हे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांचे सख्खे मेहुणे आहेत.

Authored byटीम मटा ऑनलाइन | Edited byटीम मटा ऑनलाइन | Maharashtra Times 25 Jan 2022, 7:21 pm
नांदेड: स्वर्गीय विलासराव देशमुख यांची नाराजी ओढवली नसती तर अशोकराव तुम्ही दहा वर्षे मुख्यमंत्री राहिले असते, असं वक्तव्य माजी खासदार भास्करराव पाटील यांनी केलंय. माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांचे सख्खे मोठे मेहुणे असलेल्या भास्करराव पाटील यांनी नांदेडमध्ये जाहीर कार्यक्रमात हे वक्तव्य केलंय.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम ex mp bhaskarrao patil comment minister ashok chavan cm post
भास्करराव पाटील आणि अशोक चव्हाण


भास्करराव पाटील यांच्या वक्तव्यामुळे एकेकाळी नांदेड- लातूरमधली कटुता आता पुन्हा नव्याने चर्चेत येणार आहे. तर खतगांवकर यांच्या या वक्तव्यावर कार्यक्रमात उपस्थित काँग्रेस कार्यकर्त्यांनी टाळ्या वाजवून त्यांना प्रतिसाद दिलाय.

दरम्यान, महसूल आयुक्तालय नांदेडला करावे, असा ठराव तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी मंत्री मंडळाच्या बैठकीत घेतला होता. त्या ठरावामुळेच स्वर्गीय विलासराव देशमुख नाराज झाले आणि अशोक चव्हाण यांचे मुख्यमंत्री पद गेले असा दावा खतगांवकर यांनी केलाय. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकारणात नवा वाद ओढावण्याची शक्यता आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज