नाशिक : निष्ठा आणि तत्त्वांना तिलांजली देणाऱ्यांना पक्षात घेणे ही अशोभनिय बाब आहे. भ्रमनिराश होऊन राष्ट्रवादीत परतणाऱ्यांना यापुढे रांगेत उभे रहावे लागेल, असा इशारा खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला. भ्रष्टाचाराच्या कारवाईपासून स्वत:ला वाचविण्यासाठी अनेक जण पक्षांतर करीत आहेत. पक्षांतर करणारे आम्हाला सांगून जातात. चौकशी, बँक, कारखाना अशी अडचणी सांगतात. त्यामुळे त्यांच्याबद्दल आमच्या मनात कटूता नसेल. प्रत्येक पक्षात पडझड होते. त्याची सगळीकडे चर्चा होत असली तरी चाळीस वर्षे एकत्र काम केले असल्याने त्याबद्दल वाईट वाटते. निवडणुका नेते जिंकत नसतात. कार्यकर्त्यांच्या जोरावर निवडणूक जिंकता येते. त्यामुळे आता नवीन नेते तयार होतील आणि विधानसभा निवडणुकीत नव्या तरुण रक्ताला वाव मिळेल, असा दावा त्यांनी पक्षांतराबाबत केला.
...
भुजबळांबाबत नरमाईचे धोरण
माजी मंत्री छगन भुजबळ हे बदलत्या राजकीय परिस्थितीमुळे शिवसेनेत जात असल्याची चर्चा जोरात आहे. त्या पार्श्वभूमीवर सुळे यांनी पक्ष सोडणाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. परंतु,मंगळवारी मात्र त्यांनी याबाबत काहीसे नरमाईचे धोरण स्वीकारले. अधिक प्रश्न विचारल्यावर भुजबळांनीच माझा कार्यक्रम निश्चित केला आहे. समीर भुजबळ माझ्यासोबत आहेत अशी जाणीव करून दिली. परंतु, भुजबळ यांच्या प्रवेशाबाबत थेट भाष्य करणे त्यांनी टाळले.