उत्तराखंडमध्ये ३३२ जण अडकले; २७ पासून परतीचा प्रवास
म. टा. प्रतिनिधी, नाशिक
उत्तराखंडमधील विष्णूप्रयागजवळ हत्ती पर्वत (हाथी पहाडी) येथे भूस्खलन झाल्याने चारधाम यात्रा विस्कळीत झाली आहे. देशभरातील १५ हजार भाविक तेथे अडकून पडले असून, नाशिकच्या ३३२ भाविकांचाही त्यात समावेश आहे. नाशिकचे सर्व भाविक सुरक्षित असल्याची माहिती यात्रा कंपन्यांचे व्यवस्थापक तसेच जिल्हा प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे.
या घटनेची माहिती मिळताच नाशिक जिल्हा प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी प्रशांत वाघमारे यांनी सतर्कता दाखवित सर्व यात्रा कंपन्यांच्या व्यवस्थापकांशी संपर्क साधला. तसेच नाशिकहून गेलेले भाविक आणि त्यांच्या सुरक्षेबाबतची माहिती जाणून घेतली. जिल्हा प्रशासनाच्यावतीने आवश्यक ती मदत करण्याचे आश्वासन यात्रा कंपन्यांना देण्यात आले आहे. श्रीराम यात्रा कंपनीच्या माध्यमातून नाशिकमधील ९६ भाविक या यात्रेसाठी गेले असून, ते सर्वजण गंगोत्री येथे सुरक्षित असल्याचे कंपनीचे संचालक रामावतार चौधरी यांनी कळविले आहे. या भाविकांचा परतीचा प्रवास २७ मे रोजी सुरू होणार आहे. चौधरी यात्रा कंपनीमार्फत १०० भाविक यात्रेसाठी गेले आहेत. ते सर्व सुरक्षित असल्याचे यात्रा कंपनीचे ब्रिजमोहन चौधरी यांनी कळविले आहे. कळवणमधील २० भाविक अडकले असून, त्यांना सुरक्षितस्थळी हलविले आहे.
दिंडोरीरोडवरील वृंदावननगर येथील रहिवासी संजय वाबळे (वय ५८) आणि रोहिणी वाबळे (वय ५५) हे भाविक चारधाम यात्रेसाठी १४ मे रोजी मुंबईहून रवाना झाले होत. सध्या ते सितापूर येथे आहेत. नियोजनानूसार ते २६ मे रोजी मुंबईत परणार आहेत, असे केसरी टुर्सच्या नाशिक कार्यालयातील रेणुका देशमुख यांनी प्रशासनाला कळविले आहे. निफाड येथील बापू गिते (वय ३३), शकुंतला गिते (वय ४९), चिंधु नेताळकर हे भाविक ११ मे रोजी नाशिकरोड येथून रेल्वेने बद्रिनाथ, केदारनाथ यात्रेसाठी रवाना झाले. ते केदारनाथपासून ५० किलोमीटरवर सुखरुप असल्याचे बाबा गिते यांनी कळविले आहे. यात्रा कंपनीची मदत न घेता मनोहर देसले (वय २८), सुमन देसले (वय ५३) यांसह सात भाविक मालेगाव येथून गेले आहेत. १२ मे रोजी ते सर्व चाळीसगाव येथून ॠषीकेशकडे रवाना झाले. येवला येथील ११० भाविक खासगीरित्या यात्रेसाठी रवाना झाले आहेत. हे भाविक घटनास्थळापासून १०० किलोमीटरवर आहेत.
म. टा. प्रतिनिधी, नाशिक
उत्तराखंडमधील विष्णूप्रयागजवळ हत्ती पर्वत (हाथी पहाडी) येथे भूस्खलन झाल्याने चारधाम यात्रा विस्कळीत झाली आहे. देशभरातील १५ हजार भाविक तेथे अडकून पडले असून, नाशिकच्या ३३२ भाविकांचाही त्यात समावेश आहे. नाशिकचे सर्व भाविक सुरक्षित असल्याची माहिती यात्रा कंपन्यांचे व्यवस्थापक तसेच जिल्हा प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे.
या घटनेची माहिती मिळताच नाशिक जिल्हा प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी प्रशांत वाघमारे यांनी सतर्कता दाखवित सर्व यात्रा कंपन्यांच्या व्यवस्थापकांशी संपर्क साधला. तसेच नाशिकहून गेलेले भाविक आणि त्यांच्या सुरक्षेबाबतची माहिती जाणून घेतली. जिल्हा प्रशासनाच्यावतीने आवश्यक ती मदत करण्याचे आश्वासन यात्रा कंपन्यांना देण्यात आले आहे. श्रीराम यात्रा कंपनीच्या माध्यमातून नाशिकमधील ९६ भाविक या यात्रेसाठी गेले असून, ते सर्वजण गंगोत्री येथे सुरक्षित असल्याचे कंपनीचे संचालक रामावतार चौधरी यांनी कळविले आहे. या भाविकांचा परतीचा प्रवास २७ मे रोजी सुरू होणार आहे. चौधरी यात्रा कंपनीमार्फत १०० भाविक यात्रेसाठी गेले आहेत. ते सर्व सुरक्षित असल्याचे यात्रा कंपनीचे ब्रिजमोहन चौधरी यांनी कळविले आहे. कळवणमधील २० भाविक अडकले असून, त्यांना सुरक्षितस्थळी हलविले आहे.
दिंडोरीरोडवरील वृंदावननगर येथील रहिवासी संजय वाबळे (वय ५८) आणि रोहिणी वाबळे (वय ५५) हे भाविक चारधाम यात्रेसाठी १४ मे रोजी मुंबईहून रवाना झाले होत. सध्या ते सितापूर येथे आहेत. नियोजनानूसार ते २६ मे रोजी मुंबईत परणार आहेत, असे केसरी टुर्सच्या नाशिक कार्यालयातील रेणुका देशमुख यांनी प्रशासनाला कळविले आहे. निफाड येथील बापू गिते (वय ३३), शकुंतला गिते (वय ४९), चिंधु नेताळकर हे भाविक ११ मे रोजी नाशिकरोड येथून रेल्वेने बद्रिनाथ, केदारनाथ यात्रेसाठी रवाना झाले. ते केदारनाथपासून ५० किलोमीटरवर सुखरुप असल्याचे बाबा गिते यांनी कळविले आहे. यात्रा कंपनीची मदत न घेता मनोहर देसले (वय २८), सुमन देसले (वय ५३) यांसह सात भाविक मालेगाव येथून गेले आहेत. १२ मे रोजी ते सर्व चाळीसगाव येथून ॠषीकेशकडे रवाना झाले. येवला येथील ११० भाविक खासगीरित्या यात्रेसाठी रवाना झाले आहेत. हे भाविक घटनास्थळापासून १०० किलोमीटरवर आहेत.