म. टा. प्रतिनिधी, नाशिक
नागरिकांना कॅशलेस व्यवहारांची माहिती देण्यासाठी आणि अशा व्यवहारांची भीती मनातून घालविता यावी यासाठी फेब्रुवारीअखेर किंवा मार्चच्या सुरुवातीला डिजिधन मेळावा होणार आहे. या मेळाव्यात अधिकाधिक नागरिकांनी सहभागी व्हावे, यासाठी मोठ्या प्रमाणावर लकी ड्रॉ काढण्यात येणार आहे. त्या माध्यमातून नागरिक आणि व्यापाऱ्यांना एकूण दीड लाख रुपयांच्या पारितोषिकांचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी शुक्रवारी दिली.
मेळाव्याच्या नियोजनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन केले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर, निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर, तहसीलदार सी. एस. देशमुख, लीड बँक मॅनेजर अशोक चव्हाण, बीएसएनएलचे व्यवस्थापक सुरेशबाबू प्रजापती आदी उपस्थित होते.
यावेळी राधाकृष्णन म्हणाले, नागरिकांमध्ये डिजिटल व्यवहारासंबंधी जागृती निर्माण करणे आणि त्यांना त्याबाबतचे प्रशिक्षण देणे हा मेळावा आयोजनाचा उद्देश आहे. मेळाव्याला केंद्र व राज्यातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत. नागरिकांसाठी आधार नोंदणी, बँक खात्याशी आधार कार्ड किंवा मोबाइल क्रमांक संलग्न करणे आदी सुविधा त्यामध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. डिजिटल व्यवहार करणाऱ्या नशिबवान ग्राहकांना एक कोटी रुपयांपर्यंतची तर व्यापाऱ्यांना ५० लाखांपर्यंतची बक्षिसे देण्यात येणार आहेत.
नागरिकांना कॅशलेस व्यवहारांची माहिती देण्यासाठी आणि अशा व्यवहारांची भीती मनातून घालविता यावी यासाठी फेब्रुवारीअखेर किंवा मार्चच्या सुरुवातीला डिजिधन मेळावा होणार आहे. या मेळाव्यात अधिकाधिक नागरिकांनी सहभागी व्हावे, यासाठी मोठ्या प्रमाणावर लकी ड्रॉ काढण्यात येणार आहे. त्या माध्यमातून नागरिक आणि व्यापाऱ्यांना एकूण दीड लाख रुपयांच्या पारितोषिकांचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी शुक्रवारी दिली.
मेळाव्याच्या नियोजनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन केले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर, निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर, तहसीलदार सी. एस. देशमुख, लीड बँक मॅनेजर अशोक चव्हाण, बीएसएनएलचे व्यवस्थापक सुरेशबाबू प्रजापती आदी उपस्थित होते.
यावेळी राधाकृष्णन म्हणाले, नागरिकांमध्ये डिजिटल व्यवहारासंबंधी जागृती निर्माण करणे आणि त्यांना त्याबाबतचे प्रशिक्षण देणे हा मेळावा आयोजनाचा उद्देश आहे. मेळाव्याला केंद्र व राज्यातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत. नागरिकांसाठी आधार नोंदणी, बँक खात्याशी आधार कार्ड किंवा मोबाइल क्रमांक संलग्न करणे आदी सुविधा त्यामध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. डिजिटल व्यवहार करणाऱ्या नशिबवान ग्राहकांना एक कोटी रुपयांपर्यंतची तर व्यापाऱ्यांना ५० लाखांपर्यंतची बक्षिसे देण्यात येणार आहेत.