विजय गोळेसर
--
आपली माता कितीही कर्तृत्ववान किंवा शक्तिशाली असली, तरी मुलांच्या दृष्टीने ती साधीभोळी आई किंवा मम्मीच असते, तसं आपल्या नाशिककरांचं झालंय. आसामची कामाख्या देवी, बंगालची कालीमाता, पंजाबची ज्वालामुखी, काशीची मनकर्णिका एवढंच कशाला कोल्हापूरची अंबाबाई या देवींच्या सुप्रसिद्ध ५१ पीठांतील देवींएवढेच महत्त्व असलेली देवी आपल्या नाशिकमध्ये असूनही आपल्याला त्याची जाणीवही नाही. नाशिकच्या भद्रकाली परिसरातील भद्रकाली देवी वरील सर्व देवींइतकीच महत्त्वाची आहे. पण, नाशिककरांना त्याची जाणीवही नाही. आपल्या दृष्टीने ती फक्त ग्रामदेवता आहे. नाशिककर, महापालिका आणि महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाने ठरविले, तर नाशिकच्या या भद्रकालीमातेला कामाख्या, कालीमाता, ज्वालामाता, मनकर्णिका किंवा कोल्हापूरच्या अंबाबाईएवढी प्रसिद्धी आणि महत्त्व मिळवून देता येऊ शकेल.
देवीच्या ५१ शक्तिपीठ निर्मितीविषयी तंत्राचुडामणी या ग्रंथात एक प्रसिद्ध कथा आहे. एकदा दक्ष-प्रजापती यांनी एक यज्ञ आयोजित केला. त्यासाठी सर्व देवांना आमंत्रण दिले. मात्र, आपल्या कन्येचे पती भगवान शंकराला मात्र हेतूपुरस्सर यज्ञाचे आमंत्रण दिले नाही. यावेळी शंकराचे न एेकता पार्वती वडिलांच्या घरी यज्ञ कार्य असल्याने आमंत्रण नसतानाही गेली. या यज्ञ सोहळ्यात भगवान शंकराचा हविर्भाग न देऊन मोठा अपमान करण्यात आला. पतीचा अपमान सहन न झाल्याने पार्वतीने यज्ञकुंडात उडी घेऊन स्वतःची आहुती दिली. महादेवांना हे समजल्यावर त्यांनी यज्ञाचा विध्वंस केला आणि सतीचे मृत शरीर हातात घेऊन विलाप सुरू केला. भगवान शिवाचा विलाप आवरायचा कसा, असा प्रश्न सर्व देवांना पडला. सर्व देव ब्रह्मदेवाच्या सल्ल्यावरून भगवान विष्णूंकडे गेले. भगवान विष्णूंनी आपल्या हातातील सुदर्शनचक्राने सतीच्या शरीराचे अनेक भाग केले. त्यावेळी जिथे जिथे देवीच्या शरीराचे तुकडे पडले तिथे एक शक्तिपीठ तयार झाले. अशा प्रकारे भारतात देवीची ५१ शक्तिपीठे तयार झाली. त्यापैकी नाशिकचे भद्रकाली हे एक पीठ तयार झाले. सतीच्या हनुवटीचा भाग येथे पडला. संस्कृत भाषेत हनुवटीला ‘चिबुक’ म्हणतात. यावरून पौराणिक काळात नाशिकला ‘चिबुकस्थान’ असेही म्हणत असत.
--
यामुळे नाही मंदिराला कळस
पूर्वी भद्रकालीचे मंदिर बुधवार पेठेत होते. मात्र, कालांतराने मूर्ती भंजकांच्या भीतीने मंदिरातील मूर्ती सुरक्षितरीत्या सध्याच्या ठिकाणी हलविण्यात आली. तेव्हापासून या मूर्ती आताच्या मंदिरात ठेवण्यात आल्या आहेत. भद्रकाली मंदिराच्या जागी पूर्वी मठ होता. त्यामुळे या मंदिराला कळस नाही. आजही भद्रकालीचे मंदिर एखाद्या टोलेजंग वाड्यासारखे दिसते. १७९० मध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार झाल्याची नोंद तत्कालीन कागदपत्रांत सापडते. छत्रपती शिवाजी महाराजांचे पेशवे चिमाजी पटवर्धन यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याची नोंद आढळते.
--
प्राचीन मूर्तींचे पारंपरिक पूजन
भद्रकाली देवीच्या गाभाऱ्यात ९ ते १० इंच उंचीच्या ९ मूर्ती आहेत. या मूर्ती पंचधातूंच्या असून, या नवदुर्गा आहेत. या मूर्तींबरोबरच एक दशभुजांचा गणपतीदेखील येथे आहे. या सगळ्या मूर्ती अतिशय प्राचीन असून, आजही त्यांची पारंपरिक पद्धतीने पूजा केली जाते. मंदिरात शारदीय व चैत्र नवरात्रोत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो. नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी घटस्थापनेने उत्सवाची सुरुवात होते. त्यानंतर रोज सकाळी आठ ते साडेदहापर्यंत महाभिषेक व आरती होते. साडेदहाला देवीला रोज वेगवेगळ्या पदार्थांचा नैवेद्य दाखविला जातो. साडेदहा ते बारापर्यंत सप्तशती पाठांचे पठण, साडेबाराला महानैवेद्य व आरती, त्यानंतर दुपारी साडेतीन ते पाचपर्यंत कलावती आईच्या भजनी मंडळाची सेवा, सायंकाळी साडेपाच ते सात देवी भागवत पुराणाचे वाचन, आठ ते साडेआठ सायंपूजन व महाआरती, त्यानंतर साडेआठ ते दहा वाजेपर्यंत शुक्ल यजुर्वेद संहिता पठण केले जाते. विजयादशमीच्या दिवशी अनेक भाविक सीमोल्लंघनासाठी देवीच्या दर्शनाला येतात.
--
हे आहेत ट्रस्टचे पदाधिकारी
रत्नाकर कावळे मंदिराचे वंशपरांपरागत पुजारी आहेत. भद्रकाली मंदिराचा ट्रस्ट १९६२ मध्ये स्थापन झालेला असून, दत्तात्रय रंगनाथ पैठणकर अध्यक्ष, तर उदयन नारायण दीक्षित, उपेंद्र देव, सुरेश शंकर शुक्ल, अतुल वसंत गर्गे विश्वस्त आहेत.
--
देवीची ५१ शक्तिपीठे अशी
१) श्रीशैल, श्रीहट्ट, २) श्रीपर्वत, ३) उज्जयनी, ४) करतोया तट, ५) कालमाधव, ६) कांची, ७) कुरुक्षेत्र, ८) कन्याश्रम, ९) कालीघाट, १०) कामगिरी, ११) करवीरा सरकारारा, १२) काश्मिरा, १३) किरीट, १४) गोदावरीतीर, १५) गंडकी, १६) चट्टल, १७) जनस्थान (नाशिक), १८) जयंती, १९) जालंदर, २०) ज्वालामुखी, २१) त्रिपुरा, २२) त्रिस्रोता, २३) नेपाळ, २४) नर्मदा, २५) पंचसागर, २६) प्रयाग, २७) प्रभास, २८) बहुला, २९) भैरवपर्वत, ३०) मनिकर्णिका, ३१) मणिवेद, ३२) मानस, ३३) मिथिला, ३४) युगाद्या, ३५) रत्नावली, ३६) रामगिरी, ३७) वैद्यनाथ, ३८) वरजाक्षेत्र, ३९) वृंदावन, ४०) विभास, ४१) शुचि, ४२) सुगंधा, ४३) हिंगुला, ४४) नलहाटी, ४५) कालिपीठ, ४६) वक्रेश्वर, ४७) यशोरा, ४८) अट्टहास, ४९) नंदिपुरा, ५०) लंका, ५१) विराट.
--
आपली माता कितीही कर्तृत्ववान किंवा शक्तिशाली असली, तरी मुलांच्या दृष्टीने ती साधीभोळी आई किंवा मम्मीच असते, तसं आपल्या नाशिककरांचं झालंय. आसामची कामाख्या देवी, बंगालची कालीमाता, पंजाबची ज्वालामुखी, काशीची मनकर्णिका एवढंच कशाला कोल्हापूरची अंबाबाई या देवींच्या सुप्रसिद्ध ५१ पीठांतील देवींएवढेच महत्त्व असलेली देवी आपल्या नाशिकमध्ये असूनही आपल्याला त्याची जाणीवही नाही. नाशिकच्या भद्रकाली परिसरातील भद्रकाली देवी वरील सर्व देवींइतकीच महत्त्वाची आहे. पण, नाशिककरांना त्याची जाणीवही नाही. आपल्या दृष्टीने ती फक्त ग्रामदेवता आहे. नाशिककर, महापालिका आणि महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाने ठरविले, तर नाशिकच्या या भद्रकालीमातेला कामाख्या, कालीमाता, ज्वालामाता, मनकर्णिका किंवा कोल्हापूरच्या अंबाबाईएवढी प्रसिद्धी आणि महत्त्व मिळवून देता येऊ शकेल.
देवीच्या ५१ शक्तिपीठ निर्मितीविषयी तंत्राचुडामणी या ग्रंथात एक प्रसिद्ध कथा आहे. एकदा दक्ष-प्रजापती यांनी एक यज्ञ आयोजित केला. त्यासाठी सर्व देवांना आमंत्रण दिले. मात्र, आपल्या कन्येचे पती भगवान शंकराला मात्र हेतूपुरस्सर यज्ञाचे आमंत्रण दिले नाही. यावेळी शंकराचे न एेकता पार्वती वडिलांच्या घरी यज्ञ कार्य असल्याने आमंत्रण नसतानाही गेली. या यज्ञ सोहळ्यात भगवान शंकराचा हविर्भाग न देऊन मोठा अपमान करण्यात आला. पतीचा अपमान सहन न झाल्याने पार्वतीने यज्ञकुंडात उडी घेऊन स्वतःची आहुती दिली. महादेवांना हे समजल्यावर त्यांनी यज्ञाचा विध्वंस केला आणि सतीचे मृत शरीर हातात घेऊन विलाप सुरू केला. भगवान शिवाचा विलाप आवरायचा कसा, असा प्रश्न सर्व देवांना पडला. सर्व देव ब्रह्मदेवाच्या सल्ल्यावरून भगवान विष्णूंकडे गेले. भगवान विष्णूंनी आपल्या हातातील सुदर्शनचक्राने सतीच्या शरीराचे अनेक भाग केले. त्यावेळी जिथे जिथे देवीच्या शरीराचे तुकडे पडले तिथे एक शक्तिपीठ तयार झाले. अशा प्रकारे भारतात देवीची ५१ शक्तिपीठे तयार झाली. त्यापैकी नाशिकचे भद्रकाली हे एक पीठ तयार झाले. सतीच्या हनुवटीचा भाग येथे पडला. संस्कृत भाषेत हनुवटीला ‘चिबुक’ म्हणतात. यावरून पौराणिक काळात नाशिकला ‘चिबुकस्थान’ असेही म्हणत असत.
--
यामुळे नाही मंदिराला कळस
पूर्वी भद्रकालीचे मंदिर बुधवार पेठेत होते. मात्र, कालांतराने मूर्ती भंजकांच्या भीतीने मंदिरातील मूर्ती सुरक्षितरीत्या सध्याच्या ठिकाणी हलविण्यात आली. तेव्हापासून या मूर्ती आताच्या मंदिरात ठेवण्यात आल्या आहेत. भद्रकाली मंदिराच्या जागी पूर्वी मठ होता. त्यामुळे या मंदिराला कळस नाही. आजही भद्रकालीचे मंदिर एखाद्या टोलेजंग वाड्यासारखे दिसते. १७९० मध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार झाल्याची नोंद तत्कालीन कागदपत्रांत सापडते. छत्रपती शिवाजी महाराजांचे पेशवे चिमाजी पटवर्धन यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याची नोंद आढळते.
--
प्राचीन मूर्तींचे पारंपरिक पूजन
भद्रकाली देवीच्या गाभाऱ्यात ९ ते १० इंच उंचीच्या ९ मूर्ती आहेत. या मूर्ती पंचधातूंच्या असून, या नवदुर्गा आहेत. या मूर्तींबरोबरच एक दशभुजांचा गणपतीदेखील येथे आहे. या सगळ्या मूर्ती अतिशय प्राचीन असून, आजही त्यांची पारंपरिक पद्धतीने पूजा केली जाते. मंदिरात शारदीय व चैत्र नवरात्रोत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो. नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी घटस्थापनेने उत्सवाची सुरुवात होते. त्यानंतर रोज सकाळी आठ ते साडेदहापर्यंत महाभिषेक व आरती होते. साडेदहाला देवीला रोज वेगवेगळ्या पदार्थांचा नैवेद्य दाखविला जातो. साडेदहा ते बारापर्यंत सप्तशती पाठांचे पठण, साडेबाराला महानैवेद्य व आरती, त्यानंतर दुपारी साडेतीन ते पाचपर्यंत कलावती आईच्या भजनी मंडळाची सेवा, सायंकाळी साडेपाच ते सात देवी भागवत पुराणाचे वाचन, आठ ते साडेआठ सायंपूजन व महाआरती, त्यानंतर साडेआठ ते दहा वाजेपर्यंत शुक्ल यजुर्वेद संहिता पठण केले जाते. विजयादशमीच्या दिवशी अनेक भाविक सीमोल्लंघनासाठी देवीच्या दर्शनाला येतात.
--
हे आहेत ट्रस्टचे पदाधिकारी
रत्नाकर कावळे मंदिराचे वंशपरांपरागत पुजारी आहेत. भद्रकाली मंदिराचा ट्रस्ट १९६२ मध्ये स्थापन झालेला असून, दत्तात्रय रंगनाथ पैठणकर अध्यक्ष, तर उदयन नारायण दीक्षित, उपेंद्र देव, सुरेश शंकर शुक्ल, अतुल वसंत गर्गे विश्वस्त आहेत.
--
देवीची ५१ शक्तिपीठे अशी
१) श्रीशैल, श्रीहट्ट, २) श्रीपर्वत, ३) उज्जयनी, ४) करतोया तट, ५) कालमाधव, ६) कांची, ७) कुरुक्षेत्र, ८) कन्याश्रम, ९) कालीघाट, १०) कामगिरी, ११) करवीरा सरकारारा, १२) काश्मिरा, १३) किरीट, १४) गोदावरीतीर, १५) गंडकी, १६) चट्टल, १७) जनस्थान (नाशिक), १८) जयंती, १९) जालंदर, २०) ज्वालामुखी, २१) त्रिपुरा, २२) त्रिस्रोता, २३) नेपाळ, २४) नर्मदा, २५) पंचसागर, २६) प्रयाग, २७) प्रभास, २८) बहुला, २९) भैरवपर्वत, ३०) मनिकर्णिका, ३१) मणिवेद, ३२) मानस, ३३) मिथिला, ३४) युगाद्या, ३५) रत्नावली, ३६) रामगिरी, ३७) वैद्यनाथ, ३८) वरजाक्षेत्र, ३९) वृंदावन, ४०) विभास, ४१) शुचि, ४२) सुगंधा, ४३) हिंगुला, ४४) नलहाटी, ४५) कालिपीठ, ४६) वक्रेश्वर, ४७) यशोरा, ४८) अट्टहास, ४९) नंदिपुरा, ५०) लंका, ५१) विराट.