मटा ऑनलाइन वृत्त । शिर्डी
बहुप्रतिक्षीत शिर्डी विमानतळाचे लोकार्पण होऊन दोन दिवस उलटत नाही तोच विमान कंपन्यांनी आपली मनमानी सुरू केली आहे. २२०० रुपयांऐवजी विमान कंपन्या प्रवाशांकडून तब्बल १० हजारांपेक्षा अधिक भाडे वसूल करीत आहेत.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते दोन दिवसापूर्वी या विमानतळाचे लोकार्पण पार पडले. हैदराबादला जाण्यासाठी विमान कंपन्यांनी २२०० रुपये भाडे आकारले होते. परंतु, प्रवाशांकडून मोठा प्रतिसाद मिळाल्यानंतर विमान कंपन्यांनी विमान भाड्यात भरमसाठ वाढ केली. शिर्डी ते हैदराबाद या प्रवासासाठी विमान कंपन्या एका प्रवाशाकडून तब्बल १०,७५० रुपये आकारत आहेत.
विमानतळाचे लोकार्पण झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी शिर्डीहून हैदराबादकडे जाणारे एअर अलायंस कंपनीचे विमान रद्द करण्याची वेळ आली होती. तसेच हैदराबादहून शिर्डीला येणारे विमान शिर्डीत अर्धा तास उशिराने पोहोचले होते. केंद्र सरकारच्या 'उडान' योजनेत शिर्डी विमातळाचा समावेश करण्यात आला नसल्याचे बोलले जात आहे. शिर्डीचा या योजनेत समावेश झाल्यास प्रवाशांना आणखी फायदा मिळू शकतो. परंतु विमान सुरू होऊन दोन दिवस होत नाही तोच कंपन्यांनी अशी भरमसाठ भाडेवाढ करणं हे अन्यायकारक आहे, असे प्रवाशांनी म्हटल आहे.
बहुप्रतिक्षीत शिर्डी विमानतळाचे लोकार्पण होऊन दोन दिवस उलटत नाही तोच विमान कंपन्यांनी आपली मनमानी सुरू केली आहे. २२०० रुपयांऐवजी विमान कंपन्या प्रवाशांकडून तब्बल १० हजारांपेक्षा अधिक भाडे वसूल करीत आहेत.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते दोन दिवसापूर्वी या विमानतळाचे लोकार्पण पार पडले. हैदराबादला जाण्यासाठी विमान कंपन्यांनी २२०० रुपये भाडे आकारले होते. परंतु, प्रवाशांकडून मोठा प्रतिसाद मिळाल्यानंतर विमान कंपन्यांनी विमान भाड्यात भरमसाठ वाढ केली. शिर्डी ते हैदराबाद या प्रवासासाठी विमान कंपन्या एका प्रवाशाकडून तब्बल १०,७५० रुपये आकारत आहेत.
विमानतळाचे लोकार्पण झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी शिर्डीहून हैदराबादकडे जाणारे एअर अलायंस कंपनीचे विमान रद्द करण्याची वेळ आली होती. तसेच हैदराबादहून शिर्डीला येणारे विमान शिर्डीत अर्धा तास उशिराने पोहोचले होते. केंद्र सरकारच्या 'उडान' योजनेत शिर्डी विमातळाचा समावेश करण्यात आला नसल्याचे बोलले जात आहे. शिर्डीचा या योजनेत समावेश झाल्यास प्रवाशांना आणखी फायदा मिळू शकतो. परंतु विमान सुरू होऊन दोन दिवस होत नाही तोच कंपन्यांनी अशी भरमसाठ भाडेवाढ करणं हे अन्यायकारक आहे, असे प्रवाशांनी म्हटल आहे.