म. टा. प्रतिनिधी, नाशिक
शहरात जीवघेण्या अपघातांत घट झाली असून, पोलिसांकडून सतत प्रयत्न होत असल्याचा हा परिपाक असल्याचे पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी स्पष्ट केले. मागील चार महिन्यांपासून वाहतूक पोलिस प्रबोधनासह दंडात्मक कारवाई करीत असून, नागरिकांनी सहाकार्य केल्यास जीवघेण्या अपघातांच्या संख्येत आणखी घट होऊ शकते, असा दावा आयुक्तांनी केला.
गुन्हे उघडकीस आल्याबाबत आयोजित पत्रकार परिषदेत आयुक्तांनी ही माहिती दिली. यावेळी पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर, श्रीकृष्ण कोकाटे, लक्ष्मीकांत पाटील, माधवी कांगणे, सहाय्यक पोलिस आयुक्त सचिन गोरे, जयंत बजबळे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. शहरात मार्च महिन्याच्या तुलनेत एप्रिल महिन्यात जीवघेण्या अपघातांचे प्रमाण कमी झाले आहे. शहरात मार्च महिन्यात २० जीवघेण्या अपघातांची नोंद झाली होती. या अपघातांत २१ जणांचा बळी गेला होता. एप्रिल महिन्यात मात्र जीवघेण्या अपघातांचे प्रमाण नऊवर आले असून, त्यात नऊ जणांचा बळी गेला आहे. याबाबत बोलताना पोलिस आयुक्त डॉ. सिंगल यांनी सांगितले. की शहर वाहतुकीचा प्रश्न मागील चार महिन्यांपासून रडारवर घेण्यात आला आहे. दंडात्मक कारवाईसोबत अनेक जनजागृतीपर अभियान राबवले जात आहेत. हेल्मेटचा वापर व्हावा या दृष्टीनेदेखील पोलिस प्रयत्नशील आहेत. वाहतूक पोलिसांकडून सततचा पाठपुरावा होत असल्याने अपघातांचे प्रमाण घटले असून, नागरिकांनी यासाठी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
--
चार महिन्यांतील स्थिती
महिना-अपघात-मृत्युमुखी पडलेल्या व्यक्ती
जानेवारी-१८-१८
फेब्रुवारी-१२-१३
मार्च-२०-२१
एप्रिल-९-९
एकूण-५९-६१
--
सीएमसीद्वारे गस्त फायद्याची
ट्रलाइज्ड मॉनिटरिंग सिस्टिमद्वारे सीआर मोबाइल अर्थात, गस्त पथकाचे काम नियंत्रित, तसेच अधिक परिणामकारक होणार असल्याचा दावा पोलिस आयुक्त डॉ. सिंगल यांनी केला. यापूर्वी ही वाहने पोलिस स्टेशनमार्फत नियंत्रित केली जात होती. चार सीआर मोबाइल, तसेच दोन निर्भया पथकांचे नियंत्रण कंट्रोल रूमकडे सोपविण्यात आले आहे. ही वाहने चार सहाय्यक पोलिस आयुक्तांच्या अखत्यारित येणाऱ्या पोलिस स्टेशन हद्दीत गस्त घालतील.
शहरात जीवघेण्या अपघातांत घट झाली असून, पोलिसांकडून सतत प्रयत्न होत असल्याचा हा परिपाक असल्याचे पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी स्पष्ट केले. मागील चार महिन्यांपासून वाहतूक पोलिस प्रबोधनासह दंडात्मक कारवाई करीत असून, नागरिकांनी सहाकार्य केल्यास जीवघेण्या अपघातांच्या संख्येत आणखी घट होऊ शकते, असा दावा आयुक्तांनी केला.
गुन्हे उघडकीस आल्याबाबत आयोजित पत्रकार परिषदेत आयुक्तांनी ही माहिती दिली. यावेळी पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर, श्रीकृष्ण कोकाटे, लक्ष्मीकांत पाटील, माधवी कांगणे, सहाय्यक पोलिस आयुक्त सचिन गोरे, जयंत बजबळे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. शहरात मार्च महिन्याच्या तुलनेत एप्रिल महिन्यात जीवघेण्या अपघातांचे प्रमाण कमी झाले आहे. शहरात मार्च महिन्यात २० जीवघेण्या अपघातांची नोंद झाली होती. या अपघातांत २१ जणांचा बळी गेला होता. एप्रिल महिन्यात मात्र जीवघेण्या अपघातांचे प्रमाण नऊवर आले असून, त्यात नऊ जणांचा बळी गेला आहे. याबाबत बोलताना पोलिस आयुक्त डॉ. सिंगल यांनी सांगितले. की शहर वाहतुकीचा प्रश्न मागील चार महिन्यांपासून रडारवर घेण्यात आला आहे. दंडात्मक कारवाईसोबत अनेक जनजागृतीपर अभियान राबवले जात आहेत. हेल्मेटचा वापर व्हावा या दृष्टीनेदेखील पोलिस प्रयत्नशील आहेत. वाहतूक पोलिसांकडून सततचा पाठपुरावा होत असल्याने अपघातांचे प्रमाण घटले असून, नागरिकांनी यासाठी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
--
चार महिन्यांतील स्थिती
महिना-अपघात-मृत्युमुखी पडलेल्या व्यक्ती
जानेवारी-१८-१८
फेब्रुवारी-१२-१३
मार्च-२०-२१
एप्रिल-९-९
एकूण-५९-६१
--
सीएमसीद्वारे गस्त फायद्याची
ट्रलाइज्ड मॉनिटरिंग सिस्टिमद्वारे सीआर मोबाइल अर्थात, गस्त पथकाचे काम नियंत्रित, तसेच अधिक परिणामकारक होणार असल्याचा दावा पोलिस आयुक्त डॉ. सिंगल यांनी केला. यापूर्वी ही वाहने पोलिस स्टेशनमार्फत नियंत्रित केली जात होती. चार सीआर मोबाइल, तसेच दोन निर्भया पथकांचे नियंत्रण कंट्रोल रूमकडे सोपविण्यात आले आहे. ही वाहने चार सहाय्यक पोलिस आयुक्तांच्या अखत्यारित येणाऱ्या पोलिस स्टेशन हद्दीत गस्त घालतील.