म. टा. वृत्तसेवा, घोटी
इगतपुरी तालुक्यातील ३३५४ शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेचा लाभ मिळाला आहे. आतापर्यंत तालुक्यात कर्जमाफीपोटी एकूण १२ कोटी ७२ लाखांची रक्कम मिळाली आहे. यात नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना २५ टक्के प्रोत्साहन अनुदानही प्राप्त झाले आहे. तर, दीड लाखाच्या आत थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांची संपूर्ण रक्कम माफ झाली आहे. बँकाकडून ही कर्जमाफीचा रक्कम शेतकऱ्यांच्या कर्जखाती वर्ग करण्यात आल्याची माहिती बँक अधिकाऱ्यांनी दिली.
गेल्या दोन दिवसांपासून शेतकऱ्यांच्या कर्जखाती कर्जमाफीच्या रक्कम वर्ग होण्यास प्रारंभ झाला असून, शेतकऱ्यांना याबाबत संदेशही मोबाइलवर प्राप्त होऊ लागले आहेत. इगतपुरी तालुक्यात एनडीसीसी बँकेकडून सर्वाधिक कर्जाचा पुरवठा करण्यात आला आहे. दरम्यान, दीड लाखावरील थकीत कर्जदारांना उर्वरित रक्कम ३१ मार्चपर्यंत भरावी लागणार आहे.
इगतपुरी तालुक्यात सर्वाधिक शेतकरी कर्ज जिल्हा बँकेच्या माध्यमातून वाटप करण्यात आले होते. शासनाच्या या कर्जमाफी योजनेनुसार ३ हजार ३५४ शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ झाला असून, १२ कोटी ७२ लाख २० हजार २३७ रुपयांची कर्जमाफी झाली आहे. त्यापैकी ३२११ शेतकरी लाभार्थ्यांना १२ कोटी ३५ लाख ४२ हजार ३८४ रुपयांचे शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आल्याची माहिती बँकेच्या सूत्रांनी दिली.
इगतपुरी तालुक्यातील ३३५४ शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेचा लाभ मिळाला आहे. आतापर्यंत तालुक्यात कर्जमाफीपोटी एकूण १२ कोटी ७२ लाखांची रक्कम मिळाली आहे. यात नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना २५ टक्के प्रोत्साहन अनुदानही प्राप्त झाले आहे. तर, दीड लाखाच्या आत थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांची संपूर्ण रक्कम माफ झाली आहे. बँकाकडून ही कर्जमाफीचा रक्कम शेतकऱ्यांच्या कर्जखाती वर्ग करण्यात आल्याची माहिती बँक अधिकाऱ्यांनी दिली.
गेल्या दोन दिवसांपासून शेतकऱ्यांच्या कर्जखाती कर्जमाफीच्या रक्कम वर्ग होण्यास प्रारंभ झाला असून, शेतकऱ्यांना याबाबत संदेशही मोबाइलवर प्राप्त होऊ लागले आहेत. इगतपुरी तालुक्यात एनडीसीसी बँकेकडून सर्वाधिक कर्जाचा पुरवठा करण्यात आला आहे. दरम्यान, दीड लाखावरील थकीत कर्जदारांना उर्वरित रक्कम ३१ मार्चपर्यंत भरावी लागणार आहे.
इगतपुरी तालुक्यात सर्वाधिक शेतकरी कर्ज जिल्हा बँकेच्या माध्यमातून वाटप करण्यात आले होते. शासनाच्या या कर्जमाफी योजनेनुसार ३ हजार ३५४ शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ झाला असून, १२ कोटी ७२ लाख २० हजार २३७ रुपयांची कर्जमाफी झाली आहे. त्यापैकी ३२११ शेतकरी लाभार्थ्यांना १२ कोटी ३५ लाख ४२ हजार ३८४ रुपयांचे शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आल्याची माहिती बँकेच्या सूत्रांनी दिली.