अ‍ॅपशहर

शहर पाऊस

शहरात पावसाने घेतली विश्रांतीम टा प्रतिनिधी, नाशिक शहरात शनिवारपासून सुरू असलेल्या सततधार पावसाने अखेर बुधवारी विश्रांती घेतली...

Maharashtra Times 19 Jul 2018, 4:00 am

शहरात पावसाने घेतली विश्रांती

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरात शनिवारपासून सुरू असलेल्या सततधार पावसाने अखेर बुधवारी विश्रांती घेतली. यामुळे जनजीवन पूर्वपदावर आले असून, बाजारात पुन्हा गर्दी दिसू लागली आहे. बुधवारी शहरात ०.४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.

गेल्या शनिवारपासून पावासाला सुरुवात झाली होती. अनेक दिवसांपासून हुलकावणी देणारा पाऊस पडल्याने शेतकऱ्यांसह नागरिकांनीही दिलासा मिळाला. या पावसामुळे गोदावरीला पूर आल्याने बाजार पूर्णत: गणेशवाडीच्या काही भागात स्थलांतरीत करण्यात आला होता. त्यामुळे भाजी खरेदी करण्यासाठी नागरिकांना दारावर येणाऱ्या भाजीविक्रेत्याची वाट पहावी लागली. याच दरम्यान शहरातील भाजी बाजारात भाज्यांची आवक कमी झाल्याने नागरिकांना चढ्या भावाने भाजी खरेदी करावी लागली. पावसाचा जोर सरत नसल्याने नागरिकांनी शहराबाहेर पडणे कमी केले होते. त्याचा परिणाम एसटी वाहतुकीवरही झाला. ग्रामीण भागात जाणाऱ्या बसेस काही कालावधीपुरत्या बंद ठेवण्यात आल्या होत्या. याच दरम्यान शहरात दोन ठिकाणी झाडे पडल्याच्या घटना घडल्या होत्या; मात्र यात सुदैवाने कोणतीही हानी झाली नाही.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज