म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
अंबड लिंक रोडवर नव्याने वसलेला अनधिकृत भंगार बाजार पुन्हा काढण्यासाठी महापालिकेने प्रयत्न केले असले तरी, या प्रयत्नांना पोलिसांची साथ मिळली नाही. पोलिस संरक्षण उपलब्ध करून देण्याची मागणी पोलिस आयुक्तांनी फेटाळून लावली आहे. पावसाळा संपल्यानंतर भंगार बाजार हटविण्यासाठी बंदोबस्त उपलब्ध करून दिला जाईल, असे पत्र पालिकेला दिले आहे. त्यामुळे तुर्तास दोन महीने अनधिकृत भंगार बाजाराला एकप्रकारे संरक्षणच मिळणार आहे.
महापालिकेने जानेवारी महिन्यात शहरातील गुन्हेगारांचा अड्डा बनलेल्या अंबड लिंक रोडवरील भंगार बाजारावर हातोडा चालविला होता. जवळपास आठशेच्या वर दुकाने तोडण्यात आली होती. दोन दिवस ही कारवाई सुरू होती. परंतु दोन महिन्यांपासून हा अनधिकृत भंगार बाजार पुन्हा वसू लागला आहे. या ठिकाणी जवळपास तीस ते चाळीस टक्के व्यावसायिकांनी नव्याने दुकाने थाटून व्यवसाय सुरू केला आहे. संबंधित जागा खासगी मालकांची आहेत. त्यामुळे पालिका हतबल झाली असून, त्यांनी हा भंगार बाजार हटवण्यासाठी जुलै अखेरची मुहूर्त निवडला होता. त्यासाठी पोलिसांना पुन्हा पत्र लिहून बंदोबस्त द्यावा, अशी मागणी केली होती. परंतु पोलिसांना तुर्तास बंदोबस्त देण्यास नकार दिला आहे. पावसाळा संपल्यानंतर बंदोबस्त दिला जाणार आहे. दरम्यान नगरसेवक दिलीप दातीर यांनाही पोलिस आयुक्तांना पत्र देवून हा भंगार बाजार हटवण्याची मागणी केली आहे.
अंबड लिंक रोडवर नव्याने वसलेला अनधिकृत भंगार बाजार पुन्हा काढण्यासाठी महापालिकेने प्रयत्न केले असले तरी, या प्रयत्नांना पोलिसांची साथ मिळली नाही. पोलिस संरक्षण उपलब्ध करून देण्याची मागणी पोलिस आयुक्तांनी फेटाळून लावली आहे. पावसाळा संपल्यानंतर भंगार बाजार हटविण्यासाठी बंदोबस्त उपलब्ध करून दिला जाईल, असे पत्र पालिकेला दिले आहे. त्यामुळे तुर्तास दोन महीने अनधिकृत भंगार बाजाराला एकप्रकारे संरक्षणच मिळणार आहे.
महापालिकेने जानेवारी महिन्यात शहरातील गुन्हेगारांचा अड्डा बनलेल्या अंबड लिंक रोडवरील भंगार बाजारावर हातोडा चालविला होता. जवळपास आठशेच्या वर दुकाने तोडण्यात आली होती. दोन दिवस ही कारवाई सुरू होती. परंतु दोन महिन्यांपासून हा अनधिकृत भंगार बाजार पुन्हा वसू लागला आहे. या ठिकाणी जवळपास तीस ते चाळीस टक्के व्यावसायिकांनी नव्याने दुकाने थाटून व्यवसाय सुरू केला आहे. संबंधित जागा खासगी मालकांची आहेत. त्यामुळे पालिका हतबल झाली असून, त्यांनी हा भंगार बाजार हटवण्यासाठी जुलै अखेरची मुहूर्त निवडला होता. त्यासाठी पोलिसांना पुन्हा पत्र लिहून बंदोबस्त द्यावा, अशी मागणी केली होती. परंतु पोलिसांना तुर्तास बंदोबस्त देण्यास नकार दिला आहे. पावसाळा संपल्यानंतर बंदोबस्त दिला जाणार आहे. दरम्यान नगरसेवक दिलीप दातीर यांनाही पोलिस आयुक्तांना पत्र देवून हा भंगार बाजार हटवण्याची मागणी केली आहे.