म. टा. प्रतिनिधी, नाशिक
शहरात रोख चलनाची टंचाई भासू लागली असून जिल्ह्यातील ८० टक्के एटीएम बंद आहेत. उर्वरित २० टक्के एटीएममध्ये दिवसातून फक्त एकच तास पैसे मिळत असल्याची माहिती समोर आली आहे. जिल्हाभरात एकूण ७७३ एमटीएम आहेत.
शहरातील रोख चलनाचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रीयकृत व कॉर्पोरेट बॅँकेच्या अधिकाऱ्यांची बैठक नकुतीच झाली. यात ही बाब समोर आली आहे. यावेळी बॅँकेच्या अधिकाऱ्यांनी सागितले, की एटीएममध्ये टाकण्यासाठी पैसे उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे चलन टंचाईला सामोरे जावे लागत आहेत. शहरात मोठ्या प्रमाणात चलनाची टंचाई जाणवत असून सामान्य नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करण्यास अडचण येत आहे. जिल्ह्यात विविध बॅँकांचे ७७३ एटीएम आहेत. त्यातील बहुतांश एटीएम बंद आहेत. यातील केवळ २० टक्के एटीएम सुरू आहेत. जे एटीएम सुरू आहेत ते देखील नोटांअभावी पूर्ण दिवसभर पैसे उपलब्ध करून देऊ शकत नाहीत. या एटीएममध्ये एक तास पुरेल इतकीच रोख रक्कम टाकली जात आहे. एटीएम सुरू नसल्याने नागरिकांना भाजी, दूध यासारख्या वस्तू खरेदी करता येत नाहीत. बाजारात पैसे नसल्याने खरेदीदार बाहेर पडत नसल्याने व्यवहार ठप्प झाले आहेत. येत्या काळात पैसे उपलब्ध न झाल्यास एटीएम समोर पुन्हा रांगा लागतील. देशात अनेक ठिकाणी रोख रकमेची टंचाई भासत असून चत्यावर तोडगा काढला जाईल, असे रिर्जव बँकेने कळवले आहे.
रोज ९० कोटींची गरज
शहरात बुधवारपर्यंत (दि. १८) विशेष अडचण येत नव्हती; मात्र गुरुवारपासून परिस्थिती बिकट होत चालली आहे. येत्या काही दिवसात चलन उपलब्ध न झाल्यास नागरिकांचे हाल होणार आहे. जिल्ह्यातील एटीएम केंद्राना ३० कोटी तर शहरात ६० कोटी याप्रमाणे साधारण ९० कोटी रुपयांची दैनंदिन एटीएमसाठीची गरज आहे.
शहरात रोख चलनाची टंचाई भासू लागली असून जिल्ह्यातील ८० टक्के एटीएम बंद आहेत. उर्वरित २० टक्के एटीएममध्ये दिवसातून फक्त एकच तास पैसे मिळत असल्याची माहिती समोर आली आहे. जिल्हाभरात एकूण ७७३ एमटीएम आहेत.
शहरातील रोख चलनाचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रीयकृत व कॉर्पोरेट बॅँकेच्या अधिकाऱ्यांची बैठक नकुतीच झाली. यात ही बाब समोर आली आहे. यावेळी बॅँकेच्या अधिकाऱ्यांनी सागितले, की एटीएममध्ये टाकण्यासाठी पैसे उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे चलन टंचाईला सामोरे जावे लागत आहेत. शहरात मोठ्या प्रमाणात चलनाची टंचाई जाणवत असून सामान्य नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करण्यास अडचण येत आहे. जिल्ह्यात विविध बॅँकांचे ७७३ एटीएम आहेत. त्यातील बहुतांश एटीएम बंद आहेत. यातील केवळ २० टक्के एटीएम सुरू आहेत. जे एटीएम सुरू आहेत ते देखील नोटांअभावी पूर्ण दिवसभर पैसे उपलब्ध करून देऊ शकत नाहीत. या एटीएममध्ये एक तास पुरेल इतकीच रोख रक्कम टाकली जात आहे. एटीएम सुरू नसल्याने नागरिकांना भाजी, दूध यासारख्या वस्तू खरेदी करता येत नाहीत. बाजारात पैसे नसल्याने खरेदीदार बाहेर पडत नसल्याने व्यवहार ठप्प झाले आहेत. येत्या काळात पैसे उपलब्ध न झाल्यास एटीएम समोर पुन्हा रांगा लागतील. देशात अनेक ठिकाणी रोख रकमेची टंचाई भासत असून चत्यावर तोडगा काढला जाईल, असे रिर्जव बँकेने कळवले आहे.
रोज ९० कोटींची गरज
शहरात बुधवारपर्यंत (दि. १८) विशेष अडचण येत नव्हती; मात्र गुरुवारपासून परिस्थिती बिकट होत चालली आहे. येत्या काही दिवसात चलन उपलब्ध न झाल्यास नागरिकांचे हाल होणार आहे. जिल्ह्यातील एटीएम केंद्राना ३० कोटी तर शहरात ६० कोटी याप्रमाणे साधारण ९० कोटी रुपयांची दैनंदिन एटीएमसाठीची गरज आहे.