म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक : नोटबंदी नेहमीचा खेळ आहे. कर्नाटकात निकाल लागल्यानंतर दोन हजारांच्या नोटा बंद केल्या जात आहेत. नोटबंदी करून आठ वर्षे झाली. त्यामुळे नोटबंदी करून किती काळा पैसा बाहेर आला, हे जनतेला कळाले नाही, असा सवाल राष्ट्रवादीचे नेते व माजी मंत्री छगन भुजबळ यांनी भाजपला केला आहे. नोटबंदी करून आठ वर्षे झाली, किती काळा पैसा बाहेर आला, हे कळाले नाही, असे भुजबळ म्हणाले. महाविकास आघाडीच्या जागावाटपावर कुठेही एकमत आणि चर्चा झाली नाही. परंतु, दररोज नवनवीन आकडे समोर येतात. आम्ही त्याचा आनंद घेत असल्याचा टोलाही भुजबळांनी लगावला.
ईडी आणि केंद्र सरकारच्या पोलिस यंत्रणा कशा प्रकारे वापरल्या जात आहेत, हे आता सर्वांना माहीत आहे. सर्वात आधी माझ्यावर ईडीचे प्रयोग झाले. त्यावेळी ईडी काय सर्वांना माहिती नव्हती. सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे की, भीती निर्माण करू नका. सत्ताधाऱ्यांनी यातून बोध घ्यावा, असा सल्लाही भुजबळांनी भाजपला दिला. महाविकास आघाडीच्या जागावाटपाची राजकीय वर्तुळात चर्चा होतेय. त्यावर जागावाटपावर कुठेही एकमत आणि चर्चा झाली नाही. नवनवीन आकडे समोर येतात, आम्ही ते आम्ही एन्जॉय करतोय, असे भुजबळ म्हणाले. दुसरी-तिसरी आघाडी होणार की नाही माहिती नाही, पण भाजपच्या हुकूमशाहीविरोधात सर्व पक्षांनी उभे राहिले पाहिजे, असेही ते म्हणाले. जयंत पाटील यांनी काही चुकीचे केले नाही. त्यांच्यावर कारवाई होणार नाही. भाजपकडे लाँड्री आहे. त्यांच्याकडे जे येतात, ते त्यांना स्वच्छ करतात, असा टोलाही त्यांनी हाणला. जयंत पाटलांच्या समर्थनार्थ ठिकठिकाणी आंदोलने केली जात आहेत. आमचा यंत्रणावर दबाव टाकण्याचा हेतू नाही. आमच्या प्रांताध्यक्षांवर कारवाई होत असताना आम्ही गप्प बसायचे का, असा सवालही त्यांनी केला. कर्नाटकमध्ये हिजाब, बजरंगबली हे मुद्दे निवडणुकीत आणले गेले. शेवटी पराभव झाला, असेही ते म्हणाले.
माझ्याबाबतचे वृत्त चुकीचे
राष्ट्रवादीकडून नाशिकचे निरीक्षकपद माजी मंत्री धनंजय मुंडेंकडे देण्यात आल्याच्या बातम्यांवरून भुजबळांनी खुलासा केला. कोणाच्या नियुक्तीने दुसऱ्याची पकड गेली, असे होत नाही. पक्षाच्या कामासाठी निवड केली जाते. त्यामुळे माझ्यासंदर्भात आलेल्या बातम्या चुकीच्या असून, त्यात तथ्य नसल्याचा दावाही भुजबळ यांनी केला. नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस मजबूत स्थितीत असल्याचेही ते म्हणाले.
ईडी आणि केंद्र सरकारच्या पोलिस यंत्रणा कशा प्रकारे वापरल्या जात आहेत, हे आता सर्वांना माहीत आहे. सर्वात आधी माझ्यावर ईडीचे प्रयोग झाले. त्यावेळी ईडी काय सर्वांना माहिती नव्हती. सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे की, भीती निर्माण करू नका. सत्ताधाऱ्यांनी यातून बोध घ्यावा, असा सल्लाही भुजबळांनी भाजपला दिला. महाविकास आघाडीच्या जागावाटपाची राजकीय वर्तुळात चर्चा होतेय. त्यावर जागावाटपावर कुठेही एकमत आणि चर्चा झाली नाही. नवनवीन आकडे समोर येतात, आम्ही ते आम्ही एन्जॉय करतोय, असे भुजबळ म्हणाले. दुसरी-तिसरी आघाडी होणार की नाही माहिती नाही, पण भाजपच्या हुकूमशाहीविरोधात सर्व पक्षांनी उभे राहिले पाहिजे, असेही ते म्हणाले. जयंत पाटील यांनी काही चुकीचे केले नाही. त्यांच्यावर कारवाई होणार नाही. भाजपकडे लाँड्री आहे. त्यांच्याकडे जे येतात, ते त्यांना स्वच्छ करतात, असा टोलाही त्यांनी हाणला. जयंत पाटलांच्या समर्थनार्थ ठिकठिकाणी आंदोलने केली जात आहेत. आमचा यंत्रणावर दबाव टाकण्याचा हेतू नाही. आमच्या प्रांताध्यक्षांवर कारवाई होत असताना आम्ही गप्प बसायचे का, असा सवालही त्यांनी केला. कर्नाटकमध्ये हिजाब, बजरंगबली हे मुद्दे निवडणुकीत आणले गेले. शेवटी पराभव झाला, असेही ते म्हणाले.
माझ्याबाबतचे वृत्त चुकीचे
राष्ट्रवादीकडून नाशिकचे निरीक्षकपद माजी मंत्री धनंजय मुंडेंकडे देण्यात आल्याच्या बातम्यांवरून भुजबळांनी खुलासा केला. कोणाच्या नियुक्तीने दुसऱ्याची पकड गेली, असे होत नाही. पक्षाच्या कामासाठी निवड केली जाते. त्यामुळे माझ्यासंदर्भात आलेल्या बातम्या चुकीच्या असून, त्यात तथ्य नसल्याचा दावाही भुजबळ यांनी केला. नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस मजबूत स्थितीत असल्याचेही ते म्हणाले.