म. टा. प्रतिनिधी, नाशिक
गेल्या काही वर्षांपासून वटपौणिर्मेला वडाचे पूजन करण्यासोबतच वृक्षसंवर्धनासारखे विविध प्रकारचे सामाजिक उपक्रमही राबविले जातात. यंदा असाच एक उपक्रम भाजपा महिला मोर्चाच्या अध्यक्ष हिमगौरी अडके राबविणार असून, वटपौर्णिमेला (२४ जून) नंदिनी नदीच्या किनारी तीन हजार वडाच्या रोपांचे रोपण केले जाणार आहे.
भारतीय परंपरेत वटपौर्णिमेला मोठे महत्त्व आहे. वटपौर्णिमेसोबतच वटवृक्षालाही धार्मिक आणि शास्त्रीयदृष्ट्या महत्त्व आहे. हे लक्षात घेऊनच हा उपक्रम राबविला जाणार असल्याचे अडके यांनी सांगितले. नाशिकमधील ३५ स्वयंसेवी संस्था यामध्ये सहभागी होणार असून, २४ जूनला (गुरुवार) दुपारी ३ ते ५ यावेळेत हा उपक्रम रावबला जाणार आहे. नंदिनी नदीकिनारी टाकळी ते महिरावणी या भागात ही वडाची रोपे लावली जाणार असून, अभिनेता चिन्मय उद्गीरकरसह नदी संवर्धनासाठी काम करणारे राजेश नाईकही यामध्ये सहभागी होणार आहेत. विपूल मेहता यांनी या उपक्रमासाठी वडाची रोपे उपलब्ध करून दिली आहेत.
स्वच्छता मोहिमेस प्रारंभ
याबाबत बोलताना अडके यांनी सांगितले की, ५ जूनला जागतिक पर्यावरणदिनी ही संकल्पना पुढे आल्यानंतर तातडीने त्यावर काम सुरू केले. नंदिनी नदीच्या स्वच्छतेचे काम हाती घेतलेच आहे. त्याचसोबत नदीच्या आसपासचा परिसर स्वच्छ करून, तिथे ही रोपे लावण्याचा निर्णय घेण्यात आला. या उपक्रमासाठी टाकळी ते महिरावणी परिसरातील 'नंदिनी'च्या काठावरील जागेचे मॅपिंग करून, महापालिकेच्या सहकार्याने या जागेची स्वच्छता करण्यात आली आहे. तसेच वृक्षारोपणासाठी खड्डेही खणण्यात आले आहेत. ही रोपे लावल्यानंतर त्यांची देखभाल करण्याची जबाबदारीही घेतली जाणार असून, त्याचेही नियोजन केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
नंदिनी नदी ही खरोखर नंदिनीसारखी राहावी, अशी इच्छा आहे. यासाठी सुरू असलेल्या उपक्रमांचाच हा एक भाग आहे. वडाचे झाड बहुगुणी आणि ऑक्सिजन देणारे म्हणून ओळखले जाते. करोनामुळे ऑक्सिजनची किंमत आपल्याला चांगलीच समजली आहे. वटपौर्णिमेच्या निमित्ताने महिलांच्या मदतीने हा उपक्रम राबविला जाणार आहे.
-हिमगौरी अडके,
भाजपा महिला मोर्चा अध्यक्ष
गेल्या काही वर्षांपासून वटपौणिर्मेला वडाचे पूजन करण्यासोबतच वृक्षसंवर्धनासारखे विविध प्रकारचे सामाजिक उपक्रमही राबविले जातात. यंदा असाच एक उपक्रम भाजपा महिला मोर्चाच्या अध्यक्ष हिमगौरी अडके राबविणार असून, वटपौर्णिमेला (२४ जून) नंदिनी नदीच्या किनारी तीन हजार वडाच्या रोपांचे रोपण केले जाणार आहे.
भारतीय परंपरेत वटपौर्णिमेला मोठे महत्त्व आहे. वटपौर्णिमेसोबतच वटवृक्षालाही धार्मिक आणि शास्त्रीयदृष्ट्या महत्त्व आहे. हे लक्षात घेऊनच हा उपक्रम राबविला जाणार असल्याचे अडके यांनी सांगितले. नाशिकमधील ३५ स्वयंसेवी संस्था यामध्ये सहभागी होणार असून, २४ जूनला (गुरुवार) दुपारी ३ ते ५ यावेळेत हा उपक्रम रावबला जाणार आहे. नंदिनी नदीकिनारी टाकळी ते महिरावणी या भागात ही वडाची रोपे लावली जाणार असून, अभिनेता चिन्मय उद्गीरकरसह नदी संवर्धनासाठी काम करणारे राजेश नाईकही यामध्ये सहभागी होणार आहेत. विपूल मेहता यांनी या उपक्रमासाठी वडाची रोपे उपलब्ध करून दिली आहेत.
स्वच्छता मोहिमेस प्रारंभ
याबाबत बोलताना अडके यांनी सांगितले की, ५ जूनला जागतिक पर्यावरणदिनी ही संकल्पना पुढे आल्यानंतर तातडीने त्यावर काम सुरू केले. नंदिनी नदीच्या स्वच्छतेचे काम हाती घेतलेच आहे. त्याचसोबत नदीच्या आसपासचा परिसर स्वच्छ करून, तिथे ही रोपे लावण्याचा निर्णय घेण्यात आला. या उपक्रमासाठी टाकळी ते महिरावणी परिसरातील 'नंदिनी'च्या काठावरील जागेचे मॅपिंग करून, महापालिकेच्या सहकार्याने या जागेची स्वच्छता करण्यात आली आहे. तसेच वृक्षारोपणासाठी खड्डेही खणण्यात आले आहेत. ही रोपे लावल्यानंतर त्यांची देखभाल करण्याची जबाबदारीही घेतली जाणार असून, त्याचेही नियोजन केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
नंदिनी नदी ही खरोखर नंदिनीसारखी राहावी, अशी इच्छा आहे. यासाठी सुरू असलेल्या उपक्रमांचाच हा एक भाग आहे. वडाचे झाड बहुगुणी आणि ऑक्सिजन देणारे म्हणून ओळखले जाते. करोनामुळे ऑक्सिजनची किंमत आपल्याला चांगलीच समजली आहे. वटपौर्णिमेच्या निमित्ताने महिलांच्या मदतीने हा उपक्रम राबविला जाणार आहे.
-हिमगौरी अडके,
भाजपा महिला मोर्चा अध्यक्ष