अ‍ॅपशहर

बापरे! नदीपात्रातून वाहतंय रक्तमिश्रित पाणी, गावकऱ्यांनी सांगितलं धक्कादायक सत्य

नदीपात्रातून रक्तमिश्रित पाणी वाहत असल्याने संपूर्ण गावात एकच खळबळ उडाली आहे. यामुळे संपूर्ण शहरात दुर्गंधी पसरली असून नागरिकांच्या आरोग्यालाही यामुळे धोका आहे.

Edited byरेणुका धायबर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 27 Jun 2022, 11:29 am
मनमाड : नदीतून वाहणारं पाणी अचानक लाल रंगाचं झालं तर? ही कल्पनाही आपल्याला विचारात पाडते. पण महाराष्ट्रातलं एक असं गाव आहे जिथे थेट नदीपात्रात रक्तमिश्रित पाणी वाहत असल्याचं समोर येत आहे. मालेगाव शहरातून वाहणाऱ्या मोसम नदीच्या सांडव्या पुलावरून रक्तमिश्रित पाणी वाहत असल्याने एकच खळबळ उडाली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम manmad news


शहरातील पूर्व भागात असलेल्या काही कत्तलखान्यातून रक्तमिश्रित पाणी नेहमी ड्रेनेजव्दारे मोसम नदीपत्रात सोडलं जातं. पावसाळा सुरू झाला असून बऱ्याच ठिकाणी नाले - ड्रेनेज यांची सफाई न झाल्याने ते चोकअप होऊन हे पाणी थेट सरदार चौकातून खाली येत मोसम नदीच्या सांडवा पूलावर आल्याने येथील व्यवसायिकांची चांगलीच अडचण झाली आहे.

एकनाथ शिंदे तळ ठोकून असलेल्या गुवाहाटीमधील 'रेडिसन ब्ल्यू' हॉटेलचा मोठा निर्णय
रक्तमिश्रित पाण्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली असल्याने या परिसरातील नागरिकांनी मनपा प्रशासना विरोधात नाराजी व्यक्त केली. मनपा प्रशासनाला वारंवार या विषयी तक्रारी करूनसुद्धा त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला. मनपा त्वरित याकडे लक्ष देऊन संबंधित कत्तलखाना चालकांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
लेखकाबद्दल
रेणुका धायबर
रेणुका धायबर, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. डिजिटल पत्रकारितेचा आठ वर्षांचा अनुभव आहे. २०१४ पासून पत्रकारीतेत आहेत. झी २४ तास , न्यूज १८ लोकमत, टीव्ही ९ अशा वेबसाइटसाठी त्यांनी काम केले आहे. महाराष्ट्र, राजकारण, गुन्हेगारी, देश, विदेश, स्पेशल बातम्या यासोबत व्यवसाय विषयात त्यांची आवड आहे.... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज