म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
जिल्ह्यातील विविध बँकांतर्फे अनेक अडचणींवर मात करीत शेतकऱ्यांना आतापर्यंत एक हजार ६३९ कोटी रुपयांच्या पीककर्जाचे वाटप करण्यात आले आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी आतापर्यंत १५६ कोटी जास्त कर्जाचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली. सर्वाधिक कर्जवाटप महाराष्ट्र बँकेने ३१८ कोटी, तर त्यापाठोपाठ जिल्हा बँकेने २७० कोटींचे कर्जवाटप केले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
जिल्ह्यातील पीककर्जाचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बँक प्रतिनिधींची बैठक झाली. त्यात राष्ट्रीयीकृत, खासगी, व्यापारी बँकांसह जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सहभागी झाले होते. मांढरे म्हणाले, की १२ ऑगस्ट रोजी झालेल्या बैठकीपेक्षा या बैठकीत २०० कोटी रुपयांच्या पीककर्जाचे अधिक वाटप बँकांमार्फत करण्यात आले आहे. जिल्ह्यात तीन हजार ३०३ कोटींच्या कर्जाच्या उद्दिष्टापैकी दोन हजार २४० कोटींच्या कर्जाचे वाटप १० बँकांकडे आहे. त्यानुसार १२ ऑगस्ट रोजी झालेल्या बैठकीत बँक ऑफ महाराष्ट्राने २७१ कोटींचे वाटप केले होते, आजपर्यंत ते ३१८ कोटी झाले आहे. मागील वर्षीच्या तुलनेत १५६ कोटी रुपयांची वाढ पीककर्ज वाटपात झाली असून, गेल्या १० ते १२ दिवसांत शेतकऱ्यांना साधारण अडीशे ते तीनशे कोटी रुपयांच्या कर्जाचे वितरण करण्यात आले आहे. इगतपुरी व जिल्ह्याचा पश्चिम भागात भात, द्राक्ष आदी पिकांची मागणी उशिराने होत असल्याने उर्वरित पीककर्ज वितरणाचे उद्दिष्ट महिनाअखेर पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी बँकांना दिल्या.
कर्जमुक्ती योजनेची कासवगती
महात्मा जोतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत जुलै महिन्याच्या मध्यावधीत एक हजार २६७ कोटींच्या प्राप्त उद्दिष्टापैकी आतापर्यंत शेतकऱ्यांना १७६ कोटींच्या कर्जाचे वाटप करण्यात आले आहे. या योजनेंतर्गत कर्जवाटप करताना शेतकऱ्यांची अडवणूक होणार नाही यासाठी एनडीसीसी बँकेने विशेष दक्षता घ्यावी, असे निर्देशही जिल्हाधिकारी मांढरे यांनी दिले. कर्जमुक्ती योजनेंतर्गंत उशिराने रक्कम मिळाली असूनही जिल्ह्यात ३४ टक्के कर्जवाटप झाले आहे. हे प्रमाण लक्ष्यांकापर्यंत जाण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील बँकांनी पीककर्ज वाटपासाठी अधिकाधिक प्रयत्न करावेत, अशी सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.
बँकानिहाय झालेले पीककर्ज वाटप
बँक रक्कम
महाराष्ट्र बँक ३१८ कोटी
जिल्हा बँक २७० कोटी
बँक ऑफ बडोदा २६३ कोटी
बँक ऑफ इंडिया ६६ कोटी
युनियन बँक ११२ कोटी
स्टेट बँक ऑफ इंडिया २६५ कोटी
सेंट्रल बँक ऑफ इंडिया ७४ कोटी
एचडीएफसी बँक ३ कोटी
कोटक महिंद्रा ६ कोटी
जिल्ह्यातील विविध बँकांतर्फे अनेक अडचणींवर मात करीत शेतकऱ्यांना आतापर्यंत एक हजार ६३९ कोटी रुपयांच्या पीककर्जाचे वाटप करण्यात आले आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी आतापर्यंत १५६ कोटी जास्त कर्जाचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली. सर्वाधिक कर्जवाटप महाराष्ट्र बँकेने ३१८ कोटी, तर त्यापाठोपाठ जिल्हा बँकेने २७० कोटींचे कर्जवाटप केले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
जिल्ह्यातील पीककर्जाचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बँक प्रतिनिधींची बैठक झाली. त्यात राष्ट्रीयीकृत, खासगी, व्यापारी बँकांसह जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सहभागी झाले होते. मांढरे म्हणाले, की १२ ऑगस्ट रोजी झालेल्या बैठकीपेक्षा या बैठकीत २०० कोटी रुपयांच्या पीककर्जाचे अधिक वाटप बँकांमार्फत करण्यात आले आहे. जिल्ह्यात तीन हजार ३०३ कोटींच्या कर्जाच्या उद्दिष्टापैकी दोन हजार २४० कोटींच्या कर्जाचे वाटप १० बँकांकडे आहे. त्यानुसार १२ ऑगस्ट रोजी झालेल्या बैठकीत बँक ऑफ महाराष्ट्राने २७१ कोटींचे वाटप केले होते, आजपर्यंत ते ३१८ कोटी झाले आहे. मागील वर्षीच्या तुलनेत १५६ कोटी रुपयांची वाढ पीककर्ज वाटपात झाली असून, गेल्या १० ते १२ दिवसांत शेतकऱ्यांना साधारण अडीशे ते तीनशे कोटी रुपयांच्या कर्जाचे वितरण करण्यात आले आहे. इगतपुरी व जिल्ह्याचा पश्चिम भागात भात, द्राक्ष आदी पिकांची मागणी उशिराने होत असल्याने उर्वरित पीककर्ज वितरणाचे उद्दिष्ट महिनाअखेर पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी बँकांना दिल्या.
महात्मा जोतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत जुलै महिन्याच्या मध्यावधीत एक हजार २६७ कोटींच्या प्राप्त उद्दिष्टापैकी आतापर्यंत शेतकऱ्यांना १७६ कोटींच्या कर्जाचे वाटप करण्यात आले आहे. या योजनेंतर्गत कर्जवाटप करताना शेतकऱ्यांची अडवणूक होणार नाही यासाठी एनडीसीसी बँकेने विशेष दक्षता घ्यावी, असे निर्देशही जिल्हाधिकारी मांढरे यांनी दिले. कर्जमुक्ती योजनेंतर्गंत उशिराने रक्कम मिळाली असूनही जिल्ह्यात ३४ टक्के कर्जवाटप झाले आहे. हे प्रमाण लक्ष्यांकापर्यंत जाण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील बँकांनी पीककर्ज वाटपासाठी अधिकाधिक प्रयत्न करावेत, अशी सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.
बँकानिहाय झालेले पीककर्ज वाटप
बँक रक्कम
महाराष्ट्र बँक ३१८ कोटी
जिल्हा बँक २७० कोटी
बँक ऑफ बडोदा २६३ कोटी
बँक ऑफ इंडिया ६६ कोटी
युनियन बँक ११२ कोटी
स्टेट बँक ऑफ इंडिया २६५ कोटी
सेंट्रल बँक ऑफ इंडिया ७४ कोटी
एचडीएफसी बँक ३ कोटी
कोटक महिंद्रा ६ कोटी