सातपूर : रस्त्यालगत असलेल्या विहिरी अपघाताला आमंत्रण ठरत असल्याचे समोर आले आहे. परंतु, याबाबत अद्यापही दक्षता घेतली जात नाही. त्र्यंबकेश्वरच्या तळेगाव घोटी रस्त्यालगतची पुरातन विहीर वाहनचालकांना अपघाताला आमंत्रण ठरणारी आहे. या विहिरीत वाहन पडून अपघात झाल्यास त्यास जबाबदार कोण असा सवाल उपस्थित होत आहे. अशा विहिरींना किमान संरक्षक जाळ्या बसवाव्यात, अशी मागणी होत आहे.
रस्त्यालगतची विहीर अपघाताला आमंत्रण
रस्त्यालगत असलेल्या विहिरी अपघाताला आमंत्रण ठरत असल्याचे समोर आले आहे परंतु, याबाबत अद्यापही दक्षता घेतली जात नाही...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 6 Mar 2020, 4:00 am