म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर
दुर्गम भागातील आदिवासी पाड्यावर असंख्य असुविधा असतात. या परिसरात राहणाऱ्या लोकांना या असुविधांशी रोज दोन हात करीत आयुष्य काढावे लागते. मात्र याच आदिवासी पाड्यातील सुजान नागरिकांना रक्तदान शिबिरात सहभाग घेवून समाजापुढे आदर्श ठेवला आहे. तालुक्यातील दुर्गम भागात ठाणापाडा येथे किसान सभेच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात मुसळधार पाऊस सुरू असतानाही परिसरातील शेकडो रक्तदात्यांनी हजेरी लावली.
जिल्हा परिषद सदस्य रमेश बरफ यांनी रक्तदात्यांना स्वतः अल्पोहार दिला. किसान सभेचे जिल्हा सेक्रेटरी इरफान शेख यांनी सर्वप्रथम रक्तदान करून शिबिराची सुरुवात केली. यावेळी ठाणापाडा सरपंच महेंद्र पवार यांच्यासह परिसरातील माकपच्या कार्यकर्त्यांनी व परिसरातील शेकडो तरुणांनी रक्तदान केले. यामध्ये १८ वर्षाच्या तरुणापासून ते ६० वर्षाच्या वृद्धापर्यंतच्या रक्तदात्यांचा समावेश राहिला. करोना महामारीच्या काळात रक्तदान शिबिरामुळे गरजू रुग्णांना रक्त मिळण्यास मदत होणार आहे. ठाणापाडा येथे पहिल्यांदा इरफान शेख यांच्या माध्यमातून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. एकाच सत्रात १६० रक्त बॅग संकलित करण्यात आल्या. यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. योगेश मोरे, पोलिस निरीक्षक विशाल टकले, उपसभापती देवराम मौळे, माजी सभापती ज्योती राऊत, पंडित गावित, माजी सरपंच अंबादास माढी आदी उपस्थित होते.
करोना लढ्याला दिले बळ
करोनाकाळात रक्तसंकलन कमी होत असल्यामुळे किसान सभेने पुढाकार घेत आदिवासी बांधवांमध्ये जनजागृती केली. त्यांना रक्तदानाचे महत्त्व पटवून दिले. करोनाकाळती बिकट परिस्थिती ओळखून घेत ठाणापाडा परिसरातील १८ वर्षाच्या तरुणापासून ते ६० वर्षाच्या वृद्धापर्यंतच्या रक्तदात्यांनी पुढे येत रक्तदान केले.
दुर्गम भागातील आदिवासी पाड्यावर असंख्य असुविधा असतात. या परिसरात राहणाऱ्या लोकांना या असुविधांशी रोज दोन हात करीत आयुष्य काढावे लागते. मात्र याच आदिवासी पाड्यातील सुजान नागरिकांना रक्तदान शिबिरात सहभाग घेवून समाजापुढे आदर्श ठेवला आहे. तालुक्यातील दुर्गम भागात ठाणापाडा येथे किसान सभेच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात मुसळधार पाऊस सुरू असतानाही परिसरातील शेकडो रक्तदात्यांनी हजेरी लावली.
जिल्हा परिषद सदस्य रमेश बरफ यांनी रक्तदात्यांना स्वतः अल्पोहार दिला. किसान सभेचे जिल्हा सेक्रेटरी इरफान शेख यांनी सर्वप्रथम रक्तदान करून शिबिराची सुरुवात केली. यावेळी ठाणापाडा सरपंच महेंद्र पवार यांच्यासह परिसरातील माकपच्या कार्यकर्त्यांनी व परिसरातील शेकडो तरुणांनी रक्तदान केले. यामध्ये १८ वर्षाच्या तरुणापासून ते ६० वर्षाच्या वृद्धापर्यंतच्या रक्तदात्यांचा समावेश राहिला. करोना महामारीच्या काळात रक्तदान शिबिरामुळे गरजू रुग्णांना रक्त मिळण्यास मदत होणार आहे. ठाणापाडा येथे पहिल्यांदा इरफान शेख यांच्या माध्यमातून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. एकाच सत्रात १६० रक्त बॅग संकलित करण्यात आल्या. यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. योगेश मोरे, पोलिस निरीक्षक विशाल टकले, उपसभापती देवराम मौळे, माजी सभापती ज्योती राऊत, पंडित गावित, माजी सरपंच अंबादास माढी आदी उपस्थित होते.
करोना लढ्याला दिले बळ
करोनाकाळात रक्तसंकलन कमी होत असल्यामुळे किसान सभेने पुढाकार घेत आदिवासी बांधवांमध्ये जनजागृती केली. त्यांना रक्तदानाचे महत्त्व पटवून दिले. करोनाकाळती बिकट परिस्थिती ओळखून घेत ठाणापाडा परिसरातील १८ वर्षाच्या तरुणापासून ते ६० वर्षाच्या वृद्धापर्यंतच्या रक्तदात्यांनी पुढे येत रक्तदान केले.