म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
टीपी स्कीमसाठी सत्तारूढ भाजपने आपली सर्व शक्ती पणाला लावली असतानाच भाजपच्याच उपमहापौर भिकूबाई बागूल यांनी मात्र प्रस्तावाला विरोध दर्शविल्यामुळे भाजपातच फूट पडल्याचे चित्र आहे.
उपमहापौर बागूल यांच्या सूचनांकडे महापौरांनी दुर्लक्ष केल्यानंतर बागूल यांनी थेट महापौरांच्या दालनात प्रवेश करत शेतकरीहितासाठी ६०-४० फॉर्म्युल्याची योजनेत अंतर्भाव करण्याची सूचना मांडली. महापौरांनी सदरची उपसूचना दाखल करून घेतली असली, तरी तांत्रिक कारणाने ती मंजूर होण्याची शक्यता कमीच असल्यामुळे भाजपमधील वाद पुन्हा उफाळून आला आहे.
महासभेचे संचालन करणाऱ्या महापौरांच्या दालनातच बागूल यांनी थेट प्रवेश करत शेतकरीहितासाठी ६०:४०च्या फॉर्म्युल्याचा या योजनेत अंतर्भाव करण्याची सूचना मांडली. बागूल यांचा रुद्रावतार बघून महापौरांनी ही उपसूचना दाखलमान्य करून घेतली. संभाजी मोरुस्कर यांनीदेखील शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांशी चर्चा करून निर्णय घ्यावा, अशी मागणी केली. या भागातील नगरसेवकांचीही हीच भावना असल्यामुळे महापौरांसमोरील पेच वाढला आहे. उपमहापौरांची उपसूचना मान्य करणे अवघड असून, तांत्रिक बाबींकडे याबाबत बोट दाखविले जाईल. सभागृह नेते सतीश सोनवणे यांनी शासनाच्या नियमाप्रमाणे योजना रद्द करता येणार नसल्याचे स्पष्टीकरण दिले. भाजप गटनेते जगदीश पाटील यांनी किती शेतकरी विरोधात आहेत याचा खुलासा करण्याची मागणी करताना समर्थन केले त्यानुसार महापौर कुलकर्णी यांनी प्रस्तावाला मंजुरी दिली.
टीपी स्कीमसाठी सत्तारूढ भाजपने आपली सर्व शक्ती पणाला लावली असतानाच भाजपच्याच उपमहापौर भिकूबाई बागूल यांनी मात्र प्रस्तावाला विरोध दर्शविल्यामुळे भाजपातच फूट पडल्याचे चित्र आहे.
उपमहापौर बागूल यांच्या सूचनांकडे महापौरांनी दुर्लक्ष केल्यानंतर बागूल यांनी थेट महापौरांच्या दालनात प्रवेश करत शेतकरीहितासाठी ६०-४० फॉर्म्युल्याची योजनेत अंतर्भाव करण्याची सूचना मांडली. महापौरांनी सदरची उपसूचना दाखल करून घेतली असली, तरी तांत्रिक कारणाने ती मंजूर होण्याची शक्यता कमीच असल्यामुळे भाजपमधील वाद पुन्हा उफाळून आला आहे.
महासभेचे संचालन करणाऱ्या महापौरांच्या दालनातच बागूल यांनी थेट प्रवेश करत शेतकरीहितासाठी ६०:४०च्या फॉर्म्युल्याचा या योजनेत अंतर्भाव करण्याची सूचना मांडली. बागूल यांचा रुद्रावतार बघून महापौरांनी ही उपसूचना दाखलमान्य करून घेतली. संभाजी मोरुस्कर यांनीदेखील शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांशी चर्चा करून निर्णय घ्यावा, अशी मागणी केली. या भागातील नगरसेवकांचीही हीच भावना असल्यामुळे महापौरांसमोरील पेच वाढला आहे. उपमहापौरांची उपसूचना मान्य करणे अवघड असून, तांत्रिक बाबींकडे याबाबत बोट दाखविले जाईल. सभागृह नेते सतीश सोनवणे यांनी शासनाच्या नियमाप्रमाणे योजना रद्द करता येणार नसल्याचे स्पष्टीकरण दिले. भाजप गटनेते जगदीश पाटील यांनी किती शेतकरी विरोधात आहेत याचा खुलासा करण्याची मागणी करताना समर्थन केले त्यानुसार महापौर कुलकर्णी यांनी प्रस्तावाला मंजुरी दिली.