म. टा. प्रतिनिधी, नाशिक
नागरिकांनी जास्तीत जास्त पर्यवरणाची काळजी घ्यावी, प्लास्टिकचा वापर टाळावा, यासाठी '&x1f6b4;�🏻नाशिक सायकलिस्ट'च्या पाच सदस्यांनी मंगळवारी सकाळी नाशिक- सोमनाथ- द्वारका सायकल यात्रेला सुरुवात केली.
मंगळवारी (१२ नोव्हेंबर) कार्तिक पौर्णिमेनिमित्त सावित्रीबाई फुले चौक, मुंबई नाका येथून फ्लॅग ऑफ करण्यात आला. या राईडमध्ये रवींद्र दुसाने, मोहनसिंग राजपूत, विष्णू आडके, मोहन देसाई, चंद्रकांत नाईक सहभागी झाले आहेत. संपूर्ण सायकल यात्रेमध्ये पर्यावरण वाचवा, प्लॅस्टिकचा वापर टाळा, सायकलिंग करण्याचे फायदे याविषयी प्रबोधन करण्यात येणार आहे. नाशिक सायक्लिस्टस् फाऊंडेशन तर्फे त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी त्यांचे कुटुंबीय व सायकलिस्ट उपस्थित होते.