म. टा. वृत्तसेवा, मालेगाव
गेल्या काही वर्षांपासून घटलेले पर्जन्यमान आणि पावसाचा लहरीपणा यामुळे तालुक्यात सातत्याने दुष्काळी परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. मात्र शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेने तालुक्यातील गावांचे हे पाण्याचे दूर्भिक्षक मिटले आहे. सन २०१५-१६ मध्ये तालुक्यातील एकूण १६ गावांमध्ये जलयुक्तची एकूण ७३२ कामे पूर्ण झाली असून, या गावांची पाण्याची गरज पूर्ण करण्यात आली आहे. या उल्लेखनीय कामांची दखल शासनाने घेतली असून, जलयुक्तचा जिल्हास्तरीय पुरस्कार तालुक्यास जाहीर झाला आहे. पुरस्कारार्थी गावात तालुक्यातील गाळणेचा देखील समावेश आहे.
शनिवारी धुळे येथे जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. तालुक्यात सरासरी ४८० मिमी इतके पर्जन्यमान असल्याने पाण्याची उपलब्धता वाढावी यासाठी जलयुक्त शिवार अभियाअंतर्गत निवडण्यात आलेल्या १६ गावांमध्ये कृषी, लघु पाटबंधारे, लघुसिंचन, वनविभाग, सामाजिक वनीकरण या शासनाच्या विभागांनी एकत्रितपणे सुमारे १५ कोटीची ७३२ कामे पूर्ण केली. शासनाच्या योजना व लोकासाभागातून ही कामे पूर्णत्वास आली. १६ गावे जलयुक्त झाली आहेत. याचा शेतकऱ्यांना लाभ झाला आहे. एकूण २१८ शेतकऱ्यांना ठिबक सिंचन मिळाले आहे.
गाळणे ठरले मानकरी
जलयुक्तच्या पुरस्कारात तालुक्यातील गाळणे गाव देखील पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. सन २०१५ १६ वर्षात कोरडवाहू शेती विकास अभियान निकषानुसार या गावाची जलयुक्तसाठी निवड करण्यात आली होती. कोरडवाहू क्षेत्र मोठ्या प्रमाणावर असलेल्या गाळणेगावाचे चित्र पालटले असून, ते पाणीदार गाव झाले आहे.
कृषी विभागाची आघाडी
तालुक्यात तसेच पुरस्कारप्राप्त गाळणे गावात देखील जलयुक्तच्या कामे करण्यात येथील कृषी विभागाने आघाडी घेतली आहे. तालूक्यातील एकूण ७३२ कामांपैकी ३७३ कामे तर गाळणे येथील ९१ पैकी ५५ कामे ही कृषी विभागाकडून करण्यात आली आहेत.
गेल्या काही वर्षांपासून घटलेले पर्जन्यमान आणि पावसाचा लहरीपणा यामुळे तालुक्यात सातत्याने दुष्काळी परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. मात्र शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेने तालुक्यातील गावांचे हे पाण्याचे दूर्भिक्षक मिटले आहे. सन २०१५-१६ मध्ये तालुक्यातील एकूण १६ गावांमध्ये जलयुक्तची एकूण ७३२ कामे पूर्ण झाली असून, या गावांची पाण्याची गरज पूर्ण करण्यात आली आहे. या उल्लेखनीय कामांची दखल शासनाने घेतली असून, जलयुक्तचा जिल्हास्तरीय पुरस्कार तालुक्यास जाहीर झाला आहे. पुरस्कारार्थी गावात तालुक्यातील गाळणेचा देखील समावेश आहे.
शनिवारी धुळे येथे जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. तालुक्यात सरासरी ४८० मिमी इतके पर्जन्यमान असल्याने पाण्याची उपलब्धता वाढावी यासाठी जलयुक्त शिवार अभियाअंतर्गत निवडण्यात आलेल्या १६ गावांमध्ये कृषी, लघु पाटबंधारे, लघुसिंचन, वनविभाग, सामाजिक वनीकरण या शासनाच्या विभागांनी एकत्रितपणे सुमारे १५ कोटीची ७३२ कामे पूर्ण केली. शासनाच्या योजना व लोकासाभागातून ही कामे पूर्णत्वास आली. १६ गावे जलयुक्त झाली आहेत. याचा शेतकऱ्यांना लाभ झाला आहे. एकूण २१८ शेतकऱ्यांना ठिबक सिंचन मिळाले आहे.
गाळणे ठरले मानकरी
जलयुक्तच्या पुरस्कारात तालुक्यातील गाळणे गाव देखील पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. सन २०१५ १६ वर्षात कोरडवाहू शेती विकास अभियान निकषानुसार या गावाची जलयुक्तसाठी निवड करण्यात आली होती. कोरडवाहू क्षेत्र मोठ्या प्रमाणावर असलेल्या गाळणेगावाचे चित्र पालटले असून, ते पाणीदार गाव झाले आहे.
कृषी विभागाची आघाडी
तालुक्यात तसेच पुरस्कारप्राप्त गाळणे गावात देखील जलयुक्तच्या कामे करण्यात येथील कृषी विभागाने आघाडी घेतली आहे. तालूक्यातील एकूण ७३२ कामांपैकी ३७३ कामे तर गाळणे येथील ९१ पैकी ५५ कामे ही कृषी विभागाकडून करण्यात आली आहेत.