म. टा. वृत्तसेवा, सातपूर
महापालिकेकडून वारंवार स्वच्छता राखण्याचे आवाहन करण्यात येत असूनदेखील अशोकनगरला पुन्हा डेंग्यूसदृश आजाराची लागण झाली आहे. एकाच आठवड्यात किमान दहा जणांना डेंग्यू झाल्याने महापालिकेच्या मलेरिया व आरोग्य विभागाकडून फवारणी करण्याची मागणी करण्यात येत आहे.
जाधव संकुल, राज्य कर्मचारी वसाहत, निलकंठेश्वरनगर आदी भागात डेंग्यूची लागण झाली आहे. महापालिकेकडून पावसाळ्यापूर्वीची स्वच्छता मोहीम काही भागांतच राबविण्यात आल्याचा आरोप रहिवाशांकडून होत आहे. डेंग्यू सदृश आजाराच्या साथीने रहिवाशी भयभीत झाले आहेत. महापालिकेने पुन्हा मलेरिया विभागाकडून औषध फवारणी करावी अशीही मागणी रहिवाशांनी केली आहे.
जाधव संकुल भागात अनेक मोकळे भूखंड आहेत. त्याठिकाणी सर्रासपणे कचरा टाकण्यात येतो. तसेच उघड्यावर नारळाच्या करवंट्या टाकण्यात येतात. त्यात पाणी साचून डासांची उत्पत्ती होते. पावसाळी गटारींच्या साचलेल्या ढाप्यांमध्येही डास तयार होतात. महापालिकेने संबंधित ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविली पाहिजे.
- सुभाष गुंबाडे, नागरिक
महापालिकेकडून वारंवार स्वच्छता राखण्याचे आवाहन करण्यात येत असूनदेखील अशोकनगरला पुन्हा डेंग्यूसदृश आजाराची लागण झाली आहे. एकाच आठवड्यात किमान दहा जणांना डेंग्यू झाल्याने महापालिकेच्या मलेरिया व आरोग्य विभागाकडून फवारणी करण्याची मागणी करण्यात येत आहे.
जाधव संकुल, राज्य कर्मचारी वसाहत, निलकंठेश्वरनगर आदी भागात डेंग्यूची लागण झाली आहे. महापालिकेकडून पावसाळ्यापूर्वीची स्वच्छता मोहीम काही भागांतच राबविण्यात आल्याचा आरोप रहिवाशांकडून होत आहे. डेंग्यू सदृश आजाराच्या साथीने रहिवाशी भयभीत झाले आहेत. महापालिकेने पुन्हा मलेरिया विभागाकडून औषध फवारणी करावी अशीही मागणी रहिवाशांनी केली आहे.
जाधव संकुल भागात अनेक मोकळे भूखंड आहेत. त्याठिकाणी सर्रासपणे कचरा टाकण्यात येतो. तसेच उघड्यावर नारळाच्या करवंट्या टाकण्यात येतात. त्यात पाणी साचून डासांची उत्पत्ती होते. पावसाळी गटारींच्या साचलेल्या ढाप्यांमध्येही डास तयार होतात. महापालिकेने संबंधित ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविली पाहिजे.
- सुभाष गुंबाडे, नागरिक