म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी सध्या ईडीच्या कारागृहात असलेले माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या सुटकेसाठी भुजबळ समर्थकांकडून राज्यभर मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. येत्या तीन ऑक्टोबर रोजी होणारा मोर्चा ऐतिहासिक व विराट करण्यासाठी नियोजन बैठकींचा सपाटा सुरू केला आहे. या मोर्चाचे केंद्रबिंदू नाशिक राहणार असल्याने संपूर्ण राज्यासह केंद्राचेही लक्ष वेधून घेण्यासाठी भुजबळ समर्थकांनी सर्व शक्ती पणाला लावली आहे.
जिल्हापाठोपाठ आता राज्यातील ओबीसींना एकत्रित आणण्याचा प्रयत्न केला जात असून, आता मराठा क्रांती मोर्चाच्या धर्तीवर ‘खूप केले इतरांसाठी, एक दिवस ओबीसींच्या नेत्यासाठी' असा नारा भुजबळ समर्थकांकडून दिला जात आहे.
राज्यभर मराठा क्रांती मोर्चाचे रान पेटले असतानाच, आता ओबीसी समाजानेही राज्य सरकारवर दबाव टाकण्याचे तंत्र सुरू केले आहे. ओबीसीचे नेते असलेले छगन भुजबळ यांच्यावर राज्य सरकारकडून अन्याय केला जात असल्याचा दाखला देत, भुजबळांच्या सुटकेसाठी आता मोर्चेबांधणी केली जात आहे. यासाठी येत्या तीन ऑक्टोबरला नाशिकमध्ये विराट मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. यासाठी रविवारी नाशिकमध्ये बैठक होऊन हा मोर्चा यशस्वी करण्यासाठी सर्व ताकद पणाला लावण्याचा प्रयत्न केला आहे. या मोर्चाला भुजबळ समर्थकांचा मोर्चा असे नाव दिले जात असून, तो मराठा क्रांती मोर्चाच्या धर्तीवर यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी आर्थिक नियोजनासह मोर्चा यशस्वी करण्यासाठी राज्यभर जागर सुरू करण्यात आला आहे. नाशिकमधील मोर्चा हा एकमेव मोर्चा असल्याने तो यशस्वी करण्यासाठी समर्थकांनी आपली सर्व ताकद लावली आहे. नाशिक जिल्ह्यात तालुकावर बैठकी लावण्यात आल्या असून, सोमवारी सिन्नर, नाशिक व घोटी येथे बैठकी घेऊन मोर्चाच्या सहभागावर चर्चा झाली. राज्यभर जिल्ह्याच्या ठिकाणीही बैठकी घेण्यात येत आहेत.
युतीतील ओबीसी संभ्रमात
मोर्चाला भुजबळ समर्थक असे रूप दिले जात असले, तरी सर्व पक्षांत असलेल्या ओबीसींना पुन्हा एकाच छताखाली आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, शिवसेना व भाजपमध्ये असलेले ओबीसी या मोर्चाला येण्यासंदर्भात संभ्रमात आहेत. भाजपमधून आता विरोधाचा सूर उमटत असून, शिवसैनिकही द्विधा मनःस्थितीत आहेत. भुजबळांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप असतानाच, त्यांच्या सुटकेसाठी मोर्चा कसा, असा सवाल आता या पक्षांमधूनच केला जात आहे. मोर्चात जाणे म्हणजे भुजबळांच्या भ्रष्टाचाराला समर्थन देण्यासारखेच असल्याने या नेत्यांच्या नजरा आता पक्षातील वरिष्ठांच्या आदेशाकडे लागून आहेत.
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी सध्या ईडीच्या कारागृहात असलेले माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या सुटकेसाठी भुजबळ समर्थकांकडून राज्यभर मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. येत्या तीन ऑक्टोबर रोजी होणारा मोर्चा ऐतिहासिक व विराट करण्यासाठी नियोजन बैठकींचा सपाटा सुरू केला आहे. या मोर्चाचे केंद्रबिंदू नाशिक राहणार असल्याने संपूर्ण राज्यासह केंद्राचेही लक्ष वेधून घेण्यासाठी भुजबळ समर्थकांनी सर्व शक्ती पणाला लावली आहे.
जिल्हापाठोपाठ आता राज्यातील ओबीसींना एकत्रित आणण्याचा प्रयत्न केला जात असून, आता मराठा क्रांती मोर्चाच्या धर्तीवर ‘खूप केले इतरांसाठी, एक दिवस ओबीसींच्या नेत्यासाठी' असा नारा भुजबळ समर्थकांकडून दिला जात आहे.
राज्यभर मराठा क्रांती मोर्चाचे रान पेटले असतानाच, आता ओबीसी समाजानेही राज्य सरकारवर दबाव टाकण्याचे तंत्र सुरू केले आहे. ओबीसीचे नेते असलेले छगन भुजबळ यांच्यावर राज्य सरकारकडून अन्याय केला जात असल्याचा दाखला देत, भुजबळांच्या सुटकेसाठी आता मोर्चेबांधणी केली जात आहे. यासाठी येत्या तीन ऑक्टोबरला नाशिकमध्ये विराट मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. यासाठी रविवारी नाशिकमध्ये बैठक होऊन हा मोर्चा यशस्वी करण्यासाठी सर्व ताकद पणाला लावण्याचा प्रयत्न केला आहे. या मोर्चाला भुजबळ समर्थकांचा मोर्चा असे नाव दिले जात असून, तो मराठा क्रांती मोर्चाच्या धर्तीवर यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी आर्थिक नियोजनासह मोर्चा यशस्वी करण्यासाठी राज्यभर जागर सुरू करण्यात आला आहे. नाशिकमधील मोर्चा हा एकमेव मोर्चा असल्याने तो यशस्वी करण्यासाठी समर्थकांनी आपली सर्व ताकद लावली आहे. नाशिक जिल्ह्यात तालुकावर बैठकी लावण्यात आल्या असून, सोमवारी सिन्नर, नाशिक व घोटी येथे बैठकी घेऊन मोर्चाच्या सहभागावर चर्चा झाली. राज्यभर जिल्ह्याच्या ठिकाणीही बैठकी घेण्यात येत आहेत.
युतीतील ओबीसी संभ्रमात
मोर्चाला भुजबळ समर्थक असे रूप दिले जात असले, तरी सर्व पक्षांत असलेल्या ओबीसींना पुन्हा एकाच छताखाली आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, शिवसेना व भाजपमध्ये असलेले ओबीसी या मोर्चाला येण्यासंदर्भात संभ्रमात आहेत. भाजपमधून आता विरोधाचा सूर उमटत असून, शिवसैनिकही द्विधा मनःस्थितीत आहेत. भुजबळांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप असतानाच, त्यांच्या सुटकेसाठी मोर्चा कसा, असा सवाल आता या पक्षांमधूनच केला जात आहे. मोर्चात जाणे म्हणजे भुजबळांच्या भ्रष्टाचाराला समर्थन देण्यासारखेच असल्याने या नेत्यांच्या नजरा आता पक्षातील वरिष्ठांच्या आदेशाकडे लागून आहेत.