म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
महापौरपदी विराजमान होऊन सतीश कुलकर्णी यांना आज २२ नोव्हेंबर रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे. आपल्या वर्षभराच्या कारकिर्दीत त्यांना करोना व लॉकडाउन काळाचेच मोठे आव्हान पेलावे लागले. तरीही या काळात त्यांनी काही चांगले निर्णय घेतले. सर्वसमावेशक व विकासात्मक दृष्टीकोन तसेच सर्वांना बरोबर घेऊन काम करण्याचा प्रयत्न त्यांनी केला.
करोना काळात गोरगरिबांच्या मदतीला धावून जात त्यांनी झोपडपट्टी भागात स्वत: जाऊन अन्नधान्याचे वाटप केले. अनेक कुटुंबांना मदतीचा हात दिला. याच कार्यकाळात आउटसोर्सिंगद्वारे ७०० सफाई कर्मचारी भरती केल्याने अनेकांना रोजगार तर मिळालाच शिवाय शहराच्या स्वच्छतेतही भर पडली. शहरातील नागरिकांच्या मूलभूत गरजा ओळखून त्यांनी विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले. संपूर्ण शहर हे एक वर्षाच्या आत एलईडीमय याच काळात झाले. सात वर्षांपासून प्रलंबित असलेला कर्मचारी पदोन्नतीचा विषय सेवाज्येष्ठता यादी प्रसिद्ध करायला लावून त्यांनी तो मार्गी लावला. वाढीव पाणीआरक्षण मागणी करारनाम्याला मंजुरी, दीनदयाल अंत्योदय योजना, राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत सामाजिक अभिसरण व संस्थात्मक बांधणी या उपायांतर्गत शहरी उपजीविका केंद्र उभारणीकामी जागा निश्चिती करण्यास मंजुरी असे अनेक महत्त्वाचे निर्णय त्यांच्या काळात झाले.
महापौरपदी विराजमान होऊन सतीश कुलकर्णी यांना आज २२ नोव्हेंबर रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे. आपल्या वर्षभराच्या कारकिर्दीत त्यांना करोना व लॉकडाउन काळाचेच मोठे आव्हान पेलावे लागले. तरीही या काळात त्यांनी काही चांगले निर्णय घेतले. सर्वसमावेशक व विकासात्मक दृष्टीकोन तसेच सर्वांना बरोबर घेऊन काम करण्याचा प्रयत्न त्यांनी केला.
करोना काळात गोरगरिबांच्या मदतीला धावून जात त्यांनी झोपडपट्टी भागात स्वत: जाऊन अन्नधान्याचे वाटप केले. अनेक कुटुंबांना मदतीचा हात दिला. याच कार्यकाळात आउटसोर्सिंगद्वारे ७०० सफाई कर्मचारी भरती केल्याने अनेकांना रोजगार तर मिळालाच शिवाय शहराच्या स्वच्छतेतही भर पडली. शहरातील नागरिकांच्या मूलभूत गरजा ओळखून त्यांनी विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले. संपूर्ण शहर हे एक वर्षाच्या आत एलईडीमय याच काळात झाले. सात वर्षांपासून प्रलंबित असलेला कर्मचारी पदोन्नतीचा विषय सेवाज्येष्ठता यादी प्रसिद्ध करायला लावून त्यांनी तो मार्गी लावला. वाढीव पाणीआरक्षण मागणी करारनाम्याला मंजुरी, दीनदयाल अंत्योदय योजना, राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत सामाजिक अभिसरण व संस्थात्मक बांधणी या उपायांतर्गत शहरी उपजीविका केंद्र उभारणीकामी जागा निश्चिती करण्यास मंजुरी असे अनेक महत्त्वाचे निर्णय त्यांच्या काळात झाले.