अ‍ॅपशहर

सव्वा लाख शेतकऱ्यांना लाभ

राज्य सरकारने शेतकरी कर्जमाफीची घोषणा केल्याने नाशिक जिल्हा बँकेच्या सुमारे सव्वा लाख शेतकऱ्यांचे ६८० कोटी रुपयांच्या आसपास कर्ज माफ होणार आहे. दीड लाखापर्यंत ३० जून २०१६ पर्यंत थकीत असलेल्या शेतकऱ्यांची संख्या ९१ हजार ३३६ आहे. त्यांच्याकडे ५०० कोटी ५४ लाख थकीत रक्कम असून, ती सर्व माफ होणार आहे.

Maharashtra Times 25 Jun 2017, 4:00 am
राज्य सरकारची कर्जमाफी; जिल्ह्यातील सुमारे ६८० कोटींचे कर्ज होणार माफ
महाराष्ट्र टाइम्स.कॉम benefits of 1 2 lakh farmers in nashik
सव्वा लाख शेतकऱ्यांना लाभ


म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राज्य सरकारने शेतकरी कर्जमाफीची घोषणा केल्याने नाशिक जिल्हा बँकेच्या सुमारे सव्वा लाख शेतकऱ्यांचे ६८० कोटी रुपयांच्या आसपास कर्ज माफ होणार आहे. दीड लाखापर्यंत ३० जून २०१६ पर्यंत थकीत असलेल्या शेतकऱ्यांची संख्या ९१ हजार ३३६ आहे. त्यांच्याकडे ५०० कोटी ५४ लाख थकीत रक्कम असून, ती सर्व माफ होणार आहे.

त्याचप्रमाणे दीड लाखाच्यावर कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना फक्त त्यातून दीड लाख मिळणार आहे. त्याची संख्याही मोठी आहे. जिल्हा बँकेबरोबरच राष्ट्रीयीकृत व इतर बँकेतून कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे. नियमित कर्ज भरणाऱ्यांना २५ हजार रुपये मिळणार असून, त्याचा आकडा अद्याप आलेला नाही.

सरकारच्या कर्जमाफीचा २०१६ - २०१७ या आर्थिक वर्षात कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना फायदा होणार नाही.

जिल्हा बँकेने या काळात तब्बल १,७१९ कोटी १८ लाख रुपये कर्ज वाटप केले. ते एकूण उद्दिष्टांपैकी ३४२ कोटींनी जास्त होते. दीड लाखापर्यंतचे कर्ज सरसकट माफ करण्यात येणार असून, यामुळे ९० टक्के शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार आहे. ज्या शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठण झाले आहे त्यांचे मध्यम मुदतीचे कर्जदेखील माफ करण्यात आले आहे. या निर्णयामुळे ४० लाख शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार आहे. जे शेतकरी नियमित कर्ज भरत आहेत, त्यांना २५ हजार रुपयांच्या कमाल मर्यादेपर्यंत २५ टक्के प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येणार आहे. जे शेतकरी ३० जूनपर्यंत कर्ज

भरतील त्यांच्या बँक खात्यावर तत्काळ प्रोत्साहनपर अनुदान जमा करण्यात येणार आहे.

सरकारने २०१७ पर्यंत जर सरसकट कर्जमाफी केली असती तर जिल्ह्यातील अल्प, मध्यम, बहुभूधारक अशा जिल्हा बँकेच्या ३ लाख ६० शेतकरी सभासदांना फायदा झाला असता. पण सरकारने जून २०१६ पर्यंतच ही कर्जमाफी केल्याने सुमारे सव्वा लाख शेतकऱ्यांनाच तो

मिळणार आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज