नाशिक: 'मराठा आरक्षणाला मी कधीच विरोध केलेला नाही. विधानसभेतही पाठिंबा दिलाय. मात्र, काही लोक मराठा आणि ओबीसी यांच्यात वितुष्ट निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. छगन भुजबळ शत्रू आहे, असं चित्र निर्माण केलं जातंय. पण मी कधीच भेदभाव किंवा कोणावर अन्याय केला नाही,' असं मत अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आज व्यक्त केलं. (Chhagan Bhujbal on Maratha Reservation) वाचा: संभाजीराजे जमिनीवर आणि भुजबळांना खुर्ची; मराठा आंदोलक भडकले!
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा समाजानं आज नाशिक इथं मूक आंदोलन केलं. नाशिक जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींनी उपस्थिती राहून आरक्षणाबद्दल आपली भूमिका मांडली. छगन भुजबळ हेही तिथं उपस्थित होते. ते काय बोलतात याकडं सर्वांचं लक्ष लागलं होतं. मराठा आरक्षणाला आपला पाठिंबा असल्याची भूमिका भुजबळ यांनी मांडली. 'मराठा समाजाला हक्काचं आरक्षण मिळालं पाहिजे यात दुमत नाही. सर्व पक्षांची हीच भूमिका आहे. कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण मिळायला हवं ही माझी आणि माझ्या पक्षाची भूमिका आहे,' असं ते म्हणाले.
वाचा: प्रताप सरनाईकांच्या आरोपांकडं काँग्रेसचं दुर्लक्ष; फक्त एकच मुद्दा पकडला!
'ओबीसी आक्रोश मोर्चा हा मराठा आरक्षणाच्या विरोधात नाही. दोघांचं आरक्षण सुप्रीम कोर्टानं नाकारलं आहे. करोनामुळं जनगणना झाली नाही आणि ओबीसी समाज कायद्याच्या कचाट्यात सापडला. पण दोन्ही समाजात वितुष्ट करण्याचा काहींचा प्रयत्न आहे. शाहू, फुले, आंबेडकर ही आमची दैवतं आहेत. संभाजीराजे हे अत्यंत समंजस आहेत. आपण न भांडता भारत सरकारला साकडं घालू. कोर्टातील लढ्यासाठी केंद्र सरकारच्या मदतीची नितांत गरज आहे,' असं भुजबळ म्हणाले. 'आपला लढा व्यवस्थेशी आहे. चर्चेशिवाय मार्ग नाही. त्यासाठी एकत्र येऊन लढूया,' असं आवाहनही त्यांनी केलं.
वाचा: राज्यात नव्या राजकीय समीकरणांची सुरुवात नगरपासून? 'ही' निवडणूक ठरणार महत्त्वाची
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा समाजानं आज नाशिक इथं मूक आंदोलन केलं. नाशिक जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींनी उपस्थिती राहून आरक्षणाबद्दल आपली भूमिका मांडली. छगन भुजबळ हेही तिथं उपस्थित होते. ते काय बोलतात याकडं सर्वांचं लक्ष लागलं होतं. मराठा आरक्षणाला आपला पाठिंबा असल्याची भूमिका भुजबळ यांनी मांडली. 'मराठा समाजाला हक्काचं आरक्षण मिळालं पाहिजे यात दुमत नाही. सर्व पक्षांची हीच भूमिका आहे. कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण मिळायला हवं ही माझी आणि माझ्या पक्षाची भूमिका आहे,' असं ते म्हणाले.
वाचा: प्रताप सरनाईकांच्या आरोपांकडं काँग्रेसचं दुर्लक्ष; फक्त एकच मुद्दा पकडला!
'ओबीसी आक्रोश मोर्चा हा मराठा आरक्षणाच्या विरोधात नाही. दोघांचं आरक्षण सुप्रीम कोर्टानं नाकारलं आहे. करोनामुळं जनगणना झाली नाही आणि ओबीसी समाज कायद्याच्या कचाट्यात सापडला. पण दोन्ही समाजात वितुष्ट करण्याचा काहींचा प्रयत्न आहे. शाहू, फुले, आंबेडकर ही आमची दैवतं आहेत. संभाजीराजे हे अत्यंत समंजस आहेत. आपण न भांडता भारत सरकारला साकडं घालू. कोर्टातील लढ्यासाठी केंद्र सरकारच्या मदतीची नितांत गरज आहे,' असं भुजबळ म्हणाले. 'आपला लढा व्यवस्थेशी आहे. चर्चेशिवाय मार्ग नाही. त्यासाठी एकत्र येऊन लढूया,' असं आवाहनही त्यांनी केलं.
वाचा: राज्यात नव्या राजकीय समीकरणांची सुरुवात नगरपासून? 'ही' निवडणूक ठरणार महत्त्वाची