म. टा. प्रतिनिधी, नाशिक
नगरपालिका निवडणूक काळात राज्यात तब्बल १० हजार जणांवर तात्पुरत्या तडीपारीची कारवाई करण्यात आली होती. महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका निर्भय वातावरणात व्हाव्यात, यासाठी गुन्हेगारी प्रवृत्तींवर तडीपारीसारख्या कठोर प्रतिबंधात्मक कारवाया निश्चितपणे केल्या जातील. असे आयोगाचे आयुक्त जे. एस. सहारिया यांनी शुक्रवारी दिली.
नाशिक दौऱ्यावर आलेल सहारिया म्हणाले, ‘या निवडणुका निर्भय वातावरणात व्हाव्यात यासाठी आयोगाने आणि प्रशासनानेही तयारी सुरू केली आहे. संवेदनशील तसेच अतिसंवेदनशील केंद्र निश्चितीची कार्यवाही सुरू असून तेथे मोठा पोलिस बंदोबस्त देण्याचे नियोजनही पोलिस विभाग करीत आहे. येऊ घातलेल्या निवडणुकांत मतदारांना मद्य, पैसे तसेच अन्य वस्तूंची आमिषे दाखविली जाऊ शकतात. असे प्रकार रोखण्यासाठी भरारी पथके कार्यरत राहणार आहेत. गैरप्रकार आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई होईल अशी ग्वाही सहारिया यांनी दिली.
निवडणूक काळात धर्म तसेच जातीच्या आधारावर मते मागता येणार नाहीत, असे निर्देश सुप्रीम कोर्टाने अलिकडच्याच काळात दिले आहेत. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचे उल्लंघन झाल्यास निश्चित कारवाई केली जाईल, असा इशारा सहारिया यांनी दिला. वर्षानुवर्ष जात आणि धर्माच्या नावावरच निवडणूका लढविल्या जातात याकडे माध्यम प्रतिनिधींनी सहारिया यांचे लक्ष वेधले. राजकीय पक्ष किंवा राजकीय व्यक्ती अत्यंत जागरूक असल्याचा टोला सहारिया यांनी लगावला.
नगरपालिका निवडणूक काळात राज्यात तब्बल १० हजार जणांवर तात्पुरत्या तडीपारीची कारवाई करण्यात आली होती. महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका निर्भय वातावरणात व्हाव्यात, यासाठी गुन्हेगारी प्रवृत्तींवर तडीपारीसारख्या कठोर प्रतिबंधात्मक कारवाया निश्चितपणे केल्या जातील. असे आयोगाचे आयुक्त जे. एस. सहारिया यांनी शुक्रवारी दिली.
नाशिक दौऱ्यावर आलेल सहारिया म्हणाले, ‘या निवडणुका निर्भय वातावरणात व्हाव्यात यासाठी आयोगाने आणि प्रशासनानेही तयारी सुरू केली आहे. संवेदनशील तसेच अतिसंवेदनशील केंद्र निश्चितीची कार्यवाही सुरू असून तेथे मोठा पोलिस बंदोबस्त देण्याचे नियोजनही पोलिस विभाग करीत आहे. येऊ घातलेल्या निवडणुकांत मतदारांना मद्य, पैसे तसेच अन्य वस्तूंची आमिषे दाखविली जाऊ शकतात. असे प्रकार रोखण्यासाठी भरारी पथके कार्यरत राहणार आहेत. गैरप्रकार आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई होईल अशी ग्वाही सहारिया यांनी दिली.
निवडणूक काळात धर्म तसेच जातीच्या आधारावर मते मागता येणार नाहीत, असे निर्देश सुप्रीम कोर्टाने अलिकडच्याच काळात दिले आहेत. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचे उल्लंघन झाल्यास निश्चित कारवाई केली जाईल, असा इशारा सहारिया यांनी दिला. वर्षानुवर्ष जात आणि धर्माच्या नावावरच निवडणूका लढविल्या जातात याकडे माध्यम प्रतिनिधींनी सहारिया यांचे लक्ष वेधले. राजकीय पक्ष किंवा राजकीय व्यक्ती अत्यंत जागरूक असल्याचा टोला सहारिया यांनी लगावला.