दळवटला शासकीय इतमामात अंत्यसंस्कार;हजारोंच्या जनसमुदायाची उपस्थिती
म. टा. वृत्तसेवा, कळवण
जिल्ह्यात आपल्या कर्तृत्व व नेतृत्वाची चुणूक दाखवत सर्वांसमोर आपल्या कामांचा आदर्श ठेवून गेलेले माजी मंत्री अर्जुन तुळशीराम पवार यांच्यावर गुरुवारी (दि. ११) सकाळी ११.३० वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. अत्यंत शोकाकुल वातावरणात पोलिसांनी दिलेल्या शासकीय मानवंदनेद्वारे कळवण तालुक्यातील दळवट या त्यांच्या मूळगावी त्यांचे ज्येष्ठ सुपुत्र व जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार यांनी त्यांच्या पार्थिवाला अग्निडाग दिला.
ज्या गावात जन्म घेतला, वाढलो त्या मातीशी इमान बाळगणाऱ्या या पाणीदार नेतृत्वाची शेवटची इच्छाच होती ती, माझं अखेरचं कार्य या गावातच करण्यात यावे. म्हणून पत्नी शकुंतलाताई, पुत्र नितीन, प्रवीण, स्नुषा जयश्री, डॉ. भारती, कन्या डॉ. विजया, गीतांजली व सर्व कौटुंबिक सदस्य, नातेवाईक, राजकीय पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थांनी ए. टी. पवारांना अखेरचा निरोप दिला.
विकासासाठी झटणाऱ्या या सर्वांगीण व निगर्वी नेतृत्वाला कळवणकरांनी तब्बल आठ वेळा प्रतिनिधित्व देत विधानसभेत पाठवले. न बोलता आपल्या कामातून आपली आगळीवेगळी छाप पडणाऱ्या ए. टी. पवारांना अखेरचा निरोप देण्यासाठी शासनाचे प्रतिनिधी तथा पालकमंत्री गिरीश महाजन, ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड, खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार जे. पी. गावित, आमदार बाळासाहेब सानप, डॉ. राहुल आहेर, नाशिकच्या महापौर रंजना भानशी, आमदार नरहरी झिरवाळ, सीमा हिरे, जयप्रकाश छाजेड, माजी आमदार अनिल आहेर, शरद आहेर, माजी खासदार बापू चौरे, डी. एस. अहिरे, रवींद्र पगार, जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन, जिल्हा परिषद अध्यक्षा शीतल सांगळे, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना, मिलिंद शमभरकर यांच्यासह आयुक्त इंद्रजित भालेराव, प्रांत गंगाधरण उपस्थित होते.
मुंबई येथे बुधवारी (दि. १०) माजी आमदार ए. टी. पवार यांचे निधन झाले. त्यांचे पार्थिव नाशिकला आणण्यापूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह नेत्यांनी त्यांचे अंतिम दर्शन घेत श्रद्धांजली वाहिली. आपल्या आवडत्या नेत्याचे अंतिम दर्शन घेण्यासाठी रात्री उशिरापर्यंत मोठ्या संख्येने नागरिकांनी गर्दी केली होती. शोकसभेत आपल्या भावना व्यक्त करताना पालकमंत्री गिरीश महाजन यांनी ए. टी. पवारांशी आलेल्या संबंधांचा उहापोह केला. युती शासनात ते मंत्री असल्याचे सांगत त्यांच्या कार्यपद्धतीचा अभ्यास मला करता आला. विकासाच्या वाटेवर मार्गक्रमण करणारा असा नेता होणे नाही, अशा भावना व्यक्त केल्या. nashik pharmacy college
म. टा. वृत्तसेवा, कळवण
जिल्ह्यात आपल्या कर्तृत्व व नेतृत्वाची चुणूक दाखवत सर्वांसमोर आपल्या कामांचा आदर्श ठेवून गेलेले माजी मंत्री अर्जुन तुळशीराम पवार यांच्यावर गुरुवारी (दि. ११) सकाळी ११.३० वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. अत्यंत शोकाकुल वातावरणात पोलिसांनी दिलेल्या शासकीय मानवंदनेद्वारे कळवण तालुक्यातील दळवट या त्यांच्या मूळगावी त्यांचे ज्येष्ठ सुपुत्र व जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार यांनी त्यांच्या पार्थिवाला अग्निडाग दिला.
ज्या गावात जन्म घेतला, वाढलो त्या मातीशी इमान बाळगणाऱ्या या पाणीदार नेतृत्वाची शेवटची इच्छाच होती ती, माझं अखेरचं कार्य या गावातच करण्यात यावे. म्हणून पत्नी शकुंतलाताई, पुत्र नितीन, प्रवीण, स्नुषा जयश्री, डॉ. भारती, कन्या डॉ. विजया, गीतांजली व सर्व कौटुंबिक सदस्य, नातेवाईक, राजकीय पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थांनी ए. टी. पवारांना अखेरचा निरोप दिला.
विकासासाठी झटणाऱ्या या सर्वांगीण व निगर्वी नेतृत्वाला कळवणकरांनी तब्बल आठ वेळा प्रतिनिधित्व देत विधानसभेत पाठवले. न बोलता आपल्या कामातून आपली आगळीवेगळी छाप पडणाऱ्या ए. टी. पवारांना अखेरचा निरोप देण्यासाठी शासनाचे प्रतिनिधी तथा पालकमंत्री गिरीश महाजन, ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड, खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार जे. पी. गावित, आमदार बाळासाहेब सानप, डॉ. राहुल आहेर, नाशिकच्या महापौर रंजना भानशी, आमदार नरहरी झिरवाळ, सीमा हिरे, जयप्रकाश छाजेड, माजी आमदार अनिल आहेर, शरद आहेर, माजी खासदार बापू चौरे, डी. एस. अहिरे, रवींद्र पगार, जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन, जिल्हा परिषद अध्यक्षा शीतल सांगळे, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना, मिलिंद शमभरकर यांच्यासह आयुक्त इंद्रजित भालेराव, प्रांत गंगाधरण उपस्थित होते.
मुंबई येथे बुधवारी (दि. १०) माजी आमदार ए. टी. पवार यांचे निधन झाले. त्यांचे पार्थिव नाशिकला आणण्यापूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह नेत्यांनी त्यांचे अंतिम दर्शन घेत श्रद्धांजली वाहिली. आपल्या आवडत्या नेत्याचे अंतिम दर्शन घेण्यासाठी रात्री उशिरापर्यंत मोठ्या संख्येने नागरिकांनी गर्दी केली होती. शोकसभेत आपल्या भावना व्यक्त करताना पालकमंत्री गिरीश महाजन यांनी ए. टी. पवारांशी आलेल्या संबंधांचा उहापोह केला. युती शासनात ते मंत्री असल्याचे सांगत त्यांच्या कार्यपद्धतीचा अभ्यास मला करता आला. विकासाच्या वाटेवर मार्गक्रमण करणारा असा नेता होणे नाही, अशा भावना व्यक्त केल्या. nashik pharmacy college