नाशिक : शहरातील पाणीगळती रोखण्यासह पाणीपुरवठा यंत्रणा सक्षम करण्यासाठी अमृत योजनेंतर्गत तीनशे कोटी रुपयांचा आराखडा शासनाला सादर केला आहे. त्यातील २०५ कोटींच्या कामाला अमृत योजनेंतर्गत तत्वत: मंजुरी मिळाल्याची माहिती आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिली. पाणीकपातीवरून नगरसेवकांच्या प्रश्नांना उत्तरे देताना आयुक्तांनी कपात का करावी लागली, त्याची वस्तुस्थिती मांडली. गंगापूर धरणात ५४ टक्के पाणी असले तरी, त्या पाण्यावर इतर आरक्षण अवलंबून आहे. त्यामुळे पाण्याची बचत करण्याशिवाय पर्याय नसल्याचे आयुक्तांनी सांगितले. शासनाकडून २०५ कोटींचा निधी मंजूर झाल्यास त्यातून शहरातील जुन्या पाइपलाइन बदलणे, नवीन वसाहतींमध्ये पाइपलाइन टाकणे आदी कामे केली जातील. बांधकामविषयक कामे महापालिकेच्या निधीतून करण्याच्या सूचना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून देण्यात आल्याची माहिती आयुक्त गमे यांनी दिली. त्यानंतर नगरसेवकाचा राग काहीसा शांत झाला.
पाणीगळती रोखण्यासाठी २०५ कोटी
शहरातील पाणीगळती रोखण्यासह पाणीपुरवठा यंत्रणा सक्षम करण्यासाठी अमृत योजनेंतर्गत तीनशे कोटी रुपयांचा आराखडा शासनाला सादर केला आहे...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 20 Jul 2019, 4:00 am