अ‍ॅपशहर

‘काळ्यापाण्या’च्या खाईतून ‘अभिनव’ची सुटका?

नाशिक : ब्रिटीश राजवटीपुढेही ज्या ‘अभिनव भारत मंदिर’ ऐतिहासिक वास्तूने कधी मान तुकवली नाही, त्या वास्तूवर नाशिक महापालिकेच्या ‘ब्लू लाईन झोन’या शिक्क्यामुळे नामोहरम होण्याची दुर्दैवी वेळ आली आहे.

जितेंद्र तरटे | Maharashtra Times 28 May 2017, 4:00 am
नाशिक : ब्रिटीश राजवटीपुढेही ज्या ‘अभिनव भारत मंदिर’ ऐतिहासिक वास्तूने कधी मान तुकवली नाही, त्या वास्तूवर नाशिक महापालिकेच्या ‘ब्लू लाईन झोन’या शिक्क्यामुळे नामोहरम होण्याची दुर्दैवी वेळ आली आहे. ही वास्तू पुररेषेत येत असल्याने तिच्या जिर्णोद्धारास येत असलेला तांत्रिक अडसर त्यांच्या जयंतीच्या औचित्यावरच आज (२८ मे) मुख्यमंत्र्यांच्या हस्तेच दूर होण्याची आशा सावरकरप्रेमींमध्ये एकटवली आहे. या ऐतिहासिक वाड्याचा काही भागही अखेरच्या घटका मोजत आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम abhinav bharat mandir blue line problem
‘काळ्यापाण्या’च्या खाईतून ‘अभिनव’ची सुटका?


सावरकर जयंतीचे औचित्य साधत त्यांच्या जन्मस्थानी भगूरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अभिवादन करणार आहेत. तत्पुर्वी, अभिनव भारत मंदिर ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांकडून गेल्या आठवड्यापर्यंत मुख्यमंत्र्यांकडे या मंदिराच्या जीर्णोध्दारातील तांत्रिक अडसर दूर करण्याकरिता सातत्याने पाठपुरावा करण्यात आला आहे.

‘मित्रमेळा’ आणि ‘अभिनव भारत’ या संघटनांच्या स्थापनेची साक्षीदार असणारी ही तीळभांडेश्वर लेनमधील वास्तू जीर्णोद्धाराच्या निमित्ताने यापूर्वीही वारंवार चर्चेत आली. मनसेच्या सत्ताकाळात तर या वास्तूच्या पुनरुत्थानासाठी एकीकडे तब्बल ५० लाखांचा निधीही मंजूर झाला होता, पण दुसरीकडे वास्तू पुराच्या ‘ब्लू लाईन झोन’मध्ये असल्याचीही मेख मारली गेली होती. आता मात्र या वास्तूच्या घरात विराजमान पापग्रहास शहरात भाजपच्या तीन आमदारांसह राज्यात अन् केंद्रातसुद्धा भाजप सरकारचा जालीम उतारा असल्याने ‘ब्लू लाईन’ची तांत्रिक शांती होण्याची अपेक्षा अभिनव मंदिर ट्रस्ट व सावरकरप्रेमी बाळगून आहेत.


वास्तूबाबत भीती!

३० मे २०१६, ६ जून २०१६ आणि या ६ मे २०१७ रोजी अभिनव भारत मंदिर ट्रस्टच्या वतीने अध्यक्ष सूर्यकांत रहाळकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या विषयावर पत्र पाठवली आहेत. या ऐतिहासिक वास्तूचे पुनरुत्थान व्हावे, अशी मागणी पत्रांद्वारे करण्यात आली आहे. या वाड्याचा मागील भाग अखेरच्या घटका मोजत असल्याने यंदाच्या पावसाळ्यात तो कोसळण्याची शक्यताही मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात व्यक्त केली आहे.


स्वातंत्र्यवीरांच्या पराक्रमाची गाथा सांगणाऱ्या या वास्तूचे पुनरुत्थान गरजचे आहे. भाजप सरकारने मनावर घेतल्यास पूररेषेसारखे तांत्रित अडसर विशेष निर्णयांतर्गत दूर होणे शक्य आहे.

- सूर्यकांत रहाळकर , अध्यक्ष, अभिनव भारत मंदिर ट्रस्ट, नाशिक

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज